Wednesday, March 31, 2021

पडघे येथे आदर्श शाळा योजनेअंतर्गत कोकुयो कॅम्लिन लिमिटेड यांच्या सीएसआर फंडातून उभारण्यात आलेल्या मिनी सायन्स सेंटरचे उद्घाटन संप्पन.

पडघे येथे आदर्श शाळा योजनेअंतर्गत कोकुयो कॅम्लिन लिमिटेड यांच्या सीएसआर फंडातून उभारण्यात आलेल्या मिनी सायन्स सेंटरचे उद्घाटन संप्पन.
पालघर (प्रतिनिधी)आज दि. 31 मार्च 2021 रोजी आश्रमशाळा पडघे येथे आदर्श शाळा योजनेअंतर्गत कोकुयो कॅम्लिन लिमिटेड यांच्या सीएसआर फंडातून उभारण्यात आलेल्या अद्ययावत आणि सुसज्ज अश्या *मिनी सायन्स सेंटर* चे उद्घाटन आणि हस्तांतरण सोहळा कोव्हीड 19 च्या पार्श्वभूमीवर सर्व मार्गदर्शक तत्वे पाळून पार पडला 
याप्रसंगी कोकुयो कॅम्लिन लिमिटेड चे डॉ. चंद्रशेखर देशमुख (मुख्य मानव संसाधन अधिकारी CHRO) , श्री. किशोर वठे, (उपाध्यक्ष कोकुयो कॅम्लिन ) , श्री. अजित राणे , माधुरी वर्तक इत्यादी 
तसेच 
लायन्स क्लब ऑफ तारापूर चे डॉ. सूर्यकांत संखे, डॉ. रत्नाकर माने आणि माजी अध्यक्षा सौ. छाया शाह यादेखील उपस्थित होत्या
ग्रामीण शिक्षण संस्थेच्या विश्वस्त श्रीमती दामिनी राऊत, कार्याध्यक्ष नितीन वझे, अनिल तरे, भूषण पाटील मुख्याध्यापक श्री. सुधाकर पाटील इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
स्टेम लर्निंग चे सदानंद शेट्टी देखील उपस्थित होते , त्यांनी या प्रयोगशाळेच्या अनेक प्रयोगांची प्रात्यक्षिके करून दाखवली.

याप्रसंगी डॉ. देशमुख , डॉ. संखे आणि किशोर वठे यांनी मार्गदर्शन करताना उपलब्ध करून दिलेल्या अद्ययावत आणि सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळेचा जास्तीत जास्त फायदा विद्यार्थ्यांनी करून घेऊन आपल्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्याची अपेक्षा व्यक्त केली. 
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जयेश संखे सर यांनी केले. 

याप्रसंगीची काही क्षणचित्रे

जिल्हा परिषदेच्या २९६ कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा लाभ– पदोन्नती निवड समितीचा महत्वपूर्ण निर्णय


जिल्हा परिषदेच्या २९६ कर्मचाऱ्यांना  सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा लाभ– पदोन्नती निवड समितीचा  महत्वपूर्ण निर्णय

      पालघर (प्रतिनिधी)मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या अध्यक्षतेखाली सामान्य प्रशासन विभाग, ग्राम पंचायत, महिला व बाल कल्याण, बांधकाम, पशु संवर्धन आणि कृषी या विभागातील वर्ग ३ व वर्ग ४ च्या अधिकारी व कर्मचारी याना सातव्या वेतन आयोगानुसार १०,२०,व ३० वर्षांच्या नियमित सेवे नंतर ची  ३  लाभांची सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर करणेबाबत दि. २४/३/२०२१ रोजी निवड समिती सभा घेण्यात आली होती या सभेमध्ये  सदर विभागातील एकूण २९६  कर्मचाऱ्यांना  एकाच वेळी सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय निवड समितीचे अध्यक्ष सिद्धाराम सालीमठ यांनी दिला.
निवड समितीचे सह अध्यक्ष अति.मु.का.अ.चंद्रकांत वाघमारे, सदस्य सचिव उप.मु.का. अ. (साप्रवि) संघरत्ना  खिल्लारे, सदस्य  उपमुख्य वित्त व लेखा अधिकारी  नितीन ओगले आणि  जिल्हा समाज कल्याण अधिकारी वैभव सापळे यांच्या उपस्थितीत हि निवड समिती सभा पार पडली. 
सामान्य  प्रशासन विभागाच्या एकूण १४० अधिकारी व कर्मचाऱ्यांना हा लाभ देण्यात आला. यात सहायक प्रशासन अधिकारी १, कनिष्ठ प्रशासन अधिकारी ३ विस्तार अधिकारी  (सांख्यिकी) ४, वरिष्ठ सहायक १९, कनिष्ठ सहायक ३७, वाहन चालक १४,  तर शिपाई ६२  यांचा यात समावेश आहे. ग्राम पंचायत विभागातील  ग्राम सेवक ३०, ग्राम विकास अधिकारी १०, विस्तार अधिकारी (पं )५ अशा एकूण ४५ लाभार्थ्याना लाभ मिळाला. महिला व बाल कल्याण विभागातील ३४ मुख्य  सेविकाना  सुधारित  आश्वासित प्रगतीचा लाभ देण्यात आला असून पशु संवर्धन विभागातील सहा. पशुधन विकास अधिकारी ७ तर पशुधन पर्यवेक्षक ६ अशा एकूण १३  जणांना तर कृषी विभातील एक पंचायत समिती विस्तार  अधिकारी याना या योजनेचा लाभ  देण्यात आला.  बांधकाम विभागातील शाखा अभियंता ५,  सहा. अभियंता (श्रेणी २ ) १, कनिष्ठ  आरेरख ३, कानिष्ठ सहायक १, तर मैल कामगार ५३ अशा एकूण ६३ अधिकारी व कर्मचारी यांना  पात्र ठरवण्यात आले.  
  ठाणे जिल्हा परिषदेत कार्यरत असल्या पासून सदर चे जे कर्मचारी   या लाभापासून वंचित होते  त्यांना मु. का. अ सिद्धाराम सालीमठ यांनी एकाच बैठकीत  हा लाभ मिळवून दिला. मु.का.अ यांच्या या निर्णयामुळे सेवानिवृत्ती कामी सदर कर्मचाऱ्यांना या लाभाचा फायदा होणार असून विविध कर्मचारी संघटनानी त्यांचे आभार मानले. तर कर्मचारी वर्गाने याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

*जिल्ह्यात बऱ्यापैकी प्रलंबित लाभार्थी होते त्यांना लाभ देण्याचा प्रयत्न केला आहे.उर्वरित कर्मचाऱ्यां देखील  लाभ मिळवून देण्यासाठी  विशेष मोहीम घेऊन लाभ मिळवून दिला जाईल.*
सिद्धाराम सालीमठ,मुख्य कार्यकारी अधिकारी.

तमाम जनतेला जाहीर निवेदन

जनतेला जाहीर निवेदन 
सफाळे ( हिरालाल लोखंडे ) दिनांक ३१ मार्च २०२१ रोजी मा. डॉ. माणिक गुरसाळ साहेब, जिल्हाधिकारी पालघर यांनी कोविडा - १९ विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या दृष्टिकोनातून पालघर जिल्ह्यामध्ये काही निर्बंध लागु करणेकामी दिनांक २६ मार्च  २०२१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय पालघर यांच्या कडुन आदेश पारीत करण्यात आलेले होते. सदरचे अधिक्रमित (रद्द ) करण्यात आले आहेत. मा. मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांच्याकडील आदेश दिनांक २७ मार्च २०२१ व इकडील आदेश दिनांक २७ मार्च २०२१  प्रमाणे खालील खालील खुलासा करण्यात येत आहे. 
१ ) सायंकाळी ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत जमावबंदी असल्याने उल्लंघन करणार्‍यास प्रतिव्यक्ती रूपये १०००-/ इतका दंड आकारण्यात येईल. 
२ ) सायंकाळी ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत सर्व सार्वजनिक ठिकाणी बगीचा - समुद्र किनारा - उद्यान बंद राहणार आहेत. उल्लंघन केल्यास प्रति व्यक्ती रूपये १०००-/ इतका दंड करण्यात येईल. 
३ ) मास्क परिधान परिधान न केल्यास रूपये ५००-/ इतका दंड करण्यात येईल. 
४ ) सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास रूपये १०००-/ इतका दंड करण्यात येईल. 
५ ) दिनांक १४ एप्रिल २०२१ पासूनचे विवाह बंदीचे आदेश रद्द करण्यात आले असून विवाह समारंभास ५० लोकांच्या मर्यादेत, सबंधित पोलिस स्टेशन यांच्या कडुन परवानगी घेण्याच्या व कोविडा - १९ चे सर्व मार्गदर्शक सुचना पालन करण्याच्या अटीवर परवानगी राहिल. 
६ ) सर्व दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ८ पर्यंत सुरू राहतील. 
७ ) खाद्य गृह - परमीट रूम - बार  सकाळी ७ ते सायंकाळी ८ पर्यंत सुरू राहतील. होम डिलीव्हरी किचन / वितरण कक्ष रात्री १० पर्यंत सुरू राहतील 
८ ) सर्व सरकारी व निमसरकारी कार्यालयामध्ये गर्दी टाळण्यासाठी  निवडून आलेले लोक प्रतिनिधी व्यतिरिक्त तातडीचे काम असलेल्यांना अभ्यागतानाच प्रवेश दिला जाईल 
३० मार्च २०२१ प्रेस नोट कोविडा -१९ प्रमाणे

Tuesday, March 30, 2021

महावितरणच्या कर्मचार्‍यांस दमदाटी करणारा गजाआड,

महावितरणच्या कर्मचार्‍यांस दमदाटी करणारा गजाआड, 
सफाळे( हिरालाल लोखंडे )दिनांक ३० मार्च २०२१ रोजी सफाळे विभाग महावितरणचा कर्मचारी ( वायरमेन ) श्री राहुल सुभाष सपकाळ वय वर्ष २७ हे  महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीत कार्यरत असून मौजे तांदुळवाडी ग्रामपंचायत अंतर्गत पाण्याचे मोटरी करीता देण्यात आलेला चावरेपाडा येथील वीजपुरवठा बिल एक वर्षा पासून थकित असल्याने वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशानुसार दिनांक १५ मार्च २०२१ पासून विद्युत पुरवठा खंडित करण्यात आलेला. दोन दिवसानंतर आपल्या कर्तव्यावर असलेले वायरमेन सपकाळ पाहणी करण्यासाठी तांदुळवाडी येथे गेले असताना, विजय सुदाम पालव राहणार चावरेपाडा तांदुळवाडी याने चावरेपाडा वीजपुरवठा खंडित केला म्हणून अरेरावी केली असताना सुध्दा वरिष्ठ अधिकारी यांना काही एक सांगितले नाही. 
  दिनांक ३० मार्च २०२१ रोजी दुपारी १२ वाजल्यानंतर वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशानुसार मौजे तांदुळवाडी येथे कर्तव्यावर जात असताना श्री रमेश चावरे सरपंच तांदुळवाडी यांचा फोन आला व त्यांनी सांगितले तु आता चंद्रकांत रामा तुंबडा चावरेपाडा यांच्या घरी जा, तेथील रहिवासी सर्व मिळून थकित बिलाचे पैसे देणार आहे. म्हणून मी तेथे गेलो. त्या ठिकाणी ४ - ५ महिला व काही पुरूष मिळून पैसे गोळाकरीत असताना अंदाजे १२ च्या सुमारास अचानक पणे विजय सुदाम पालव व त्यांची पत्नी आले, त्यांनी मला तू बाहेर गावावरून आला म्हणून शहाणा समजतोस काय, आम्ही विजबिलाचे पैसे भरणार नाहीत. बोलत, शिवीगाळ करीत, अंगावर असलेल्या गणवेशाची कॉलर पकडून, धक्का बुक्की करीत गणवेशाची दोन बटन तोडून माझ्या डोक्यात असलेली टोपी फेकून देऊन, पाण्याचे कनेक्शन आताच चालू कर सांगितले. तेथे जमलेल्या लोकांनी मला पालव यांच्या पासून सोडवण्यासाठी प्रयत्न करीत असताना मी सरपंच यांना फोन केला असताना, ते स्वतः घटनास्थळी धावत आले. त्यांनीही मला पालव यांच्या पासून सोडवण्यासाठी प्रयत्न केला. तरी सदर खंडित केलेला वीजपुरवठा पालव यांनी दहशत, गुंडगिरी,, दमदाटी यांच्या जोरावर पुन्हा सूर करण्यास भाग पाडुन, तु जर माझ्या विरूद्ध पोलिस स्टेशनला जाऊन तक्रार केली तर तुला सोडवणार नाही मारून टाकले अशी सर्वान समक्ष धमकी दिली. 
    माझा जिव वाचवीत सफाळे येथे येऊन घडलेला प्रकार वरिष्ठ अधिकारी यांना आॅफीसच्या मधे जाऊन सांगीतला असताना वरिष्ठ अधिकारी यांच्या सल्यांने सदर आरोपी विरूध्द सफाळे पोलिस स्टेशन मधे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 
   सफाळे पोलिस स्टेशन मधील प्रभारी अधिकारी श्री संदिप कहाळे साहेब यांनी, भारतीय दंड संविधान कलम ३५३, ५०४, ५०६, प्रमाणे गुन्हा नोंदणी करून आरोपी यास अटक केली असून, वरिष्ठ पोलिस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.

