Wednesday, September 29, 2021

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*


          पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पहिल्या सोमवारी 1.00 वाजता घेण्यात येतो. माहे ऑक्टोबर महिन्यातील लोकशाही दिन हा दि. 04 ऑक्टोबर, 2021 रोजी दुपारी 1.00 वाजता घेण्यात येणार होता. परंतु मा. न्यायालयीन निर्णयानुसार पालघर जिल्हा परिषदेमधील 15 निवडणुक विभाग व पंचायत समित्यांमधील 14 निर्वाचक गणातील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणूकीचा कार्यक्रम दि.13 सप्टेंबर, 2021 रोजीच्या प्रसिध्दी पत्रकान्वये घोषित केला असून दि. 13 सप्टेंबर, 2021 पासून ते दि. 08 ऑक्टोंबर, 2021 पर्यंत जिल्ह्यात आचार संहिता लागू झाल्याने, जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात येणार नाही.
तसेच पुढील लोकशाही दिन नेहमी प्रमाणे महिन्याच्या पहिल्या सोमवारी घेण्यात येईल. कृपया यांची नोंद घ्यावी. असे निवासी उपजिल्हाधिकारी, पालघर डॉ. किरण महाजन यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
*

Tuesday, September 28, 2021

आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन. अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांनी जपली सामाजिक बाधिलकी!

आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन. अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांनी जपली सामाजिक बाधिलकी! 
कल्याण-दी.२८(किशोर पाटील) 
आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन यांच्या  विद्यमाने  फाउंडेशनचे अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यानी गेल्या अनेक वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपरयात आरोग्य शिबीराचे मोफत आयोजन करुन गरीब गरजु सह सर्व सामान्य लोकांना मदतीचा हात पुढेे  करून  आपन सामाज्याचे काही तरी देने लागतो हा विचार मनी धरून सामाज्या प्रति आपली भावना सामाजिक बाधिलकी च्या रुपाने करत आहेत,सदर शिबिराचे आयोजन आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन.अनंता सुधा भवन. शॉप नंबर 3. न्यू स्टार सिटी हॉस्पिटल खाली. चक्की नाका. कल्याण ( पूर्व ) येथून केले जाते. त्यामुले प्रत्येक शिबिरातून २०/२५ नागरिकांना (रुग्णांना) मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी तेरणा हॉस्पिटल  याठिकाणी  पाठवण्यात येते. आजही झालेल्या शिबिरात २५ रुग्णांना तेरणा हॉस्पिटल नवी मुंबई येथे पाठवण्यात आले. त्यामधे खलील आजारांवर मोफत शस्त्रक्रिया केल्या जातात. 
1) हृदयाची शस्त्रक्रिया.2) अन्ननलिका शस्त्रक्रिया 3) हाडांचे फॅक्चर शस्त्रक्रिया 4) कॅन्सर शस्त्रक्रिया  5) कान.नाक व घसा शस्त्रक्रिया  6) हर्निया  7) स्वशननलिकेच्या संबंधित शस्त्रक्रिया  8) पुरुष ग्रंथी  वाढणे मूत्राशयाच्या मार्ग संकुचित होणे 9) मणक्याची शस्त्रक्रिया  10) यकृत्याचे आजार / शस्त्रक्रिया 11) सांध्याच्या शस्त्रक्रिया  12) अपेन्डिस  13) डोळ्यातील सफेद पडद्याची शस्त्रक्रिया  14) मुतखडा शस्त्रक्रिया  15) जीभेच्या शस्त्रक्रिया  16) किडनीचे आजार  17) गर्भपिशवी दुरुस्ती  18) पित्ताशय किंवा पित्ताशयातील खडे शस्त्रक्रिया यांचा समावेश आहे. या सर्व रुग्णांना घेऊन जाण्यासाठी गाडीची व्यवस्था आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांच्याच कडून मोफत केली जाते.