जिल्ह्यात 91 हजार 561 जणांचे कोव्हिड लसीकरण करण्यात आले

जिल्ह्यात 91 हजार 561 जणांचे कोव्हिड लसीकरण करण्यात आले
----
*लस सुरक्षित सर्वांनी लसीकरण करून घ्यावे*.
*-*जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ*

पालघर(प्रतिनिधी) दि. 30 :- कोव्हिड-19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यामध्ये पालघर ग्रामीण तसेच वसई- विरार महानगरपालीका क्षेत्रामधील आरोग्य कर्मचारी, पहिल्या फळीमध्ये काम करणारे कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक व्याधी असलेल्या व्यक्तीसह 75 हजार 728 जणांना लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला असून 15 हजार 833 व्यक्तींना दुसरा डोस देण्यात आला आहे. असे एकुण जिल्ह्यामध्ये 91 हजार 561 व्यक्तींना कोव्हिड-19 लसीकरण करण्यात आले आहे. हे लसीकरण पुर्णपणे सुरक्षित असून नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी केले.
कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लस जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहेत. लसीकरण केंद्राची संख्या 61 असून त्यामध्ये पालघर ग्रामीण येथे 32 शासकीय लसीकरण केंद्र तर 5 खाजगी लसीकरण केंद्र आहेत तसेच वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये 14 शासकीय तर 10 खाजगी लसीकरण केंद्र स्थापन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी दिली.
1 मार्च ते 28 मार्च दरम्यान जिल्ह्यामध्ये 3677 नविन कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची नोंद झाली असून या कालावधीमध्ये 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी सांगितले.

सफाळे ग्रामपंचायत हद्दीत पाणी टंचाई !

सफाळे ग्रामपंचायत हद्दीत पाणी टंचाई ! 
अर्चना पाटील - भाजपा महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस 
सफाळे ( हिरालाल लोखंडे ) सफाळे विभागात मुबलक पाणी साठा असून सुध्दा, सफाळे ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल चालू असल्याचे दिसून येत आहे. पाणीपुरवठा करणार्‍या योजनेचा करोडो रूपयांचा प्लांट बंद पडुन आहे, परंतु १० रुपयात शुध्द जलपेय जागेवर विकत मिळते. तर त्यांची घरपोच किंमत २०रुपये घेतली जाते. शुध्द जलपेय, लाईट, रस्ते ही ग्रामपंचायतीची जबाबदारी असताना सतरा गांव पाणीपुरवठा  योजना ठप्प आहे. यामुळे गरिब जनतेला विकत पाणी घेण्याची वेळ आली आहे. यावर कायम स्वरूपात तोडगा निघायला हवा. अश्या प्रकारची मागणी असलेले निवेदन ग्रामपंचायत सफाळे पोस्ट उंबरपाडा ता,जि पालघर यांना अर्चना पाटील  यांनी भाजपा जिल्हा पदाधिकारी सौ अंजली कुडू भरत काळे यांच्या उपस्थित दिले असून लवकरात लवकर पाणी प्रश्न सुटला नाहीतर, जन आंदोलनाचा इशाराही दिला आहे. 
           सफाळे ग्रामपंचायत यांच्या कडे वरील विषयावर विचारले असताना १७ रा गांव पाणी पुरवठा योजनेचे म.रा.वि.चे बिल थकित असल्याने पाणी पुरवठा बंद आहे. परंतु सफाळे ग्रामपंचायत लवकरच आपले विलंगीकरण करून सफाळे कराना स्वंतत्र पाणी पुरवठा योजना सुरू करीत आहे. पाणी पुरवठा करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी सदैव तत्पर असून ते प्रत्येक विभागात जाऊन पाणी पाहणी करीत असतात.

Monday, March 29, 2021

पालकमंत्री दादाजी भुसे यांनी रुग्णालया मध्ये जाऊन जाखमीची घेतली भेट

*पालकमंत्री दादाजी भुसे यांनी रुग्णालया मध्ये जाऊन  जाखमीची घेतली भेट*                                       पालघर दि 29 :  - 28 मार्च रोजी रात्री 2:30 च्या सुमारास  ब्राह्मणगाव  ता. मोखाडा येथील दुकानदार अनंता बाळू मौळे यांच्या घर व दुकास  शॉट सर्किट मुळे आग लागली होती. सदर आगीमध्ये चार जणांचा मृत्यू झाला  जखमी झालेल्या रुग्णांना नाशिक येथील जिल्हा रुग्णालय मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले कृषी, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी नाशिक जिल्हा रुग्णालय मध्ये भेट देऊन जखमीची विचारपूस केली.        रात्री लागलेल्या या  आगीत  चार व्यक्ती मयत झाल्या आहेत. या मध्ये
गंगुबाई बाळू मौळे  , द्वारका अनंता मौळे  पल्लवी अनंता मौळे ,
, कृष्णा अनंता मौळे - यांचा समावेश आहे.
.   नाशिक येथे उपचार घेत असलेले जखमी व्यक्ती .
भावेश अनंता मौळे , अश्विनी अनंता मौळे    यांच्या उपचारा विषयीची सविस्तर माहिती पालकमंत्री दादाजी भुसे यांनी घेतली तसेच उपचारात कोणत्याही प्रकारची कमतरता येऊ नये तसेच उपचाराचा  दैनंदिन अहवाल द्यावा असे निर्देश पालकमंत्री दादाजी भुसे यांनी नाशिक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रेखाराव खंडे यांना दिल्या   यावेळी मोखाडा तहसिलदार वैभव पवार ,  अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीनिवास , अमित पाटील आदी उपस्थित होते

होळी साजरी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केळवा सागरी पोलिस स्टेशन

होळी साजरी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल 
केळवा सागरी पोलिस स्टेशन  ( हिरालाल लोखंडे ) मा. जिल्हाधिकारी साहेब पालघर यांचा मनाई आदेश असताना ही सागरी पोलिस स्टेशन केळवा हद्दीतील मौजे आगरवाडी, माकुणसर गावातील अतिउत्साही आयोजकांनी गावकर्‍यांना एकत्र करून होळी साजरी करून जिल्हाधिकारी पालघर यांच्या आदेशाचे उल्लंघन केले असल्याने, आगरवाडी राममंदिर पटांगणात होळी आयोजक विकास गावड वय ५५ वर्ष , प्रकाश गावड वय ५० वर्ष ,व आयोजकांनी एकत्र जमवलेला अंदाजे ८० ते ९० लोकांचा जमाव. माकुणसर येथील होळी आयोजक, कमलाकर पाटील वय वर्ष ६० नितीन आॅमकार वय ३५ वर्षे व जमलेला समुदाय अंदाजे १०० ते १२५ माणसे यांच्या वर श्री भीमसेन गायकवाड साहेब प्रभारी अधिकारी केळवा सागरी पोलिस स्टेशन यांनी आपल्या कर्मचारी वर्गाच्या सहकार्याने अंदाजे २०० लोकांवर गुन्हे दाखल केले असून वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई सूर आहे.. पालघर जिल्हाधिकारी साहेब, मा, पोलिस अधिक्षक साहेब पालघर यांच्या आदेशानुसार नांदगाव बीच  सांज रिसॉर्ट येथेही कारवाई करून ४७ व्यक्तीनवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 
    करोनाचा वाढत्या प्रभावामुळे मा. जिल्हाधिकारी साहेब यांनी आज दिनांक २९ मार्च २०२१ मध्यरात्रीपासून ते १४ एप्रिल २०२१ पर्यंत संपूर्ण पालघर जिल्हा बंदिचे आदेश दिलेले असून प्रभावित शेत्र वसई विरार महानगरपालिका, बोईसर - सफाळे ग्रामपंचायत विभागात जनतेला रस्त्यावर फिरण्यासाठी तसेच वाहने फिरवण्यासाठी मज्जाव केलेला आहे

Sunday, March 28, 2021

चाफेवाडी - विराथन बुद्रुक प्रीमियर लीग २०२१ - संपन्न

चाफेवाडी - विराथन बुद्रुक प्रीमियर लीग २०२१ - संपन्न
पालघर(  हिरालाल लोखंडे ) दिनांक २४ मार्च २०२१ रोजी चाफेवाडी विराथन बुद्रुक ( मर्यादित ) येथे प्रीमियर लीग २०२१ क्रिकेट सामने आयोजित करण्यात आलेले. या खेळामध्ये गावातील
 १) स्पृहा स्टार संघ श्री शशिकांत घरत २) खुशी ११ संघ श्री अल्पेश भोईर ३) रिद्धी सिध्दी संघ श्री दशरथ घरत ४) आर्या संघ श्री महेश घरत. या एकूण चार संघांनी खेळात भाग घेतलेला. 
श्री कामनिष राऊत, श्री कुंदन राऊत, श्री सचिन पाटील, श्री दत्तात्रेय पाटील, श्री प्रदीप घरत, श्री दिनकर किणी आदी प्रमुख पाहुणे म्हणून बक्षीस समारंभात व्यासपीठावर विराजमान होते. प्रथम विजेता संघ स्पृहा स्टार, द्वितीय विजेता संघ खुशी ११, उत्कृष्ट फलंदाज ट्रॉफी श्री आशु भोईर, उत्कृष्ट गोलंदाज ट्रॉफी श्री प्रणय पाटील, मालिका वीर उत्कृष्ट ट्रॉफी श्री सुरेंद्र घरत, विजेते संघ - उत्कृष्ट फलंदाज - गोलंदाज यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. प्रथम विजेता स्पृहा स्टार संघ  मालक श्री  शशिकांत घरत, कर्णधार कुमार प्रणय पाटील, सुरेंद्र घरत, शुभम घरत, आशु भोईर, योगेश घरत, भूपेश घरत, पद्माकर घरत, सारंग घरत, अजय किणी, गणेशा घरत, धैर्य घरत, रविंद्र किणी, मिलींद किणी, आदी, कोव्हिडा १९ च्या नियमांचे पालन करित सामन्यांचे आयोजन आयोजकांनी केले असल्याचे आयोजकांनी सांगितले  आहे.

ओमटेक्स आयसीडब्लूसी क्रिकेट इन्स्टिट्यूटतर्फे गुणवत्ता शोध कार्यक्रम

ओमटेक्स आयसीडब्लूसी क्रिकेट इन्स्टिट्यूटतर्फे गुणवत्ता शोध कार्यक्रम
सफाळे(प्रतिनिधी)ओमटेक्स आयसीडब्लूसी क्रिकेट इन्स्टिट्यूट, सफाळे या संस्थेने गुणवत्ता शोध कार्यक्रम जाहीर केला आहे.
ओमटेक्स आयसीडब्लूसी क्रिकेट इन्स्टिट्यूट या संस्थेने सफाळे येथे आठ एकर परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे.या प्रशिक्षण केंद्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान व इन डोअर क्रिकेट प्रशिक्षण केंद्र विकसित करण्यात आले आहे.इनडोअर प्रशिक्षण केंद्रात ईबाको या जर्मन कम्पनीकडून टर्फ बसविण्यात आले असून पिच व्हिजन ह्या इंग्लड मधील कंपनीचे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.गुणवन्त क्रिकेटपटूंना  तंत्रशुद्ध व आधुनिक प्रशिक्षणाचा लाभ मिळावा या उद्देशाने या संस्थेने दि.२, ३ व ४ एप्रिल रोजी टॅलेंट हंट कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.या कार्यक्रमा अंतर्गत दि.२ एप्रिल रोजी १९ वर्षा खालिल, दि.३ एप्रिल रोजी १६ वर्षा खालिल तर ४ एप्रिल रोजी १४ वर्षा खालिल क्रिकेटपटूसाठी निवड चाचणी घेण्यात येणार आहे.या निवड चाचणीतून प्रत्येक गटातून एक गुणवंत मुलगा व एका मुलीची निवड करण्यात येणार आहे.निवड झालेल्या गुणवन्त क्रिकेटपटूंना तज्ञ क्रिकेट प्रशिक्षकांकडून एक वर्ष विनामूल्य प्रशिक्षण शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.अधिक माहितीसाठी 9321438723 या क्रमांकावर सम्पर्क साधावा.या योजनेचा गुणवन्त क्रिकेटपटूंनी लाभ घ्यावा असे आवाहन ओमटेक्स आयसीडब्लूसी क्रिकेट इन्स्टिट्यूटचे प्रकल्प प्रमुख माजी कसोटीपटू श्री.सुरू नायक यांनी केले आहे.

Saturday, March 27, 2021

तलाठी अशोक अहिरे, यांच्या वारसांना 50 लाख रुपये मंजूर

.     *तलाठी अशोक  अहिरे,  यांच्या  वारसांना 50 लाख रुपये मंजूर*

   पालघर(प्रतिनिधी) दि 27 :    जिल्हाधिकारी पालघर यांच्या अधिपत्याखालील तहसील कार्यालय पालघर यांच्या

आस्थापनेवरील कार्यरत तलाठी कर्मचारी  अशोक भिमराव अहिरे,  यांचा कर्तव्य पार पाडतांना कोरोना विषाणू संसर्गाने दि. २७/०९/२०२० रोजी मृत्यू झाला  . त्यानुसार वित्त विभागा कडील शासन निर्णय दि, १४/१०/२०२०, महसूल विभागाकडील शासन ज्ञापन दि. २३/०३/२०२१  विभागीय आयुक्त कोकण विभाग यांचेकडील दिनांक २४/०३/२०२१ व  जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ  यांच्या कडील आदेश दि. २६/०३/२०२१ रोजीच्या आदेशान्वये  अशोक भिमराय अहिरे,  यांच्या नामनिर्देशित वारसांना रु. ५०,००,०००/- (अक्षरी- रुपये पन्नास

लक्ष ) एवढया रकमेचे सानुग्रह सहाय्य मंजूर करण्यात आले आहे.

Friday, March 26, 2021

ओमटेक्स आयसीडब्लूसी क्रिकेट इन्स्टिट्यूटतर्फे गुणवत्ता शोध कार्यक्रम

ओमटेक्स आयसीडब्लूसी क्रिकेट इन्स्टिट्यूटतर्फे गुणवत्ता शोध कार्यक्रम
पालघर (प्रतिनिधी)ओमटेक्स आयसीडब्लूसी क्रिकेट इन्स्टिट्यूट, सफाळे या संस्थेने गुणवत्ता शोध कार्यक्रम जाहीर केला आहे.
ओमटेक्स आयसीडब्लूसी क्रिकेट इन्स्टिट्यूट या संस्थेने सफाळे येथे आठ एकर परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे.या प्रशिक्षण केंद्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान व इन डोअर क्रिकेट प्रशिक्षण केंद्र विकसित करण्यात आले आहे.इनडोअर प्रशिक्षण केंद्रात ईबाको या जर्मन कम्पनीकडून टर्फ बसविण्यात आले असून पिच व्हिजन ह्या इंग्लड मधील कंपनीचे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.गुणवन्त क्रिकेटपटूंना  तंत्रशुद्ध व आधुनिक प्रशिक्षणाचा लाभ मिळावा या उद्देशाने या संस्थेने दि.२, ३ व ४ एप्रिल रोजी टॅलेंट हंट कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.या कार्यक्रमा अंतर्गत दि.२ एप्रिल रोजी १९ वर्षा खालिल, दि.३ एप्रिल रोजी १६ वर्षा खालिल तर ४ एप्रिल रोजी १४ वर्षा खालिल क्रिकेटपटूसाठी निवड चाचणी घेण्यात येणार आहे.या निवड चाचणीतून प्रत्येक गटातून एक गुणवंत मुलगा व एका मुलीची निवड करण्यात येणार आहे.निवड झालेल्या गुणवन्त क्रिकेटपटूंना तज्ञ क्रिकेट प्रशिक्षकांकडून एक वर्ष विनामूल्य प्रशिक्षण शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.अधिक माहितीसाठी 9321438723 या क्रमांकावर सम्पर्क साधावा.या योजनेचा गुणवन्त क्रिकेटपटूंनी लाभ घ्यावा असे आवाहन ओमटेक्स आयसीडब्लूसी क्रिकेट इन्स्टिट्यूटचे प्रकल्प प्रमुख माजी कसोटीपटू श्री.सुरू नायक यांनी केले आहे.

पालघर जिल्ह्यात २०%, ४०%अनुदानास पात्र शाळांच्या आदेशांचे वाटप जि. प. अध्यक्षा सौ भारतीताई कामडी यांच्या हस्ते वाटप

*पालघर जिल्ह्यात २०%, ४०%अनुदानास पात्र शाळांच्या आदेशांचे वाटप जि. प. अध्यक्षा सौ भारतीताई कामडी यांच्या हस्ते वाटप*
पालघर (प्रतिनिधी)महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णय दि.१२/०३/२०२१नुसार पालघर जिल्ह्यातील एकूण २६ शाळा व ५वर्ग तुकड्या वाढीव २०% म्हणजे ४०% अनुदानासाठी टप्पा अनुदानावर तसेच ३शाळा व २ वर्ग तुकड्या २०%अनुदानास पात्र घोषित झाल्या आहेत.या मुळे पालघर जिल्यात १० ते १५वर्षापासून प्रतीक्षेतअसणारे खाजगी अनुदानित २७२ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या वेतनास पात्र ठरले आहेत त्या शाळांच्या अनुदानाचे आदेश दि२६/०३/२०२१ रोजी जि.प. अध्यक्षांच्या दालनात  अध्यक्षा तथा शिक्षण सभापती *मा सौ. भारतीताई कामडी*, 
बांधकाम सभापती *मा. श्री. काशिनाथजी चौधरी*, 
जि. प. सदस्य *मा. श्री.प्रकशजी निकम*,
शिक्षणाधिकारी(माध्य) *मा.सौ. संगीता भागवत* 
यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या वेळी 
उपशिक्षणाधिकारी *मा श्री नरेश पाटील*, 
उपाध्यक्ष शिक्षक सेना पालघर जिल्हा *मा.श्री.रविंद्र नाईक* 
व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते
अनुदान मिळण्यासाठी अध्यक्षा मा सौ. भारतीताई कामडी यांचे मार्गदर्शन, शिक्षणाधिकारी मा. सौ. संगिता भागवत,उप शिक्षणाधिकारी मा. श्री. नरेश पाटील मा. श्री. कासले यांचे विशेष प्रयत्न व सर्व कर्मचारी यांचे सहकार्य मोलाचे ठरले
सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, सर्व संघटना यांनी या सर्वांचे आभार मानून  आनंद व्यक्त केला
२७२ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना १नोव्हेंबर २०२०पासून या वेतनाचे लाभ मिळणार आहेत

जिल्ह्यातील शासकीय व्यवहार हाताळणाऱ्या बँकाना बुधवार दि. ३१ मार्च २०२१ रोजी रात्री उशिरापर्यंत बँक चालू ठेवण्याचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांचे आवाहन

*जिल्ह्यातील शासकीय व्यवहार हाताळणाऱ्या बँकाना बुधवार दि. ३१ मार्च २०२१ रोजी रात्री उशिरापर्यंत बँक चालू ठेवण्याचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांचे आवाहन*

पालघर (प्रतिनिधी)दि.  :वित्तीय वर्ष २०२०-२०२१ अखेर कोषागार तसेच अधिनस्त उपकोषागारावर आहरण संवितरण अधिकारी यांच्याद्वारे सादर होणाऱ्या शासकीय अनुदाना संदर्भात व शासकिय मागण्या दि.३१ मार्च २०२१ रोजी पुर्ण होवुन त्यांचे प्रदान होणे आवश्यक आहे.

          दिनांक ३१ मार्च २०२१ हा वित्तिय वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने कोषागार व उपकोषागार कार्यालयाच्या काऊंटरवर ( गणनाफलकावर ) सादर होणारी सर्व प्रकारची देयके स्विकारुन ती नियमानुसार पारित करणे आवश्यक असल्याने त्यांचे धनादेश / ईएफटी / सीएमपी त्याच दिवशी संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांना निर्गमित करणे आवश्यक आहेत. तसेच या दिवशी शासकिय व्यवहार वाढण्याची शक्यता असल्यामुळे संबंधित बँकांची नियमित कामकाजाची वेळ वाढविणे अपरिहार्य आहे. महाराष्ट्र कोषागार नियम १९६८ मधील नियम ४०९ मध्ये जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेल्या अधिकारानुसार पालघर जिल्ह्यातील शासकीय व्यवहार हाताळणाऱ्या बॅका बुधवार दि. ३१ मार्च २०२१ रोजी रात्री उशिरापर्यंत चालू ठेवून शासकीय प्रदानाची कार्यवाही पूर्ण करण्यात यावी. सदर दिवशी पालघर जिल्ह्यामधील कोषागार / उपकोषागार कार्यालयांशी प्रत्यक्ष समन्वय साधुन शासकीय व्यवहार पूर्ण झाल्याची खात्री झाल्यानंतरच बँका बंद करण्याची कार्यवाही करावी.

जिल्हा परिषदेचा परंपरागत महिलाभिमुख अर्थसंकल्प*- काशीनाथ चौधरी



*जिल्हा परिषदेचा परंपरागत महिलाभिमुख अर्थसंकल्प*-           काशीनाथ चौधरी
पालघर (प्रतिनिधी)महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ चे कलम १३७ नुसार तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अर्थसंकल्पीय अंदाज १९६६ चे नियम ९ नुसार जिल्हा परिषदेचे स्वऊत्पन्नाचे सन २०२०-२१ चा सुधारीत अर्थसंकल्प व सन २०२१-२२ चा मूळ अर्थसंकल्प अंदाजपत्रक आज जिल्हा परिषदेच्या सर्व साधारण सभे मध्ये वित्त व बांधकाम समिती सभापती काशिनाथ चौधरी यांनी सादर केले.  हे अंदाजपत्रक सर्वानुमते मंजूर करण्यात आले. 
 
अध्यक्ष व सन्माननीय सभापती, सन्माननीय सदस्य यांचा सक्रीय सहभाग प्राप्त करुन घेऊन, सर्व सन्मा.समितीच्या निर्देशानुसार सर्व विभाग प्रमुखांच्या सहकार्याने आज सभापती अर्थ समिती जिल्हा परिषद या नात्याने पालघर जिल्हा परिषदेचा सन २०२०-२१ चा सुधारीत अर्थसंकल्प व सन २०२१-२२ चा मूळ अर्थसंकल्प सभागृहा पुढे सादर करताना मला आनंद होत असून  अभिमान पुर्वक नमुद करु इच्छीतो की,  यावर्षी सुद्धा पालघर जिल्हा परिषदेने सदर अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने महिला, आरोग्य, कृषी, दिव्यांग, समाज कल्याण व पाणिपुरवठा या विभागानाही विशेषत्वाने प्राधान्य देऊन अर्थसंकल्प बनविला आहे. महिलांचे आर्थिक सबलीकरण करणे, महिला सक्षमीकरण करणे, समाजाच्या मुख्य प्रवाहात महिलांना स्थान मिळवून देणे, सदर अनुषंगाने कुपोषणावर मात करुन कुपोषण निर्मुलन करणे हा या अर्थसंकल्पाचा मुळ उद्देश आहे. महिलांना केंद्रस्थानी ठेवून तसेच निधी खर्च करताना महिलांना प्राधान्य देऊन, पालघर जिल्हयातील महिलांचे सक्षमीकरण करण्याचा उद्दिष्ट ठेवून सदरचा अर्थसंकल्प बनविण्यात आला आहे. जिल्हयातील दिव्यांगाना लाभ देण्यासाठी या वर्षाच्या अर्थसंकल्पात दिव्यांग व्यक्तींना व्यावसायिक संगणक प्रशिक्षणासाठी अनुदान, दिव्यांग पालकांच्या पाल्यांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य, दिव्यांग शेतकऱ्यांना शेती पूरक व्यवसायासाठी अर्थसहाय्य शेळीपालन कुक्कुटपालन इ., दिव्यांग प्रतिबंध व लवकर रोग निदान व दिव्यांगाच्या दृष्टीने अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देणे. दिव्यांग शेतकऱ्यांना उत्पन्नाची अट न ठेवता शेती पुरक अवजारासाठी अर्थसहाय्य तसेच दिव्यांग व्यक्तींना
स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य करणे इत्यादी नव्याने योजनांचा समावेश करणेत आलेला आहे. असे काशिनाथ चौधरी  यांनी आपल्या प्रस्तावनेतून स्पष्ट केले.

महिलांचे नाव ७/१२ वर यावे या उद्देशाने, केवळ महिलांना साहित्य पुरविणे, विशेष प्राविण्य मिळालेल्या मुलींचा सत्कार करणे. तसेच मुलींना कन्यादान साहित्य वाटप करणे इत्यादी योजनांचा सदर अर्थसंकल्पामध्ये समावेश करण्यात आला आहे. सदर योजना अंमलबजावणी अनुषंगाने महिलांचे नाव ७/१२ वर येण्यासाठी महसुल प्रशासनाकडे विशेष पाठपुरावा करण्यात येणार आहे. तसेच 
पशुसंवर्धन विभागातंर्गत विविध योजनां बरोबरच, महिलांना पशुपालन शेळीगट खरेदीसाठी अर्थसहाय्य व पशुपालन दुधाळ जनावरे खरेदीसाठी अर्थसहाय्य करणे या नविन योजनेचा समावेश करण्यात आला आहे.  मा.न्यायालयाच्या निर्देशानुसार तसेच सामाजिक बांधीलकीच्या अनुषंगाने दिव्यांग कल्याणासाठी सुध्दा योग्य ती तरतूद करण्यात आली आहे, त्यामध्ये दिव्यांग महिलांना साहित्य पुरविणे, दिव्यांग शेतकन्यांना २०% अनुदानाने कृषी साहित्य पुरविणे इत्यादी योजनांचा समावेश करण्यात आला आहे.