गुलाब चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अतिमुसळधार पावसाची शक्यता

*गुलाब चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अतिमुसळधार पावसाची शक्यता* 

 
*नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ  यांचे आवाहन*

पालघर (प्रतिनिधी)दि. २८  : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या सुचनेनुसार बंगालच्या समुद्रात वादळ (गुलाब चक्रीवादळ)  निर्माण झाल्याने दिनांक १ ऑक्टोबर २०२१ पर्यत  कोकण किनापट्टीलगतच्या जिल्हयातील समुद्र किनाऱ्यावर अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने  जिल्ह्यातील नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ  यांनी केले आहे.

याकाळात झाडे पडणे, पत्रे उडून जाणे, पाणी साचणे, विजेचे खांब कोसळणे, पुरात वाहून जाणे, विज पडून मृत्यु, जनावरे वीज पडून, पाण्यात बुडन मयत होणे,  अशा घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये. तसेच संबंधित गावातील तलाठी यांना घडलेल्या घटनेचा वृतांत तात्काळ कळविणे, व तालूका नियंत्रण कक्षात फोन करणे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात 8237978873 या क्रमांकावर संपर्क साधण्याच्या सुचना जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ यांनी केल्या.

नवीन महाविद्यालय, अभ्यासक्रम सुरु करण्यासाठीचे वेळापत्रक एक महिना पुढे ढकलण्याचा निर्णय



*नवीन महाविद्यालय, अभ्यासक्रम सुरु करण्यासाठीचे वेळापत्रक एक महिना पुढे ढकलण्याचा निर्णय* 


मुबई(प्रतिनिधी)नवीन महाविद्यालय तसेच अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी निश्चित केलेले वेळापत्रक कोविडमुळे एक महिना पुढे ढकलण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. 
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील कलम 109 मध्ये नवीन महाविद्यालय, परिसंस्था सुरु करणे तसेच नवीन अभ्यासक्रम, विषय, विद्याशाखा, अतिरिक्त तुकड्या किंवा सॅटेलाईट केंद्र सुरु करण्यासाठी परवानगी देण्याची पद्धत निश्चित केली आहे.  कोविडमुळे वर्ष 2021-22 मध्ये विहित वेळेत कार्यवाही होऊ न शकल्याने हे वेळापत्रक एक महिन्याने पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.  या संदर्भात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील कलम 109 मध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढण्यात येईल.
-----०-----

Monday, September 27, 2021

अंबरनाथमध्ये हॉटेल चालकाकडून दुसऱ्यांदा वीजचोरी; गुन्हा दाखल

अंबरनाथमध्ये हॉटेल चालकाकडून दुसऱ्यांदा वीजचोरी; गुन्हा दाखल

कल्याण(प्रतिनिधी): दि. 27 सप्टेंबर 2021

महावितरणच्या पथकाने अंबरनाथ पश्चिमेतील नेताजी मार्केट परिसरातील नवाब हॉटेलमध्ये रिमोटच्या साह्याने सुरु असलेली वीजचोरी उघडकीस आणली आहे. विशेष म्हणजे वीजचोरी प्रकरणी या हॉटेलविरुद्ध 2017 मध्ये कारवाई करून चोरीच्या विजेचे 2 लाख 95 हजार 720 रुपयांचे वीजबिल व 55 हजार रुपयांचा दंड वसूल केला होता. आता नुकत्याच केलेल्या कारवाईत 25 हजार 350 रुपयांची 1202 युनिट वीज चोरून वापरल्या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.  

नवाब हॉटेलचा सध्याचा वीज वापरकर्ता अब्दुल शब्बीर बद्रुद्दीन व हॉटेलचा मालक सलीम शेख अशी याप्रकरणी वीज कायदा-2003 च्या कलम 135 व 138 नुसार गुन्हा दाखल झालेल्या आरोपीची नावे आहेत. हॉटेलच्या मीटरची तपासणी केली असता मीटरला तडा गेल्याचे निदर्शनास आले. संशयित मीटर जप्त करून तपासणी केली असता मीटरमध्ये रिमोट कंट्रोल सर्किट बसवल्याने आढळून आले. आरोपींकडून वीज चोरीसाठी वापरण्यात आलेला रिमोट कंट्रोलही जप्त करण्यात आला आहे. नोव्हेंबर 2017 मध्ये नवाब हॉटेलविरुद्ध वीजचोरीची कारवाई करून त्याच महिन्यात साडेतीन लाख रुपये वसूल करण्यात आले होते. महावितरणकडून ग्राहकांच्या वीज वापरावर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून उपलब्ध माहितीच्या आधारे वीज चोरांवर कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई नियमितपणे सुरू राहणार असून कोणतीही युक्ती वापरून विजेचा अनधिकृत वापर करू नये, असे आवाहन मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी कल्याण परिमंडलातील ग्राहकांना केले आहे. सहायक अभियंता मनीषा मुऱ्हे, प्रकाश हरद, तंत्रज्ञ अजित पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