नैसर्गीक आपत्तीच्या वेळी संबंधितांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी ,त्या अनुषंगाने सदर अर्थसंकल्पात यावर्षी सुद्धा नैसर्गीक आपत्तीच्या  लाभार्थ्यांना अर्थसहाय्य या योजनेचा समावेश करुन त्यासाठी तरतुद करण्यात आलेली आहे.

आरोग्य विभागामार्फत जिल्हा परिषदेच्या आरोग्य संस्थाच्या बळकटीकरणासाठी विशेष अनुदानाची तरतुद करण्यात आलेली असुन, ग्रामिण भागांतील जनतेला चांगल्या प्रकारच्या आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी सोई उपलब्ध करण्याबाबत तरतुद करण्यात आलेली आहे.

जिल्हा परिषदेचा सन २०२०-२१ चा मूळ अर्थसंकल्प तयार करताना महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमातील तरतूदीचे व ग्रामविकास विभाग व जलसंधारण विभागाने निर्गमित केलेले शासन निर्णय, अधिसूचनांप्रमाणे जिल्हा परिषद उत्पन्नाच्या ठराविक बाबीच्या २०% रक्कम समाजकल्याण व १०% रक्कम महिला व बालकल्याण विभागासाठी ठेवण्यात आलेली आहे. दिव्यांगासाठी ५%,शिक्षण विभाग शाळा देखभाल व दरुस्ती करीता ५% तसेच पाणी पुरवठा व देखभाल दुरुस्ती करीता २०% रक्कम ठेवण्यात आली आहे.
 जिल्ह्यातील  विदयार्थ्याचा शैक्षणिक दर्जा उंचविण्यासाठी प्रयत्न करणेत आले आहेत, संगणकीय युग लक्षात घेता जिल्हा परिषदशाळांमध्ये ई-लर्निंग उपक्रम राबविण्यात येणार आहे, जिल्हयातील स्कॉलरशिप प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा  सत्कार योजना राबविण्यात येणार असुन त्यामुळे इतर विदयाथ्यांना प्रोत्साहन मिळणार आहे. पुर्व उच्च प्राथमिक व पुर्व  माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षा फी भरणे व शिष्यवृत्ती परिक्षेसंबंधित पुस्तकांचा पुरवठा करणे ही योजना राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील बहुतांश जि.प. शाळांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे, हे लक्षात घेवुन व यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून पुरेशी तरतुद प्राप्त होत नसल्याने जि.प.अर्थसकल्पांतर्गत तरतुद करण्यात आली आहे. शाळांतील गुणवत्ता वाढावी म्हणून इस्त्रो भेटीचे आयोजन करणे, शाळांतील पटसंख्या रोखण्यासाठी शिक्षक दुत नेमणुक करणे तसेच ऑनलाईन शिक्षण उपक्रमासाठी अॅप व पोर्टल तयार करणे या नविन योजनांचा समावेश करुन अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद करण्यात आलेली आहे.

पालघर जिल्हयातील शेती व्यवसायास चालना देण्यासाठी शेतक-यांना सुधारित कृषि अवजारे पुरवठा, किड रोग नियंत्रण, ताडपत्री पुरवठा इ. योजना घेण्यात आल्या आहेत. सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देणेची योजना व फुल शेतीसाठी अर्थसहाय्य योजना या योजनांचा तसेच शेततळी अस्तरीकरण करण्यासाठी अनुदान व शेतकऱ्यांना फळबाग व भाजीपाला लागवडीसाठी अर्थसहाय्य या नविन योजनांचा अर्थसंकल्पात समावेश करणेत आलेला आहे.

पशुसंवर्धन विभागांतर्गत दुग्धव्यवसाय विषयाच्या अनुषंगाने महिला पशु पालकांना संकरीत गाई खरेदी, शेळीगट व सुधारीत जातीच्या म्हशी वाटप योजना राबविण्यात येणार आहे.  

पालघर जिल्हयातील सामाजिक विकासाच्या अनुषंगाने समाजकल्याण विभागांतर्गत मागासवर्गीय  विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अर्थसहाय, मागासवर्गीय वस्तीत जोडरस्ते बांधणे, मागासवर्गीय लाभाच्यांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय, जि.प. मालकीच्या अनुदानीत वस्तीगृहाच्या इमारतीची देखभाल व दुरुस्ती इत्यादी विविध योजनांमध्ये तरतूद करण्यात आली आहे. तसेच मागासवर्गीय वस्तीमधील समाजमंदीराचे ग्रंथालय / अभ्यासिकेत रुपांतर करण्यासाठी सोयी सुविधा करणे. मागासवर्गीय शेतकऱ्यांना शेतीची अवजारे पुरविणे व जि.प. मालकीच्या वस्तीगृहांना अभ्यासिका व इतर सुविधा पुरविणे या नविन योजनांसाठी पुरेशी तरतुद करण्यात आलेली आहे.

महिला व बाल विकासाच्या अनुषंगाने महिलांना कायदेशीर सल्ला देणे, मुलांना सायकल पुरविणे. संगणक प्रशिक्षण देणे, अंगणवाडी केंद्र दुरुस्ती तसेच शासन निर्देशानुसार महिला व मुलींच्या विकासाच्या व आरोग्याच्या अनुषंगाने त्यांच्या प्रशिक्षणासाठी आवश्यक तरतूद करण्यात आली आहे. बहुतांश अंगणवाडी केंद्रांना स्वत:ची इमारत नसल्याचे निदर्शनास आल्याने नविन अंगणवाडी बांधकाम करणे या योजनेचा समावेश करण्यात आला आहे.

जि.प.अध्यक्षा, सर्व  सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करून सर्व विभागप्रमुखांना अनुदान उपलब्ध करूनदेणेत आले असून त्यानुसार शासन आदेशित वेळापत्रकानुसार प्रभावी नियोजन करून सर्व
विभागप्रमुख सदरच्या निधीचे विनियोग पुढील आर्थिक वर्षांमध्ये योग्यप्रकारे व विहित कालावधीमध्ये करतील अशी मी आशा यावेळी चौधरी  यांनी व्यक्त केली.   न्यायालयाच्या निर्देशानुसार दिव्यांगासाठी करणेत आलेल्या ५% निधीचा विनियोग विभागप्रमुखांनी अपंगांसाठी योग्य प्रकारे करावा असे निर्देश देऊन सर्व विभाग प्रमुखांनी पालधर जिल्हयातील दिव्यांग लाभाध्य्यापर्यंत योजना पोहचविण्यासाठी आवश्यक ती योजनांची जाहिरात करावी अशी विनंती केली. 

सदरचा अर्थसंकल्प तयार करताना मा. अध्यक्षा, मा.उपाध्यक्ष माझे सहकारी ,सर्व विषय समिती  सभापती यांनी  केलेल्या सूचनांमुळे व सहकार्यामुळे  अर्थसंकल्प मी सादर करु शकलो. म्हणून सर्वांबददल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच जिल्हा परिषदेचे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी  सिद्धाराम सालीमठ, मा.अति.मुख्य कार्यकारी अधिकारी  चंद्रकांत नि.वाघमारे मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिनेशकुमार थोरात, अर्थ विभागातील अधिकारी व कर्मचारी त्याचप्रमाणे सर्व विभाग प्रमुख च त्यांचे
सहकारी  यांचाही अर्थ संकल्प तयार करण्यात महत्वाचा वाटा आहे, या सर्वांचा मी आभारी आहे. अशा भावना यावेळी काशिनाथ चौधरी यांनी व्यक्त केल्या.
विरोधी पक्ष नेत्या सुरेखा थेतले, सदस्य मनीषा निमकर,  प्रकाश निकम,वैदेही  वाढाण, अनिल झिरवा यांनी आपापल्या पक्षाच्या वतीने अर्थसंकल्पाचे स्वागत करून अभिनंदन केले.

Thursday, March 25, 2021

बिस्लेरीच्या `बॉटल्स फॉर चेंज' या उपक्रमांतर्गतवसई येथे `सेव्ह द अर्थ फाऊंडेशन व वसई - विरार महानगरपालिका' यांच्या संयुक्त विद्यमाने ` प्लास्टिक पुनर्वापर जनजागृती अभियान' कार्यक्रमाचे आयोजन

बिस्लेरीच्या `बॉटल्स फॉर चेंजया उपक्रमांतर्गत
वसई येथे `सेव्ह द अर्थ फाऊंडेशन व वसई विरार महानगरपालिकायांच्या संयुक्त विद्यमाने ` प्लास्टिक पुनर्वापर जनजागृती अभियानकार्यक्रमाचे आयोजन

 

वसई(ःप्रतिनिधी) `जागतिक पुनर्वापर दिनाचे'  औचित्य साधत  दिनांक 19मार्च 2021 रोजी वसई पापडीयेथे `प्लास्टिक पुनर्वापर जनजागृती अभियानकार्यक्रम बिस्लेरी इंटरनॅशनल लियांच्या `बॉटल्स फॉर चेंजया उपक्रमांतर्गत `सेव्ह द अर्थ फाऊंडेशन व वसई-विरार महानगरपालिकायांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजन करण्यात आला.

 प्लास्टिकच्या समस्येवर तज्ञ  विविध प्रकारची उपाययोजना करण्याचे प्रयत्न करीत आहेतयाचाच एक भाग म्हणून बिस्लेरीच्या `बॉटल्स फॉर चेंजया उपक्रमांतर्गत प्लास्टिकचा पुनर्वापर करून ते पुन्हा उपयोगात आणण्यासाठी योग्य पद्धतीने प्लास्टिक जमा करण्याबाबतचे `प्लास्टिक पुनर्वापर जनजागृती अभियानगेल्या 2 वर्षांपासून `सेव्ह  द अर्थ फाऊंडेशन'  संस्थेमार्फत  वसईमध्ये राबविले जात आहेया अभियानांतर्गत 2 टनाच्या आसपास प्लास्टिक गोळा करून ते पुनर्वापरासाठी पाठविण्यात आले आहे.

प्लास्टिक पुनर्वापरासाठी घरी वापरण्यात आलेल्या प्लास्टिकचे संकलन करताना ते वेगवेगळे व स्वच्छ धुवून कसे ठेवावे याबाबतची अतिशय उपयुक्त माहिती बिस्लेरी कंपनीच्या श्रीमश्रेया सुधीर यांनी उपस्थित नागरिकांना दिलीतसेच `प्लास्टिक ही समस्या नसून त्याचा पुनर्वापर केल्यास मानवी जीवनात त्याचा उपयोगच आहेअसे प्रतिपादन बिस्लेरी कंपनीचे सी.एस.आरप्रतिनिधी श्रीसंतोष दरणे यांनी केले.

वसई-विरार महानगरपालिकेसोबत संस्था हे प्लास्टिक संकलनाचे काम करणार असून या कार्यक्रमात प्लास्टिक संकलनाबाबत बोलताना वसई-विरार महानगरपालिकेचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्रीविकास पाटील यांनी महानगरपालिकेचे संपूर्ण सहकार्य या कामी संस्थेला मिळेल असे आश्वासन दिले आहे.

कार्यक्रमासाठी आलेल्या स्वच्छता दूत महिलांना प्लास्टिक गोळा कसे करावे व कसे वेगवेगळे ठेवावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आणि या महिला स्वच्छता दूतांची यावेळी आरोग्य तपासणीही करण्यात आली.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे श्रीसंतोष काकड यांनी केले होतेकार्यक्रमात  `सेव्ह द अर्थ फाऊंडेशनसंस्थेचे पदाधिकारीपर्यावरण रक्षक श्रीमेकेन्झी डाबरेवर्तक महाविद्यालयाचे प्राध्यापक श्रीहेमंत डोंगरेलायन्स क्लबचे श्रीहनुमंत भोसलेसामाजिक कार्यकर्ते जयंत हटकर इमान्यवर उपस्थित होते.

पत्रकारांनी कोरोना लस घेणे काळाची गरज - किशोर पाटील

पत्रकारांनी कोरोना लस घेणे काळाची गरज - किशोर पाटील
भिवंडी(प्रतिनिधी) दि.२४(स्व.रा.तो)  ठाणे जिल्ह्यातील मराठी दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोकण विभागीय सरचिटणीस श्री किशोर बळीराम पाटील यांनी आपल्या    कोकण विभागातील ठाणे,पालघर,रायगड, सिंधुदुर्ग,नवी मुंबई, व पुणे जिल्ह्यातील सर्व  पत्रकार बंधु भगिनींना दैनिक स्वराज्य तोरण  च्या माध्यमातून   जाहीर आवाहन केले आहे की, कोरोना चा प्रादुर्भाव  आता पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढत आहे.मागील २०२० या  वर्षात पत्रकारांनी चांगल्या प्रकारे  प्रशासनाला सहकार्य केले आहे .अशा माझ्या सर्व पत्रकार बंधु भगिनींनी कोविड योद्धा म्हणून  कोरोना प्रतिबंधक लस प्राधान्याने  प्रशासनाकडून तपासणी करून घ्यावी.व आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.कारण कोरोना चा प्रादुर्भाव  आता पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढत चालला असून रुग्णाची संख्याही वाढत आहे.त्यातच भिवंडी शहरातील ज्येष्ट पत्रकार  तथा  दैनिक सामनाचे प्रतिनिधी रतन कुमार तेजे यांचा कोरोना मुळे  दि.२१/०३/२०२१ रोजी मृत्यू झाला. ही पत्रकारिता क्षेत्राला उतरती कळा लागली आहे.मागील वर्षीही अनेक पत्रकारांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.त्यामुळे आता आपण सतर्क राहिले पाहिजे माझा मास माझी सुरक्षा,माझे कुटुंब माझी जबाबदारी, मी जबाबदार या शासनाच्या नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे.आपण सर्वांनी  लेटेस्ट बातम्या साठी कितीही धावपळ केली तरी आपल्या साठी काही बिकट प्रसंगी कोणीही धाव घेणारा नसेल. त्यावेळी फक्त आपले कुटुंबच आपल्या सोबत असते.आपण ज्यांच्या बातम्या लावण्यासाठी जीवाचे रान करतो त्या व्यक्तीही आपल्याला साथ देयाळा  अशा कठीण परिस्तीतीत येत नाही.म्हणून आपण सर्वांनी वेळीच आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे.सर्व प्रथम आपण कोरोनाची लस घेणे गरजेचे आहे.त्यानंतर आपल्या कुटुंबाची जबाबदारी घ्यावी लागेल.कारण आपल्या साठी ती काळाची गरज आहे.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सध्या कोरोना प्रतिबंधक लस नागरिकांना देण्याचे कार्य राज्यात सुरू आहे तसेच सर्व महानगर पालिका,नगर पालिका, तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सुरू आहे . ही लस देताना विविध टप्पे ठरवले असून लाभार्थी प्राधान्य क्रम ही ठरवण्यात आला आहे. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोलाचे योगदान देणारे माझे पत्रकार  बंधू भगिनी अद्यापही या प्रतिबंधक लसीपासून वंचित आहेत. त्यांनी  आपल्या संपूर्ण चाचण्या तपासून लस घेणे काळाची गरज आहे असे मला वाटते.असे संपादक श्री किशोर बळीराम पाटील यांनी सर्वांना आवाहन केले आहे.....
 व ज्या माझ्या पत्रकार बाधवांचा कोरोना मुळे मृत्यू झाला त्यांच्या कुटुबियाना राज्य सरकारने तातडीने अंमलबजावणी करून मदत करावी अशी मागणी ही या प्रसंगी राज्य सरकारला करत आहे....

Tuesday, March 23, 2021

श्री महेश टेटांबे - पत्रकार,आदर्श सेवा पुरस्काराने सन्मानित

श्री महेश टेटांबे - पत्रकार,
आदर्श सेवा पुरस्काराने सन्मानित 
सोलापूर ( हिरालाल लोखंडे ) श्री महेश टेटांबे यांना सोलापूर जिल्हयातील धाकटी - सांगोला येथील जिजामाता मल्टिपर्पज सभागृहात, लोकप्रिय दैनिक तुफान क्रांतीच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते " आर्दश सेवा " सन्मान पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले, या प्रसंगी श्री मिर्झा गलिब  मुजावर, - संपादक, तुफान क्रांती, श्री सुधाकर भागाडे - नायब तहसिलदार, श्री फैजुम मुजावर, श्री रजाक मुजावर, श्री राहुल खरात - पत्रकार,आदि मान्यवर उपस्थित होते.श्री टेटांबे यांनी अनेक सिनेमा - मालीका मध्ये अभिनय केलेला असून ई टीव्ही वरील क्राईम डायरी या लोकप्रिय मालिकेतील ५०० हून अधिक एपिसोड केलेले आहेत. ते स्वतः सिनेनाट्य दिग्दर्शक असून त्यांनी वेबससीरिज स्वार्थ, शिदोरी, ७७७ रूपयात बाबा, अश्या अनेक लघुचित्रपटाचे लेखन - दिग्दर्शन केलेले आहे. त्यांना स्वतःच्या " पुरस्कार " या एकांकिकेवर आधारित मराठी चित्रपट बनविण्याचा मानस आहे. त्यांना आता पर्यंत पत्ररत्न, पत्रमहर्षी, पत्रविभुषण, जागृत पत्रलेखक, समाज रत्न, समाज भूषण असे एकापेक्षा अनेक पुरस्काराने सन्मानीत करण्यात आलेले आहे. त्यांचे अनेक चाहते असून त्यांच्या कार्यांचे सर्व स्तरातील जनते कडुन अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा त्यांना देण्यात येत आहे .
श्री लक्ष्मण राजे यांच्या कडुन प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे

Monday, March 22, 2021

मातोश्री कॉलेज ऑफ फार्मसी मधील विद्यार्थांचे जी पॅट परीक्षेत घवघवित यश.

मातोश्री कॉलेज ऑफ फार्मसी मधील विद्यार्थांचे जी पॅट परीक्षेत घवघवित यश.
नाशिक प्रतिनिधी / तुषार बऱ्हे.

एकलहरे येथील मातोश्री कॉलेज ऑफ फार्मसीच्या फायनल वर्षाचा विद्यार्थ्यांनी जी पॅट परीक्षेत खूप चांगल्या मार्कांनी पास होवून घवघवित यश संपादन केले आहे.
मातोश्री कॉलेज ऑफ फार्मसीने दरवर्षी प्रमाणे ह्याही वर्षी  जी पॅट परिक्षेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. एम फार्मसीच्या प्रवेशासाठी जी पॅट ची परीक्षा घेतली जाते. या परिक्षेत महाविद्यालयातील राहुल मोरीया, ऋतुजा विखे, आदित्य खेरूडकर, पूजा गांगुर्डे,  तेजस्विनी सोनावणे, अपेक्षा मोरे, अक्षय गिते या विद्यार्थांनी सर्वाधिक गुण मिळवून यश संपादन केले आहे. विद्यार्थांचे  हे यश आणि सर्वाधिक जी पॅट परीक्षेचा निकाल लागण्यासाठी फार्मसी कॉलेजच्या सर्व शिक्षकांनी  आणि प्राचार्य डॉ.गोकुळ तळेले सर यांनी खूप प्रयत्न केले. प्राचार्य सर बी.फार्मसी विभाग प्रमुख सचिन कापसे सर आणि डी. फार्मसी विभाग प्रमुख प्रशांत चव्हाण सर यांच्या संमतीने विद्यार्थ्यांसाठी सेमिनार आयोजित केले तसेच सुसज्ज ग्रंथालय, पुस्तकांची उपलब्धता, लॅब मधील प्रात्यक्षिके आणि  वेळोवेळी विद्यार्थांच्या टेस्ट सिरीज  घेण्यात आल्या. विद्यार्थी आणि शिक्षकांच्या समन्वयामुळे मुलांची अभ्यासात अधिक रुची वाढली आणि विद्यार्थांना अवघड विषय सोपे होऊन समजण्यास मदत झाली. प्राचार्य डॉ. गोकुळ तळेले यांच्या मार्गदर्शनामळे कोविड काळात शिक्षकांनी विद्यार्थांना जी पॅट चे व्हिडिओ, पी. पी. टी., तसेच गेस्ट लेक्चर घेऊन जास्तीत जास्त महिती विद्यार्थ्यांपर्यंत पोचविली. मातोश्री एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री.कुणाल दराडे यांनी विद्यार्थ्यांचे आणि सर्व शिक्षक वर्गाचे अभिनंदन केले, तसेच फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.गोकुळ तळेले तसेच  सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. सर्व यशस्वी विद्यार्थांना परिश्रमपूर्वक अध्यापन करणाऱ्या  मातोश्री कॉलेज ऑफ फार्मसी च्या शिक्षकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

जिल्हयातील सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, रिसॉर्ट व सार्वजनिक सभागृहे येथे धुलीवंदन कार्यक्रमास मनाई

जिल्हयातील सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, रिसॉर्ट व सार्वजनिक सभागृहे येथे धुलीवंदन कार्यक्रमास मनाई

पालघर (प्रतिनिधी)दि. २२ :- राज्यात व जिल्हयामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याने दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत आहे. कोरोना विषाणुचा (कोविड-१९) संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. तसेच जिल्हयामध्ये कोरोना विषाणूचा (कोविड-१९) संसर्ग झालेले रुग्ण आढळून आलेले आहेत. सदर संसर्ग पसरत असल्याची बाब विचारात घेता, जिल्हयातील सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, रिसॉर्ट व सार्वजनिक सभागृहे येथे धुलीवंदन कार्यक्रमास मनाई करणे आवश्यक आहे.

आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ व महाराष्ट्र कोव्हिड १९ उपाययोजना नियम, २०२० चा नियम १० नुसार पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये पालघर जिल्हयातील सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, रिसॉर्ट व सार्वजनिक सभागृहे येथे धुलीवंदन कार्यक्रमास मनाई करण्यात येत आहे.

सदरहू आदेशाचे उल्लंघन केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील ५१(b), भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) च्या कलम १८८ व साथ रोग नियंत्रण अधिनियम १८९७ नुसार दंडनिय/कायदेशीर कारवाईस पात्र राहील.

जिल्ह्यातील शासकीय व्यवहार हाताळणाऱ्या बँकाना बुधवार दि. ३१ मार्च २०२१ रोजी रात्री उशिरापर्यंत बँक चालू ठेवण्याचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांचे आवाहन

*जिल्ह्यातील शासकीय व्यवहार हाताळणाऱ्या बँकाना बुधवार दि. ३१ मार्च २०२१ रोजी रात्री उशिरापर्यंत बँक चालू ठेवण्याचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांचे आवाहन*


पालघर (प्रतिनिधी)दि. 22 :वित्तीय वर्ष २०२०-२०२१ अखेर कोषागार तसेच अधिनस्त उपकोषागारावर आहरण संवितरण अधिकारी यांच्याद्वारे सादर होणाऱ्या शासकीय अनुदाना संदर्भात व शासकिय मागण्या दि.३१ मार्च २०२१ रोजी पुर्ण होवुन त्यांचे प्रदान होणे आवश्यक आहे.

          दिनांक ३१ मार्च २०२१ हा वित्तिय वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने कोषागार व उपकोषागार कार्यालयाच्या काऊंटरवर ( गणनाफलकावर ) सादर होणारी सर्व प्रकारची देयके स्विकारुन ती नियमानुसार पारित करणे आवश्यक असल्याने त्यांचे धनादेश / ईएफटी / सीएमपी त्याच दिवशी संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांना निर्गमित करणे आवश्यक आहेत. तसेच या दिवशी शासकिय व्यवहार वाढण्याची शक्यता असल्यामुळे संबंधित बँकांची नियमित कामकाजाची वेळ वाढविणे अपरिहार्य आहे. महाराष्ट्र कोषागार नियम १९६८ मधील नियम ४०९ मध्ये जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेल्या अधिकारानुसार पालघर जिल्ह्यातील शासकीय व्यवहार हाताळणाऱ्या बॅका बुधवार दि. ३१ मार्च २०२१ रोजी रात्री उशिरापर्यंत चालू ठेवून शासकीय प्रदानाची कार्यवाही पूर्ण करण्यात यावी. सदर दिवशी पालघर जिल्ह्यामधील कोषागार / उपकोषागार कार्यालयांशी प्रत्यक्ष समन्वय साधुन शासकीय व्यवहार पूर्ण झाल्याची खात्री झाल्यानंतरच बँका बंद करण्याची कार्यवाही करावी.
0000000

जागतिक जलदिनानिमित्त जिल्ह्यात पाणी संवर्धन व बचत करण्याच्या जनजागृती सप्ताहास सुरुवात