सफाळे पोलीस ठाणे,जि. प. / पंचायत समिती पोट निवडणुकी साठी सज्ज.

सफाळे पोलीस ठाणे,
जि. प. / पंचायत समिती  पोट निवडणुकी साठी सज्ज. 

  सफाळे ( हिरालाल लोखंडे) पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी पोट निवडणूकीच्या अनुषंगाने सफाळे पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी श्री संदिप कहाळे सहा. पोलिस निरीक्षक यांनी दिनांक २५ सप्टेंबर २०२१ रोजी तांदुळवाडी, लालठाणे, खडकोली आदी भागातील राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, मतदार, सामाज सेवक, यांची संयुक्त रित्या ग्रामपंचायत कार्यालय तांदुळवाडी ता,जि पालघर .येथे पोट निवडणूक संदर्भात मिटींग घेतलेली. 
     सदर मिटींगमध्ये उपस्थित ग्रामस्थ, सर्वपक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी, स्थानिक ग्रामपंचायत मधील पदाधिकारी यांना मार्गदर्शन करताना, सदर निवडणुक दरम्यान " करोना " विषाणूंचा प्रादुर्भाव, संसर्ग, व संक्रमण होणार नाही. या करीता उपाययोजना करून स्वतःची काळजी घेण्यासंदर्भात, मार्गदर्शन व सुचना केल्या. मतदान व मतदाता  या संदर्भातील प्रश्न, अडीअडचणी ऐकून घेऊन, समस्यांचे निराकरण, समाधान करीत. निवडणूक आयोगाने लागू केलेल्या " आचार संहितेचे " पालन करण्यासाठी सर्वाना सुचना देत, निवडणूकीच्या अनुषंगाने मार्गदर्शन करीत, कायदा आणी सुव्यवस्था राखत आगामी निवडणूक शांततेत, निर्भिडपणे पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले. या वेळी  श्री सुजित पाटील - पोलीस पाटील तांदुळवाडी, श्री संदेश पाटील - पोलीस पाटील लालठाणे, श्री शदर सातवी - पोलीस पाटील खडकोली, श्री कैलास शेळके पो, नाईक, श्री राजेंद्र घुगे काॅन्सटेबल सफाळे पोलीस ठाणे आदि उपस्थित होते

दयानंद चोरघे यांच्या आदेशानुसार भिवंडी युवक कांग्रेस च्या वतीने रांजनोली रिलायन्स पेट्रोल पंम्प जवळआंदोलन!

दयानंद चोरघे यांच्या आदेशानुसार भिवंडी युवक कांग्रेस च्या वतीने रांजनोली रिलायन्स पेट्रोल पंम्प जवळ
आंदोलन! 
भिवंडी - किशोर पाटील
भारतीय किसान संघटनेने पुकारलेल्या भारत बंदच्या आंदोलनास *भिवंडी ग्रामीण काँग्रेस ने जिल्हा अध्यक्ष ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष श्री. दयानंद मोतीराम चोरघे यांच्या आदेशानुसार* भिवंडी येथील रांजनोली रिलायन्स पेट्रोल पंम्प समोर *युवक काँग्रेसचे पदाधिकारी व भिवंडी ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष निलेश भोईर  यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले गेले* यांच्या समवेत प्रमुख उपस्थिती म्हणुन सरचिटणीस ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस पंकज अशोक गायकवाड हे सुद्धा उपस्थित होते. भारतातील शेतकर्यांना न्याय मिळण्यासाठी धरणे आंदोलन केले.तसेच *भिवंडी ग्रामीण मध्ये संयुक्त किसान संघटना यांच्या सर्व पक्षीय आंदोलनाला पाठिंबा सुध्दा दिला.* या आंदोलनामध्ये मुफ्फसिल पटेल, ज्ञानेश्वर(बाला)हुकमाळी, सुधाकर इताडकर, संजय गायकवाड,प्रभाकर शेळके, राजेश जाधव,रोहन जाधव, प्रशांत जाधव,अतिश भोईर,रोशन  थोरात आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