*जागतिक जलदिनानिमित्त जिल्ह्यात पाणी संवर्धन व बचत करण्याच्या जनजागृती सप्ताहास सुरुवात*
 पालघर (प्रतिनिधी)प्रत्येक जीवनासाठी पाणी हा महत्त्वाचा नैसर्गिक स्त्रोत आहे.या पाण्याचे महत्त्व अधोरेखीत करुन त्याचा सर्वकाळ उपलब्धता , सुरक्षितता आणि शाश्वत वापरासाठी व्यापक प्रमाणावर जनजागृती करण्यासाठी जागतिक जल दिनाचे औचित्य साधुन सोमवार दि.२२ मार्च २०२१ रोजीपासुन जिल्ह्यात दि.२२ मार्च ते दि.२७ मार्च २०२१ या कालावधीत जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली.
                याबाबत जागतिक जल दिन दिनांक 22 मार्च 2021 निमित्त  मुख्य कार्यकारी अधिकारी मा. सिद्धाराम सालीमठ यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद पालघर  मधील सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी यांनी, पाणी बचतीबाबत जल शपथ घेतली. याप्रसंगी सर्व विभागांचे विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.दरवर्षी २२ मार्च हा दिवस जागतिक जलदिन म्हणून सर्वत्र साजरा होतो.त्या अनुषंगाने पाण्याचे महत्व लक्षात घेऊन ते सर्वकाळ उपलब्धतेसाठी आणि शाश्वत वापरासाठी व्यापक प्रमाणावर जनजागृतीपर असे विविध उपक्रम आयोजित करणे अपेक्षित आहे.या पार्श्वभूमीवर जागतिक जल दिनाच्या निमित्ताने पाण्याचे महत्व, पाणी पुरवठ्यासाठी वापरात येणारे जलस्रोत यांचे संवर्धन, संरक्षण आणि जुन्या नादुरुस्त जलस्रोतांचे पुनरुज्जीवन, तसेच मोठ्या प्रमाणावर होणारी योजनांमधील पाणी गळती थांबविणे गरजेचे आहे. ग्रामीण जनतेला शुद्ध, पुरेसे  आणि शाश्वत पाणी उपलब्ध होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशन कक्ष व ग्रामीण पुरवठा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पाणी शुद्धता , पाणी वाचवा , पाणी सुरक्षितता आदीबाबत विविध उपक्रम जिल्ह्यातील सर्व तालुक्यात गट विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत स्तरावर दि.२२ मार्च ते २७ मार्च २०२१ दरम्यान आयोजित करण्यात आले आहेत. या सप्ताहांर्तगत २२ मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील जिल्हा,तालुका व ग्रामपंचायत स्तरावर जलप्रतिज्ञा घेऊन जलसप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला यानिमित्ताने .''जुनं ते सोनं जल स्त्रोतांचे पुनरुज्जीवन आणि बळकटीकरण स्पर्धा, 
स्त्रोत व साठवण टाकी जलकुंभ साफ -सफाई सप्ताह,
पाणी वाचवा- पाणी वाचवण्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत जागतिक जल दिनाचे महत्त्व सांगून त्यांना आवाहन करणे, शुन्य गळती मोहीम,
जल जीवन मिशन लोगो स्पर्धा, पाण्यावरील लोक गीतं, पोस्टर, रांगोळी स्पर्धा, जलसाक्षरता या विषयावर नाटिका, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा अशा उपक्रमासह
२३ मार्च रोजी ग्रामपंचायत , शाळा , अगणवाडी स्तरावर शुद्ध पाण्याचे महत्त्व समजावून सांगणे आणि सप्ताहाची व्यापकता पटवून देणे , २४ मार्च रोजी पाणी जपून वापरण्याची आवश्यकता व पद्धती डिजीटल माध्यमांचा वापर करुन समजावून सांगणे , २५ मार्च रोजी पिण्याचे पाणी तपासणीमध्ये दुषित आलेल्या स्त्रोतांचे उपाययोजना व दुरुस्तीबाबत माहिती देणे , २६ मार्च रोजी पाणी शुद्धीकरण कार्यपद्धती व टीसीएल वापर याबद्दल व २७ मार्च रोजी सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत व साठवण टाकीची स्वच्छता करणे , शुन्य गळती मोहिम , नादुरुस्त स्त्रोत दुरुस्त करणे आदी उपक्रम राबविले जाणार आहेत.
   दरम्यान सदरचे उपक्रम राबविताना कोरोना प्रतिबंधक नियमावलीच्या उपाययोजनेबाबत केलेल्या नियमांचे पालन होईल याची दक्षता घ्यावी असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( पाणी व स्वच्छता ) प्रवीण भावसार यांनी केले आहे.

"हि प्राइड अवॉर्ड " व्दारा पत्रकार श्री लक्ष्मण राजे सन्मानित

"हि प्राइड अवॉर्ड " व्दारा पत्रकार श्री लक्ष्मण राजे  सन्मानित 
सफाळे ( हिरालाल लोखंडे ) फन २ लर्न या संस्थेद्वारे जगभरातील विवीध शेत्रातील सीईओ, चेअरमन, डायरेक्टर, अर्थतज्ञ, राजकीय विश्लेषक, डाॅक्टर, इंजिनीअर, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, यांना " हि प्राइड अवॉर्ड " व्दारा सन्मानित करण्यात येते. यावर्षी पत्रकार श्री लक्ष्मण राजे यांना पत्रकारितेच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रातील, आजवर दिलेल्या योगदानाबद्दल दखल घेऊन मा. रचना भीमरजका - सीईओ यांच्या हस्ते " हि प्राइड अवॉर्ड " देऊन सन्मानित करण्यात आले आहे. 
      फन टू लर्न या संस्थेच्या माध्यमातून आजवर संस्थेच्या सर्वोसर्वा माननीय  रचना भीमरजाक सीईओ यांनी एक लाख पंचवीस हजार विद्यार्थीना प्रशिक्षण दिले असून, शैक्षणिक शेत्रातील फन २ लर्न. या एका मोठ्या संस्थेच्या कार्यक्रमात श्री लक्ष्मण राजे पत्रकार यांना सन्मानित करण्यात आल्याबद्दल  राजे यांनी मनोगत व्यक्त करताना संस्थेचे प्रमुख व मान्यवरांचे आभार मानले. 
   " हि प्राइड अवॉर्ड " प्राप्त केल्याबद्द्ल श्री लक्ष्मण राजे यांचे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आणि कला शेत्रातील अनेक मान्यवरांनी  तसेच समाजातील सर्व स्तरांवरील लोकांकडून राजे यांचे मन:पुर्वक अभिनंदन करण्यात येऊन , पुढील यशस्वी वाटचालीस   हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Saturday, March 20, 2021

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा केंद्रावर मनाई आदेश लागु

*महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा केंद्रावर मनाई आदेश लागु*.
पालघर दि. 19 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने राज्यभरात राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020, रविवार, दि.21/03/2021 रोजी घेण्यात येत असून सदरची परीक्षा पालघर तालुक्यातील एकूण 05 उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे  सदरच्या परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम 144 (1)(2)(3) अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आलेला आहे.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग यांचेमार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यं सेवा पूर्व परीक्षा 2020 च्या  परिक्षा पुढील उपकेंद्रावर घेण्यात येणार आहेत    1) ट्विंकल  स्टार हायस्कूल, चार रस्ता, पालघर, ता.जि.पालघर 2) श्री.स तु कदम हायस्कूल (जिवन विकास), बोईसर-पालघर रोड, ता.जि.पालघर, 3) सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, खारेकुरण रोड, पालघर, ता.जि.पालघर part-A,4   ,            4) सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, खारेकुरण रोड, पालघर, ता.जि.पालघर Part-B, 5) सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, खारेकुरण रोड, पालघर, ता.जि.पालघर Part-C या परिक्षा केंद्रावर परीक्षा देणारे विद्यार्थी व परीक्षाविषयक कामकाज पाहणेकरिता नेमलेले अधिकारी/कर्मचारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी, तसेच अंध व अपंग परिक्षार्थी यांचे बरोबर आलेले नातेवाईकांखेरीज बेकायदेशिर जमावास परिक्षा केंद्राच्या सभोवताली 100 मीटर परिसरात रविवार दिनांक 21/03/2021 रोजी 00.01 ते 24.00 या कालावधीकरीता प्रवेश करण्यास मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व शासकीय यंत्रनानी समन्वयाने काम करावे

*कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व शासकीय यंत्रनानी समन्वयाने काम करावे*
         *--पालकमंत्री दादाजी भुसे*
पालघर दि.. २०:-महसूल विभाग,पोलिसयंत्रणा, आरोग्य विभाग,महानगरपालिका नगरपालीका

व इतर शासकीय यंत्रणानी समन्वयानी काम करुन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखावा असे निर्देश कृषी,माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी शासकीय यंत्रनांना दिले. व्हिडिओ कॉन्फरन्स (V.C) च्या माध्यमातून पालकमंत्री श्री. भुसे यांनी कोव्हिड १९ चा आढावा घेतला त्यावेळी श्री. भुसे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिध्दाराम सालीमठ, पोलिस अधिक्षक दत्तात्रेय शिदे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ किरण महाजन,तसेच प्रांतधिकारी ,तहसिलदार उपस्थित होते.

मा.मुख्यंमत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेली 'मी जबाबदार,

"मोहिम जिल्हयामध्ये प्रभावी पणे राबवावी. तसेच जिल्हयामध्ये लसीकरणाचे उदिष्ट. पुर्ण करुन कोव्हिड १९ चा प्रादुर्भाव रोखावा असेही निर्देश पालकमंत्री श्री. भुसे यांनी शासकीय यंत्रनांना दिले. ज्याना कोव्हिडचा प्रादुर्भाव झाला असेल अशा व्यक्तींना संस्थात्मक अलगीकरणा मध्ये ठेवावे .ज्या व्यकतीच्या घरी अलगीकरणासाठी आवश्यक असलेल्या सुविधा आहेत. त्यांना घरीच अलगीकरण करण्याची परवानगी दयावी. ज्या व्यक्तीची कोरोना चाचणी

करण्यात आली आहे. अशा व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी फिरणार नाहीत याची दक्षता

पोलिस यंत्रनांनी घ्यावी असेहि निर्देश पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

***

Friday, March 19, 2021

मोफत वाचनालय उद्घाटन तांदुळवाडी ( नाका ) डोंगरीपाडा.

मोफत वाचनालय उद्घाटन 
  तांदुळवाडी ( नाका ) डोंगरीपाडा. 
सफाळे ( हिरालाल लोखंडे ) दिनांक १३ मार्च २०२१ रोजी सुनंदा चॅरिटेबल अॅन्ड एज्युकेशनल ट्रस्ट ( रजि.) व्दारा सुनंदा एक माणुसकीची भिंत पुरस्कृत, कै. अनंत दाजी वझे मोफत वाचनालय, तांदुळवाडी नाका. डोंगरीपाडा. ग्रामपंचायत तांदुळवाडी ता,जि पालघर येथे मा. श्री संदिप कहाळे - सहाय्यक पोलिस निरीक्षक सफाळे पोलीस स्टेशन यांच्या हस्ते मोफत वाचनालयाचा उद्घाटन सोहळा पार पाडण्यात आला.
    या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री रमेश चावरे सरपंच तांदुळवाडी ग्रामपंचायत, श्री जगदीश किणी सर - समाजसेवक, श्री इंद्रमेल जैन व्यापारी सफाळे, श्री योगिराज वझे समाजसेवक, श्री एकनाथ किणी  समाजसेवक तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, गावकरी मोठ्या समुहाने उपस्थित होते.

मोफत वाचनालय उद्घाटन तांदुळवाडी ( नाका ) डोंगरीपाडा.

मोफत वाचनालय उद्घाटन 
  तांदुळवाडी ( नाका ) डोंगरीपाडा. 
सफाळे ( हिरालाल लोखंडे ) दिनांक १३ मार्च २०२१ रोजी सुनंदा चॅरिटेबल अॅन्ड एज्युकेशनल ट्रस्ट ( रजि.) व्दारा सुनंदा एक माणुसकीची भिंत पुरस्कृत, कै. अनंत दाजी वझे मोफत वाचनालय, तांदुळवाडी नाका. डोंगरीपाडा. ग्रामपंचायत तांदुळवाडी ता,जि पालघर येथे मा. श्री संदिप कहाळे - सहाय्यक पोलिस निरीक्षक सफाळे पोलीस स्टेशन यांच्या हस्ते मोफत वाचनालयाचा उद्घाटन सोहळा पार पाडण्यात आला.  या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री रमेश चावरे सरपंच तांदुळवाडी ग्रामपंचायत, श्री जगदीश किणी सर - समाजसेवक, श्री इंद्रमेल जैन व्यापारी सफाळे, श्री योगिराज वझे समाजसेवक, श्री एकनाथ किणी  समाजसेवक तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, गावकरी मोठ्या समुहाने उपस्थित होते.