लायन्स क्लब ऑफ ठाणे प्राईड* *यांच्या वतीने किशोर वयीन मुलींसाठी सॅनिटरी पॅड मशीन वितरण समारंभ

*लायन्स क्लब ऑफ ठाणे प्राईड* 
*यांच्या वतीने किशोर वयीन मुलींसाठी सॅनिटरी पॅड मशीन वितरण समारंभ
भिवंडी दी.२७(किशोर पाटील)पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भिवंडी विद्यालयाच्या स्व.सौ.पुष्पलता जाधव सभागृहात *लायन्स क्लब ऑफ ठाणे प्राईड*  यांच्या वतीने किशोर वयीन मुलींसाठी सॅनिटरी पॅड मशीन वितरण समारंभांचे आयोजन करण्यात आले होते.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्था उपाध्यक्षा व विद्यालयाच्या माजी प्राचार्या *श्रीमती अरुणा प्रकाश जाधव मॅडम* उपस्थित होत्या. यावेळी लायन्स क्लब ठाणे प्राईड यांचे वतीने  *प्रेसिडेंट ऑफ लायन्स क्लब ठाणे प्राईड – लायन्स देवरतन डागा व्हाईस प्रेसिडेंट लायन्स क्लब ठाणे प्राईड – लायन्स स्वाती माधुरवार लायन्स क्लब सचिव – लायन्स अविनाश जाधव लायन्स सल्लागार – लायन्स तेजंद्रजी सिंग  डिस्ट्रिक्ट गव्हर्नर - लायन्स लोनकरन टावरी*
*1st व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर –लायन्स मुकेश तनेजा*
*2nd व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर – लायन्स ए.के. शर्मा डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन ( ग्लोबल सर्विस टीम) – लायन्स मनीष लाडगे रिजन को-ऑरडीनेटर* *(रिजन-6 ) -लायन्स सीमा लाडगे*  हे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक *विद्यालयाचे प्राचार्य श्री.जी.ओ. माळी सर* यांनी केले.आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी विद्यालय व संस्था संचालित शाळा व महाविद्यालयातून सुमारे ३० हजार पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यात ५०℅ विद्यार्थ्यांनीची संख्या आहे. *लायन्स क्लब ऑफ ठाणे प्राईड किशोरवयीन मुलींसाठी राबवित असलेला उपक्रम अतिशय स्तुत्य असून* यामुळे आमच्या विद्यालयात वेगवेगळ्या समाज स्तरातून येऊन शिक्षण घेत असलेल्या किशोरवयीन मुलींना या सुविधांचा लाभ होईल.विद्यालयात शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या सोयी सुविधांसाठी मोठया प्रमाणात आर्थिक मदतीचा हात पुढे केल्यामुळे आज भिवंडी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी विद्यालयाची तीन मजली टोलेजंग इमारत उभी असून ४ था मजला बांधण्याचे काम प्रस्तावित आहे.समाजातील आपल्या सारख्या दानशूर संस्थाची आम्हाला याकामी सहकार्याची अपेक्षा असून आपल्या कडून आम्हाला निश्चितच सहकार्य मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करत आपल्या प्रस्ताविकाचा समारोप केला. 
   लायन्स क्लब ऑफ  ठाणे संस्थेच्या आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी संस्था उपाध्यक्षा श्रीमती अरुणा जाधव मॅडम यांचे सोबत संपूर्ण शाळेची पाहणी केली व विद्यालय विद्यार्थ्यांसाठी राबववीत असलेल्या विविध उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले. तसेच लायन्स क्लब ह्या संस्थेच्या वतीने समाजासाठी राबवीत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. 
समारंभ अध्यक्षा *श्रीमती अरुणा जाधव मॅडम* यांनी लायन्स क्लब ऑफ ठाणे प्राईड यांनी विद्यालयातील  किशोर वयीन मुलींसाठी  3 सॅनिटरी पॅड मशीन उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले.यापुढेही संस्थेला मदतीचे सहकार्य करण्याचे आवाहन उपस्थित पदाधिकाऱ्याना केले.
कार्यक्रमाचे *सूत्रसंचालन कासकर मॅडम यांनी केले व उपस्थित पाहुण्यांचे आभार सौ.नीलिमा जाधव मॅडम* यांनी मानले.