वीजबिल वसुली मोहिमेला ग्राहक प्रबोधनाची साथवरिष्ठ अधिकारी फिल्डवर; विविध उपक्रमातून जागर; सुट्टीच्या दिवशीही भरणा केंद्र सुरु

वीजबिल वसुली मोहिमेला ग्राहक प्रबोधनाची साथ

वरिष्ठ अधिकारी फिल्डवर; विविध उपक्रमातून जागर; सुट्टीच्या दिवशीही भरणा केंद्र सुरु 

पालघर(प्रतिनिधी): १९ मार्च २०२१
महावितरणच्या पालघर मंडल कार्यालयांतर्गत सर्व वर्गवारीतील ग्राहकांकडून चालू वीजबिलासह थकबाकी वसुलीसाठी विविध उपक्रमाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक ग्राहकांसह विविध सरकारी आस्थापनांकडून मार्च महिन्यात जवळपास २११ कोटी रुपयांचा भरणा अनिवार्य आहे. तर चालू वीजबिल भरणाऱ्या कृषिपंप ग्राहकांना थकबाकीवर सुमारे ६६ टक्क्यांपर्यंत सूट देणाऱ्या योजनेत अधिकाधिक शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्यासाठी महाकृषी ऊर्जा पर्व अभियानाद्वारे ग्राहकांचे प्रबोधन सुरु आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह क्षेत्रीय अभियंते, अधिकारी, जनमित्र मोहिमेत सहभागी झाले आहेत. 
मार्च महिन्याच्या पार्श्वभूमीवर चालू वीजबिल व कोरोना विषाणूच्या संकटामुळे वाढलेली थकबाकी वसूल करण्यासाठी पालघर मंडळातील कर्मचाऱ्यांनी कंबर कसली आहे. 'माझे वीजबिल माझी जबाबदारी' ही संकल्पना रुजवून ग्राहकांचे प्रबोधन करण्यासाठी पालघर, बोईसर, जव्हार, मोखाडा, विक्रमगड, डहाणू, सफाळे व तलासरी उपविभागीय कार्यालयांतर्गत रॅली, ग्राहक संवाद असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मार्च अखेरपर्यंत ८४ कोटी रुपयांच्या वीजबिलाची वसुली आवश्यक आहे. यात ५ हजार रुपयांपेक्षा अधिकची थकबाकी असणारे २२ हजारहून अधिक ग्राहक असून त्यांच्याकडे ३४ कोटी ४२ लाख रुपयांची थकबाकी आहे. ग्राहकांच्या सुविधेसाठी महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुट्टीच्या दिवशीही सुरु राहणार आहेत. मार्च महिन्यात पालघर मंडलात लघुदाब ग्राहकांनी डिजिटल माध्यमातून १५ कोटी रुपयांचे वीजबिल ऑनलाईन भरले आहे. कोरोनाचा वाढता प्रसार टाळण्यासाठी डिजिटल माध्यमातून घरबसल्या वीजबिलाचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.  

महाकृषी ऊर्जा पर्व अभियानांतर्गत कृषिपंप ग्राहकांचे मेळावे, संपर्क अभियान व प्रबोधन, थकबाकीमुक्त ग्राहकांना प्रमाणपत्र वाटप, शेतकऱ्यांच्या बांधावर महावितरण आदी उपक्रम राबवण्यात येत आहेत. या अभियानाला पालघर मंडलात चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत चार हजारहून अधिक कृषिपंप ग्राहकांनी थकबाकीसह जवळपास तीन कोटी रुपयांच्या थकबाकीचा भरणा केला आहे. पालघर मंडलात एकूण १३ हजार ४०० कृषिपंप ग्राहकांकडे १६ कोटी ६० लाख रुपयांचे वीजबिल थकीत आहे. यात बोईसर ग्रामीण उपविभाग - ३८१६ ग्राहक (८ कोटी ५१ लाख थकबाकी), डहाणू उपविभाग - ३२४४ ग्राहक (३ कोटी ६५ लाख थकबाकी), जव्हार उपविभाग - ३२६ ग्राहक (१२ लाख ७० हजार), बोईसर एमआयडीसी उपविभाग - ५५ ग्राहक (९४ हजार थकबाकी), मोखाडा उपविभाग - ६९ ग्राहक (४ लाख ५९ हजार थकबाकी), पालघर उपविभाग - २२८७ ग्राहक (२ कोटी ९२ लाख थकबाकी), सफाळे उपविभाग - २३६६ ग्राहक (५९ लाख ४३ हजार थकबाकी), तलासरी उपविभाग - ५८६ ग्राहक (३१ लाख ५९ हजार थकबाकी), विक्रमगड उपविभाग - ६६७ ग्राहक (४२ लाख ६२ हजार थकबाकी).  

-----------

फोटोओळ - सर्व वर्गवारीतील ग्राहकांकडून चालू वीजबिलासह थकबाकीचा भरणा करून घेण्याबाबत विक्रमगड येथे कर्मचारी-अधिकाऱ्यांशी संवाद साधताना मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल. समवेत अधीक्षक अभियंता किरण नागावकर, कार्यकारी अभियंता प्रताप मचिये आदी.

हरवलेल्या व्यक्तीच्या शोध कामी

हरवलेल्या व्यक्तीच्या शोध कामी 

सफाळे ( हिरालाल लोखंडे ) सदर फोटोत असलेली व वर्णन केलेली व्यक्ती एकच असून श्री दिलीप रघुनाथ गोवारी वय वर्षे ४७, धंदा --- राहणार, कोटीम पोस्ट बावडा, तालुका डहाणू जिल्हा पालघर .सफाळे येथे लग्नाकार्यासाठी आला असताना, लग्नांच्या घाई गडबडीत दिनांक १५ मार्च २०२१ रोजी, न सांगता निघून गेला असताना, नातेवाईक मित्र आदि ठिकाणी शोध घेतला असताना मिळुन न आल्यानंतर दिनांक १८ मार्च २०२१ रोजी सफाळे पोलिस स्टेशन ता,जि पालघर येथे मनुष्य मिसींग रजि. नंबर ०५ / २०२१ ने मिसींग केस दाखल करण्यात आली असून त्यांचे वर्णन खालील प्रमाणे 
  रंग - सावळा, उंची - ५ फूट, अंगावर - सफेद रंगाचा हाफ शर्ट, व काळ्या रंगाची फुल पॅन्ट, पायात - चप्पल, चेहरा - लांबट, डोळे - काळे, केस - काळे, सफेद बारीक - दाढी, भाषा - मराठी बोलतो, मोबाईल नाही, सदर वर्णन केलेली व फोटो असलेली एकच असून कोणासही आढळून आल्यास खालील मोबाईल नंबरवर संपर्क कराला 
पोना / शेळके  ९९८७३३४८२२
किंवा सफाळे पोलीस स्टेशन नंबर ८६६९६०४०३७

Wednesday, March 17, 2021

जिल्ह्यात विविध ठिकाणी पोषण पंधरवड्याचे (पखवाडा ) उद्घाटन


जिल्ह्यात विविध ठिकाणी पोषण पंधरवड्याचे  (पखवाडा ) उद्घाटन
 पालघर (प्रतिनिधी)केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार १६  मार्च २०२१ ते ३१ मार्च २०२१ या काळात राज्यात पोषण पंधरवडा साजरा करावयाचा असून महिला व बाल विकास विभागा मार्फत पालघर जिल्ह्यात  देखील अनेक  अंगणवाड्या मध्ये पोषण  पखवाड्याचे उद्घाटन करण्यात आले.  या पंधरा दिवसात जिल्ह्यात कुपोषण निर्मूलनासाठी तसेच जनजागृतीसाठी अंगणवाडी स्तरावर विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. अभियानाच्या पहिल्या  दिवशी अंगणवाडी स्वच्छता, गृह भेट व पोषण पखवाडा उद्घाटन या कार्यक्रमांचा समावेश असेल, त्यानंतर प्रभात फेरी  व पोषक आहारा बाबत जनजागृती, पालकासक्षम कुपोषित बालकांची वजन व उंची घेणे, करणे, कुपोषित बालकांची आरोग्य तपासणी व VHSND घेणे, दुर्धर आजारी बालकांची RBSK मार्फत आरोग्य तपासणी करणे,  पंचायत राज सदस्यांचा समावेश  असलेल्या  पोषण पंचायतीचे आयोजन करून त्याद्वारे  त्याद्वारे कुपोषणाची व्याप्ती व त्याचे दुष्परिणाम याबाबत जनजागृती करणे, पोषण वाटिका,  अन्न वनीकरण SAM / MAM बालके ओळखणे व त्यांचे व्यवस्थापन करणे, कुपोषण निर्मुलनासाठी आयुष तत्वे आणि  पद्धतीचा वापर करणे बाबत जागरूकता करणे,  अंगणवाडी स्तरावर पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करण्या करीता मोहीम राबवणे जिल्हा किंवा  गट  स्तरावर  स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या पौष्टिक पाक कृती  बनवणे,  माता बैठक व ,मातांच्या चांगल्या सवयी या विषयी चित्रकला स्पर्धा व गृह भेटी व  इतर अनेक उपक्रम या अभियान काळात राबवण्यात येणार आहेत. अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बाल विकास विभाग प्रवीण भावसार यांनी दिली.

पालघरमध्ये आश्रमशाळा केली ‘सील’, 30 विद्यार्थ्यांसह एका शिक्षकाला करोनाची लागणकरोनाची लागण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक लागण मुलींना

पालघरमध्ये आश्रमशाळा केली ‘सील’, 30 विद्यार्थ्यांसह एका शिक्षकाला करोनाची लागण
करोनाची लागण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक लागण मुलींना|

पालघर (प्रतिनिधी)आज पालघरमध्ये आश्रमशाळा केली ‘सील’, 30 विद्यार्थ्यांसह एका शिक्षकाला करोनाची लागण

पालघजवळील नंडोरे आदिवासी आश्रमशाळेत 30 विद्यार्थ्यांना व एका शिक्षकाला करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. अलिकडेच जव्हार हिरडपाडा आश्रमशाळेतील विद्यार्थी व शिक्षकांना करोनाची लागण झाल्यानंतर ही घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना व एका शिक्षकाला करोनाची लागण झाल्यानंतर प्रशासनाने आश्रमशाळा सील केली आहे.


नंडोरे आश्रमशाळेत नववी ते बारावीचे वर्ग सुरू होते. काही विद्यार्थिनींना लक्षणे आढळून आल्यानंतर सुरुवातीला नऊ विद्यार्थींना करोनाची लागण झाल्याचे तपासणीत पुढे आले. त्यानंतर 193 विद्यार्थ्यांची तपासणी केल्यानंतर एकूण 30 विद्यार्थ्यांना बाधा झाल्याचे आरोग्य विभागाने म्हटले असून एका शिक्षकालाही लागण झाली आहे.

34 शिक्षक या शाळेत शिकवत होते. करोनाची लागण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक लागण मुलींना झाली आहे. या आश्रमशाळेतील 24 मुली करोना पॉझिटिव्ह असून सहा मुलेही बाधित आहेत. यातील नऊ मुलींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर, इतर विद्यार्थ्यांना आश्रमशाळेतच विलगिकरण कक्ष स्थापन करून वैद्यकीय टीमच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.

Tuesday, March 16, 2021

दोन तासात तांदुळवाडी किल्ला सर ! छोट्या ट्रेकरांची कमाल

दोन तासात तांदुळवाडी किल्ला सर ! 
छोट्या ट्रेकरांची कमाल  ( हिरालाल लोखंडे ) सफाळे तांदुळवाडी किल्ला हा इतिहास कालीन वेळेचा महत्त्वाचा नाकेबंदी साठी असलेला किल्ला. घनदाट जंगल,वळणा --  वळणाच्या खडतर, तीव्र चढ उतारावर असलेल्या पाउल वाटा. वा-या बरोबर वाहणाऱ्या उष्णतेच्या लाटा, अशा प्रकारचे सध्या वातावरण असताना. सात ते आठ वर्षाच्या विद्यार्थीनी तांदुळवाडीचा अति उंच किल्ला फक्त दोन तासात सर केला. 
  दिनांक १३ मार्च शनिवार २०२१ रोजी जे. व्हि. बॅडमिंटन क्लब सफाळे व्दारा या ट्रेक चे आयोजन करण्यात आलेले. हा ऐतिहासिक किल्ला समुद्र सपाटी पासून साधारणपणे १९०० फूट उंचीवर असून, सराईत ट्रेकर्स याकिल्ल्याचे शिखर अंदाजे एक ते दीड तासात सर करतात. तांदुळवाडी सफाळे रेल्वे स्टेशन ( पूर्व ) पासून  सात किलोमीटर अंतरावर आहे. बस, रिक्षा, किंवा खाजगी वाहनाने जाता येते. नॅशनल महामार्ग नंबर आठ. वरई येथूनहि वाहनाने जाता येते. 
   लहान वयात न थकता खडतर कडे कपारीतून,आडवळणानाच्या वाटेने दोन तासात किल्ला सर करून, किल्याच्या वरच्या भागावर जाउन  पोहचल्यानंतर, मुले आनंदाने शिवगर्जनेचा जयघोष करीत नाचू बागडू लागले. कु. द्वीप वर्तक,कु.आर्यविर ढाकणे, कु.श्रेयस भालके, कु.राजवीर गायकवाड, कु.आराध्य, कु. वेदांत, कु.धैर्या, कु. समर, कु. आयुष, कु. रूचा आदि धाडसी काटक मुला - मुलींनींचा समावेश होता. या ट्रेकिंग साठी श्री  जितेंद्र वर्तक बॅडमिंटन प्रशिक्षक यांनी मोलाचे मार्गदर्शन करून, जबाबदारीने मुलांना सहिसलामत   आणून पालक वर्गाच्या स्वाधीन केले.