वृत्तपत्र वाटप करणार्‍या युवकाची गगन भरारी!प्रा.डॉ.नरेश बोडखे यांची कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया आर्थिक विभागाच्या संचालकपदी निवड

वृत्तपत्र वाटप करणार्‍या युवकाची गगन भरारी!
प्रा.डॉ.नरेश बोडखे यांची कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया आर्थिक विभागाच्या संचालकपदी निवड
अकोले :-किशोर पाटील
महाविद्यालयीन जिवनात घरोघरी वृत्तपत्र वाटप करणारा मुलगा अपारक जिद्द आणि शिक्षणाच्या बळावर थेट केंद्र सरकारच्या कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाच्या आर्थिक विभाग संचालक पदावर पोहचतो, हे स्वप्न कि एखाद्या चित्रपटाची कहानी वाटत असली तरी ही वस्तुस्थिती असून मातृतीर्थ सिंदखेड राजा तालुक्यातील कुंबेफळ (बीबी) येथील रहिवासी असलेले प्रा. नरेश बोडखे यांनी ही किमया साकारली आहे.
पुण्यातील गोखले इन्स्टिट्युट मधील सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना त्यांची निवड झाली.
कुंबेफळ (बिबी) या गावापासून डॉ. नरेश बोडखे यांचा प्रवास सुरू झाला. आई - वडील शेतकरी, पावसावर आधारीत बेभरवशाची शेती असल्याने घरची परिस्थिती बेताची त्यामुळे प्रगतीसाठी शिक्षण हेच एकमेव साधन ही बाब त्यांनी हेरली. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बिबी येथील वसंतराव नाईक विद्यालयात झाले. त्यानंतर घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने शिक्षण अर्ध्यावर थांबू नये म्हणून महाविद्यालयीन जीवनात हॉटेल मध्ये काम करून आणि घरोघरी वृत्तपत्र वितरणाचे काम करुन डॉ. नरेश बोडखे यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. इंग्रजी साहित्यात जालन्यातील बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयात त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले आणि पदवीमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
पदवीनंतर पुणे विद्यापिठातून अर्थशास्त्र विषयात इंग्रजी माध्यमातून पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर पहिल्याच प्रयत्नात ते सेट-नेट  उत्तीर्ण झाले आणि वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी मुंबई मधील चेतना महाविद्यायात अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले. त्यानंतर त्यांची भारतातील अर्थशास्त्राचे पाहिले व नामांकित विद्यापीठ असलेल्या पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट मध्ये प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. येथे नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी जालना जिल्ह्याचे 20 वर्षांसाठीचे व्हिजन डॉक्युमेंट बनवले. केळकर समितीमध्ये आणि पंधराव्या वित्त आयोगामध्ये देखील त्यांनी उल्लेखनीय काम केले. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्प निर्मिती मध्येही त्यांनी काही काळ सहभाग नोंदवला आहे. इथेच त्यांनी पीएचडी पूर्ण केली. याबरोबरच अनेक प्रकल्पांवर संशोधन करतानाच विद्यार्थी घडविण्याचं बहुमुल्य कार्य देखील सुरू ठेवले. दरम्यान त्यांची आता केंद्र सरकारच्या कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाच्या अर्थशास्त्र विभागाच्या संचालकपदी निवड झाली आहे.
त्यामुळे मातृतीर्थ सिंदखेड राजाचे सुपुत्र आता देश पातळीवर काम करणार आहे. हॉटेलमध्ये काम करणारा, घरोघरी वृत्तपत्र वाटणारा मुलगा एवढ्या उच्च पातळीवर केवळ जिद्द आणि शिक्षणामुळेच पोहचू शकतो त्यामुळे ग्रामीण युवकांची शिक्षणाची कास धरावी, असे आवाहन ते नेहमी करतात आणि त्यासाठी युवकांना नेहमी प्रोत्साहीत देखील करत राहतात, त्यांच्या या नियुक्तीने मातृतीर्थ तालुक्याची मान उंचावली आहे........

कृषी कायद्या विरोधात शेतक-यांच्या भारत बंदलाठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्षदयानंद चोरघे यांचा जाहीर पाठिंबा!

कृषी कायद्या विरोधात शेतक-यांच्या भारत बंदला
ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष
दयानंद चोरघे यांचा जाहीर पाठिंबा! 
शाहपुर दि,२७(किशोर पाटील) सोमवार दि‌नांक २७ सप्टेंबर २०२१ रोजी केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्या विरोधात शेतक-यांच्या भारत बंद ला पाठिंबा देत ठाणे ग्रामीण काँग्रेस जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने जिल्हाभर आंदोलन केले.हे कायदे शेतकरी हिताचे नसून मूठभर धन दांडगे,उद्योगपती यांच्या फायद्याचे असुन यातून शेतकरी व ग्राहक दोघांचेही नुकसानच होणार आहे.त्यामुळे या कायद्या विरोधात शेतक-यांमध्ये तीव्र आक्रोश निर्माण झाले आहेत.शेतक-यांनी उभारलेल्या या आंदोलनाला काँग्रेसने जाहीर पाठिंबा देत ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे  शहापुर येथे आंदोलनात सहभागी होऊन केंद्र सरकारच्या कृषी कायद्याचा विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी निषेध व्यक्त केला.यावेळी राष्ट्रवादी आमदार दौलत दरोडा,शहापुर काँग्रेस तालुका अध्यक्ष महेश धानके,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष नंदकुमार मोगरे, बहुजन विकास आघाडी योगेश हजारे तसेच प्रहार संघटना व सर्व पक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Saturday, September 25, 2021

इंटरनॅशनल आयडॉल अॅवॉर्ड २०२१.

इंटरनॅशनल आयडॉल अॅवॉर्ड २०२१.


      पालघर (प्रतिनिधी)    पालघर जिल्ह्यातील डाॅ. स्मिता सुधिर माळवदे यांना समाजसेविका म्हणून सन्मानित करण्यात आले.
            सामाजिक क्षेत्रात एका वेगळ्या उंचीवर काम करत असताना आपल्या आजूबाजूला उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरविण्याचे कार्य निर्वाण फाऊंडेशन आयोजित नाशिक येथे " इंटरनॅशनल आयडॉल अॅवॉर्ड २०२१" च्या पहिल्या सीजनचा दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
               या कार्यक्रमात आपल्या पालघर जिल्ह्यातील सेवा आश्रम विद्यालय बोईसर येथील शिक्षिका डॉ. स्मिता सुधिर माळवदे यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना समाजसेविका म्हणून सन्मानित करण्यात आले.
             या पुरस्कार वितरण सोहळ्याचे अध्यक्षस्थानी निर्वाण फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. निलेश आंबेडकर हे होते. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मिसेस इंडिया इंटरनॅशनल शिल्पा अवस्थी, आफ्रिकन स्काॅलर मा. संनासी बायडोन, नाशिक जिल्हा क्षयरोग तज्ञ डॉ. देशमुख, सामाजिक कार्यकर्त्या आरती हिरे, संस्थेच्या ट्रस्टी विमलताई बोढारे यांचे हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
               या कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना " इंटरनॅशनल आयडॉल अॅवॉर्ड २०२१" या पुरस्काराने गौरविण्यात आले. ब्लॅक लेडी ट्राॅफी, सन्मानपत्र, गोल्डन मेडल असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
              कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निर्वाण फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

वाशी, नवी मुंबई येथील ‘मान्यवर’ शो रुम बाहेर हिंदुत्वनिष्ठ संघटनांची निदर्शने !