जिल्ह्यात विविध ठिकाणी पोषण पंधरवड्याचे (पखवाडा ) उद्घाटन



जिल्ह्यात विविध ठिकाणी पोषण पंधरवड्याचे  (पखवाडा ) उद्घाटन

 पालघर (प्रतिनिधी)केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार १६  मार्च २०२१ ते ३१ मार्च २०२१ या काळात राज्यात पोषण पंधरवडा साजरा करावयाचा असून महिला व बाल विकास विभागा मार्फत पालघर जिल्ह्यात  देखील अनेक  अंगणवाड्या मध्ये पोषण  पखवाड्याचे उद्घाटन करण्यात आले.  या पंधरा दिवसात जिल्ह्यात कुपोषण निर्मूलनासाठी तसेच जनजागृतीसाठी अंगणवाडी स्तरावर विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. अभियानाच्या पहिल्या  दिवशी अंगणवाडी स्वच्छता, गृह भेट व पोषण पखवाडा उद्घाटन या कार्यक्रमांचा समावेश असेल, त्यानंतर प्रभात फेरी  व पोषक आहारा बाबत जनजागृती, पालकासक्षम कुपोषित बालकांची वजन व उंची घेणे, करणे, कुपोषित बालकांची आरोग्य तपासणी व VHSND घेणे, दुर्धर आजारी बालकांची RBSK मार्फत आरोग्य तपासणी करणे,  पंचायत राज सदस्यांचा समावेश  असलेल्या  पोषण पंचायतीचे आयोजन करून त्याद्वारे  त्याद्वारे कुपोषणाची व्याप्ती व त्याचे दुष्परिणाम याबाबत जनजागृती करणे, पोषण वाटिका,  अन्न वनीकरण SAM / MAM बालके ओळखणे व त्यांचे व्यवस्थापन करणे, कुपोषण निर्मुलनासाठी आयुष तत्वे आणि  पद्धतीचा वापर करणे बाबत जागरूकता करणे,  अंगणवाडी स्तरावर पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करण्या करीता मोहीम राबवणे जिल्हा किंवा  गट  स्तरावर  स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या पौष्टिक पाक कृती  बनवणे,  माता बैठक व ,मातांच्या चांगल्या सवयी या विषयी चित्रकला स्पर्धा व गृह भेटी व  इतर अनेक उपक्रम या अभियान काळात राबवण्यात येणार आहेत. अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बाल विकास विभाग प्रवीण भावसार यांनी दिली.

Monday, March 15, 2021

ग्रामसेवालय उंबरपाडा-सफाळे कोव्हिड लसीकरण केंद्र*आरोग्य विभागामार्फत सफाळे येथे होणाऱ्या विनामूल्य लसीकरणाबाबत सूचना*

ग्रामसेवालय उंबरपाडा-सफाळे कोव्हिड लसीकरण केंद्र

*आरोग्य विभागामार्फत सफाळे येथे होणाऱ्या विनामूल्य लसीकरणाबाबत सूचना*

सफाळे(प्रतिनिधी)सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की, *सफाळे-उंबरपाडा, माकणे व कर्दळ ग्रामपंचायतीतील कर्मचाऱ्यांना व निवडक ज्येष्ठ नागरिकांना प्रायोगिक तत्त्वावर उद्या मंगळवार दि. १६/०३/२०२१ रोजी सकाळी ९.३० वाजेपासून कोविड लस* देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर आठवड्यात *दर  मंगळवार, गुरुवार व शनिवार रोजी प्रतिदिन 200 (सकाळी 100 व दुपारी 100)* याप्रमाणे *60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व वय वर्षे 45 ते 59 दरम्यान डायबेटिक (मधुमेह रुग्ण) यांचे रजिस्ट्रेशन करून विनामूल्य लसीकरण* केले जाणार आहे. तरी, कृपया *लसीकरण करू इच्छिणाऱ्या पंचक्रोशीतील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी गर्दी न करता  सकाळी 9.00 ते 1.00 व दुपारी 2.00 ते 5.00* या वेळेत उपस्थित राहावे. *गर्दी टाळण्यासाठी लसीकरणापूर्वी "ग्रामसेवालय उंबरपाडा-सफाळे कार्यालय" या ठिकाणी आगाऊ नोंदणी करून टोकन नंबर घेणे बंधनकारक राहील.*

*टीप :- सोबत येताना आधारकार्ड आणणे बंधनकारक आहे.*

*- उंबरपाडा सफाळे, माकणे व कर्दळ ग्रुप ग्रामपंचायतीच्या सौजन्याने*

वनविभाग जव्हार -- परिक्षेत्र वाडा, अवैधरीत्या - खैर - साग तस्कर - दगड खदान धारकांवर कारवाई.

वनविभाग जव्हार -- परिक्षेत्र वाडा, अवैधरीत्या -  खैर - साग तस्कर - दगड खदान धारकांवर कारवाई. हिरालाल लोखंडे ) जव्हार विभागातील तालुका वाडा  परिक्षेत्रात अनेक दिवसापासून खैर / साग तस्कर, अवैध रित्या वनविभागातील गौणखणिज यांची चोरी व चोरटी वाहतुकीचा बोलबाला होत असताना, गेल्या एक ते दीड महिन्याच्या कालावधीत श्री, एच, व्ही, सापळे वन शेत्रपाल वाडा परिक्षेत्र ( पश्चिम ) यांनी वरिष्ठांचे आदेश व हाताखाली असलेले वनकर्मचारी यांच्याशी विचारविनिमय करून, आपण करीत असलेल्या कारवाई बद्दलची खबर, कानोकानी कोणासही लागु न देता, ठिक -सापळे रचून किंवा अचानक पणे पाठलाग करून कारवाई करून खैर चोरांच्या गाड्या पकडल्या.वेळप्रसंगी वन शेत्रावरील गौणखणिज चोरावर योग्य वेळी कारवाई केली आहे. यामध्ये आपण यशस्वी झाले.         एक महिंद्रा स्काॅपिओ -० १, क्वालिस - ०१, टाटा पिक अप - ०२ , टाटा ए सी ई -०१, पोकलेन - ०१, ट्रक अथवा - ०२,   अशी एकूण ०८ वाहने, विविध गुन्हे नोंदवून जप्त केलेली आहेत. खैर  प्रजातीच्या वनोपज जप्त केलेल्या मालाची अंदाजे किंमत रूपये २,००००० /- (अक्षरी दोन लाख रूपये इतकी आहे. तर जप्त केलेल्या ०८ वाहनांची किंमत अंदाजे रूपये २,००,०००००/- (अक्षरी दोन कोटी ) च्या आसपास असावी असे सांगितले जात आहे. 
   वनविभागा तर्फे केल्या जाणार्‍या विविध प्रकारच्या कारवायांन मुळे, खैर तस्कर व वनविभाग हद्दीत अवैध कामे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे. तर अशा प्रकारे विविध ठिकाणी वेळ - काळ  यांचा विचार न करता किंवा कोणाचीही भीडभाड - मुलाहिजा न ठेवता, धरठोक पणे ( प्रामाणिकपणे ) होणार्‍या कारवाईचे सर्वसामान्य नागरिकांन कडुन विविध स्तरावरून वनविभाग कर्मचारी यांचे कौतुक होत आहे. 
  सदर कारवाई श्री एच, जी, धुमाळ साहेब उपवन संरक्षक जव्हार .श्री, ए, एम, सोनवणे सहा, वन संरक्षक ( वनीकरण व वन्यजीव ) वाडा, यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास श्री एच, व्हि, सापळे वन शेत्रपाल वाडा ( पश्चिम ) श्री जाधव, श्री कांबळे, वनपाल. श्री वारगुडे, निकम, केंद्रे, नफाद, ठाकरे, कदम, शिंदे, सोनवणे, मोहिते, सपकाळ, घुटे, गावड, कचरे, सर्व वनरक्षक जरी असले तरी ते जिवाची बाजी लावून वनसंपदा चोरणाऱ्याना अद्दल घडविणारे शूर सैनिक ( हत्यार नसलेले ) आहेत, त्यांना शतशः धन्यवाद.

Sunday, March 14, 2021

खुनातील प्रत्यक्ष साक्षीदारास पोलीस संरक्षण मिळणार का ?कि, वराती मागून घोडे !

खुनातील प्रत्यक्ष साक्षीदारास पोलीस संरक्षण मिळणार का ?
कि, वराती मागून घोडे !सफाळे ( हिरालाल लोखंडे )सन १९१८ साली मौजे, कामण तालुका वसई येथे यादव म्हात्रे सामाजिक कार्यकर्ते यांचा गोळ्या झाडून खून करण्यात आलेला. त्यावेळी या घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार त्यांचे बंधू श्री गंगाधर म्हात्रे हे आहेत. त्यांच्या साक्षेवरून ख-या आरोपींचा शोध लावून हा खटला अंतिम टप्यात आला आहे. या साठी गंगाधर म्हात्रे -- आदिवासी सेवक महाराष्ट्र शासन यांना ३२ वर्ष एकाकी लढा द्यावा लागत आहे. यामध्ये आदिवासी बांधवांचा नाहक बळी गेला, तर म्हात्रे यांच्यावर भ्याडपणे प्राणघातक हल्लेही करण्यात आले. म्हात्रे यातुन वाचले, पण त्यांच्यावर अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया कराव्या लागल्यानंतर आता ते बरे आहेत. या घटने नंतर म्हात्रे यांना विनामुल्य पोलीस संरक्षण देण्यात आलेले असताना,  त्यांना कोणत्याही पूर्वसूचना न देता, १७ मे २०१७ ला संरक्षण काढून घेण्यात आले. म्हात्रे यांनी मा, उच्च न्यायालयात दाद मागितली असता, मा, न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना एप्रिल २०१८  ला पुन्हा संरक्षण देण्यात आलेले, परंतु डिसेंबर २०१८ ला दिलेले संरक्षण परत काढून घेण्यात आले. 
   श्री गंगाधर म्हात्रे यांनी पुन्हा एकदा दिनांक डिसेंबर २०२० ला मा. मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य, सर्व मा. मंत्री  महोदय, मा. जिल्हा अधिकारी साहेब, मा. पोलीस आयुक्त, सी. आय. डी. यांच्या कडे संरक्षणासाठी मागणी केली असताना, डाॅ. किरण महाजन मा. अप्पर जिल्हाधिकारी - दंडाधिकारी पालघर. यांनी १२ जानेवारी २०२१ रोजी पुढील कारवाई साठी  सक्षम अधिकारी यांना सुचना दिलेल्या. तसेच मा. केतकी खोत उप अधिक्षक सी. आय. डी. कोकण भवन ( सी. बी. डी.) यांनी हि, मा. पोलीस आयुक्त पालघर यांना योग्य त्या सुचना दिलेल्या असताना,सुचना देऊन तिन महिन्याचा कालावधी उलटून  गेलेला आहे, तरीही म्हात्रे यांना कोणत्याही प्रकारे संरक्षण देण्यात आलेले नाही किंवा संरक्षण देण्यासाठी कोणत्याही हालचाली दिसुन येत नाही. यावर म्हात्रे स्वतः सांगतात, यादव म्हात्रे खून खटला  अंतिम टप्यात आलेला आहे.मी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याने मला संपविण्यासाठी विरोधक प्रयत्न करतील, कारण यापुर्वी माझ्यावर प्राणघातक हल्ला झालेला आहे. आता कदाचित ते माझा अपघात घडवून आणतील किंवा गुंड प्रवृत्तीच्या आडदांड व्यक्तीन कडुन मला ठार मारण्याचा प्रयत्न ही करतील.

अनिल डोकफोडे अपघात की घातपात ?

अनिल डोकफोडे अपघात की घातपात ?
पालघर ( हिरालाल लोखंडे )वाडा तालुक्यातील शेल्टे गावाच्या शेजारी असलेल्या दगड खाणीत अनिल डोकफोडे वय वर्ष ३५ याचा मृतदेह आढळून आला असताना, खदान मालकाने मृतदेहा बद्दल पोलीसांना पूर्वसूचना न देता, परस्पर अनिलचा मृतदेह ट्रॅक्टर मधे भरुन त्याच्या घरी नेऊन टाकला असताना, नातेवाईक यांनी मृतदेहास अग्नि देण्याची तयारीत असताना, वाडा पोलीस स्टेशनला माहिती मिळताच प्रभारी अधिकारी कर्मचारी यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कारवाई साठी पंचनामा करून, मृतदेह पोस्टमार्टेम साठी वाडा ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आला आहे. अनिलच्या नातेवाईक यांनी हा घातपात असल्याचा संशय वर्तविला आहे मार्च २०२१ रोजी संध्याकाळी अनिल कामावरून घरी परत आल्यानंतर  त्यांने रात्रीचे जेवण करुन झाले असताना कोणाचा तरी फोन आला असताना घरा बाहेर निघून गेला असता, रात्री परत आला नाही म्हणून रात्रीच शोध घेतला असताना मिळून आला नाही. परंतु सकाळी त्याचा मृतदेह खदान मालकाने नातेवाईकांना आणुन दिला. सदर घटनेचा पुढल तपास वाडा पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहे.

Saturday, March 13, 2021

Blood donation camp in memory of Late Shri Dada mahurkar

Blood donation camp in memory of Late Shri Dada mahurkar 
Organized by Western Railway Mazdoor Sangh 
Mumbai Division 
1)Ajay Kumar singh working President/wrms 
2)Rajesh Pandhirkar Divisional secretary
3)Kiran patil Divisional Chairman
4)Ankit Singh Branch Secretary BDTS
5)Rizwan shaikh Branch Chairman BDTS 
TOTAL BLOOD UNIT COLLECTED from virar to churchgate 800 units

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...