दिनांक : 25.09.2021

 _*वाशी, नवी मुंबई येथील ‘मान्यवर’ शो रुम बाहेर हिंदुत्वनिष्ठ संघटनांची निदर्शने !*_ 
नवी मुंबई- किशोर पाटिल
 *‘मान्यवर’ ब्रँडने हिंदूंची क्षमा मागून ‘कन्यादाना’ विषयी आक्षेपार्ह जाहिरात मागे घ्या -* हिंदुत्वनिष्ठ संघटनांची चेतावनी

   ‘वेदांत फॅशन्स लिमिटेड’ या कंपनीच्या ‘मान्यवर’ या कपड्यांच्या ब्रँडने हिंदूंच्या विवाह संस्कारातील ‘कन्यादान’ नको, तर ‘कन्यामान’ म्हणा’, असा धार्मिक कृतींविषयी अपप्रचार करणारी जाहिरात अत्यंत आक्षेपार्ह आणि हिंदूंच्या धार्मिक   या जाहिरातीमुळे व्यापक आणि उच्च मूल्य जोपासणार्‍या धार्मिक विधीविषयी लोकांमध्ये जाणीवपूर्वक गैरसमज पसरवण्यात आला आहे. हिंदुत्ववादी संघटना या जाहिरातीचा निषेध करण्यासाठी आम्ही निदर्शने केली आहेत. वेदांत फॅशन्स लि. कंपनीने हिंदूंची बिनशर्त क्षमा मागून ‘मान्यवर’ ब्रँडची ही जाहिरात त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते डॉ. उदय धुरी यांनी या वेळी केली. विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आज वाशी, नवी मुंबई येथील ‘मान्यवर’ शो रूम समोर निदर्शने केली, त्या वेळी ते बोलत होते.

  या वेळी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींसह हिंदू धर्मप्रेमींंनी हातात निषेध फलक धरून लोकांमध्ये जागृती केली. ही जाहिरात मागे घेऊन जोपर्यंत क्षमा मागत नाही, तोपर्यंत हिंंदु समाजाने ‘मान्यवर’ ब्रँडवर बहिष्कार घालावा, असे आवाहनही या वेळी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केले.
 
  ‘मान्यवर’ने प्रसारीत केलेल्या जाहिरातीतून हिंदूंना जाणीवपूर्वक लक्ष्य केले असून ‘कन्यादान’ कसे चुकीचे आहे, प्रतिगामी आहे, तसेच ‘दान करायला कन्या वस्तू आहे का ?’, असे संभ्रम निर्माण करणारे प्रश्‍न उपस्थित करण्यात आले आहेत. ‘कन्यादान’ नको, तर कन्यामान’, असा थेट परंपरा बदलण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुळात अन्य कोणत्याही धर्मात स्त्रियांना सन्मान दिला जात नाही, याउलट आदिशक्ती म्हणून स्त्रीची पूजा केली जाते.   फॅशन्स लि. कंपनीनेे अन्य धर्मातील महिलांविषयी चुकीच्या प्रथा-परंपरांविषयी प्रबोधन करणारी जाहिरात काढण्याची हिंमत करून दाखवावी. ‘मान्यवर’ ब्रँडची जाहिरात मागे न घेतल्यास यापुढे आंदोलन तीव्र करण्यात येईल, असेही डॉ. धुरी यावेळी म्हणाले,

भिवंडी ग्रामीणमध्ये काँग्रेसची बूथ बांधणी अभियानाला उत्साही प्रतिसाद

भिवंडी ग्रामीणमध्ये काँग्रेसची बूथ बांधणी अभियानाला उत्साही प्रतिसाद
भिवंडी दि.२५ (कशोर पाटिल)
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर प्रदेश स्तरावरून सक्षम बुथ बांधणीच्या सूचना देऊन आल्याने काँग्रेसचे मतदार संपर्क अंतर्गत बुथ बांधणी अभियान सुरू केले असून भिवंडी तालुका ग्रामीण काँग्रेस कमिटीने बुथ बांधणी अभियान सुरू केले असून मुंबई-नाशिक महामार्गावरील काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या कार्यालयात नुकतीच बुथ बांधणी अभियानाला जोरदार प्रतिसाद मिळत आहे.ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभरात विविध तालुक्यात बुथ बांधणी अभियान सुरू आहे त्या माध्यमातून आगामी येणाऱ्या निवडणुका या संदर्भात देखील चर्चासत्र सुरू आहेत.भिवंडी ग्रामीण बुथ बांधणी अभियाना दरम्यान काँग्रेस ठाणे ग्रामीण उपाध्यक्ष शरद ठाकरे,ठाणे जिल्हा ग्रामीण सरचिटणीस पंकज गायकवाड,भिवंडी तालुका युवक अध्यक्ष निलेश भोईर, ठाणे ग्रामीण सचिव सुधाकर ईताडकर, ज्येष्ठ नेते बि.डी पाटील, ज्येष्ठ नेते प्रभाकर शेळके,सोशल मिडीया अध्यक्ष ज्ञानेश्वर हुकमाळी, अनुसूचित जाती काँग्रेस अध्यक्ष संजय गायकवाड,ठाणे जिल्हा ग्रामीण मूबीसर पटेल,अध्यक्ष ओबीसी विभाग भिवंडी संतोष ठाकरे,ज्येष्ठ नेते नरेश माळी,ज्येष्ठ नेते शोराब गुजर,अध्यक्ष ओबीसी अशोक पालकर, अशोक मुरूडकर मायनॉरिटी तालुका अध्यक्ष इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

स्व.अंजली दिलीप सूर्यवंशी फाउंडेशन तर्फे महिला आरोग्य शिबीर

*स्व.अंजली दिलीप सूर्यवंशी फाउंडेशन तर्फे महिला आरोग्य शिबीर*
ग्रामीण प्रतिनिधी..

दुसखेडा येथे स्व.अंजली दिलीप सूर्यवंशी फाउंडेशन संचलित गीतांजली आरोग्यम हॉस्पिटल येथे महिला आरोग्य शिबीर घेण्यात आले.डॉ.विक्रांत सोनार (एम.बी.एस. एम.डी )स्त्री रोग तज्ञ आणि वाकचौरे वन  नरसिंग चे विद्यार्थी यांच्या सहकार्याने तापी परिसरातील 90 महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली त्यात मुख्य:त महिलांच्या पाळी संदर्भात समस्या, पांढरे पाणी जाणे,पोटात दुखणे, कमी रक्तस्राव जास्त रक्तस्त्राव किंवा वारंवार रक्तस्त्राव, पाळीच्या सर्व समस्या, अंडाशयाच्या किंवा गर्भाशयाच्या गाठी वर औषध उपचार, वारंवार गर्भपात होणाऱ्या जोडप्यांचे समुपदेशन व औषधोपचार, वंधत्व निवारण व कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया, प्रसुतीपूर्व व पश्चात औषधोपचार, अति जोखमीचे डिलेवरी व सिझेरियन ऑपरेशन, वयात होणाऱ्या मुलींच्या समस्या / समुपदेशन व औषध उपचार व समुपदेशन तपासणी करून  मार्गदर्शन केले. त्या वेळेस सेवानिवृत्त पोलीस अधिकारी  *दिलीपजी सूर्यवंशी साहेब* यांनी मोलाचे मार्गदर्शन केले त्यांनी संस्थेचे कार्य बद्दल माहिती दिली. सूर्यकांत सूर्यवंशी, संदीप कोळी, अरुण सूर्यवंशी, पिंटू राजपूत उपस्थित होते.शिबीर यशस्वी होण्यासाठी *विशाल दांडगे महाराष्ट्र प्रदेश सचिव ग्राहक संरक्षण फाउंडेशन* यांनी मोलाचे सहकार्य केले.

Friday, September 24, 2021

कल्याण परिमंडलातील 15 हजार ग्राहकांना वीजपुरवठा पूर्ववत करण्याची संधीराष्ट्रीय लोक अदालतीत सहभागी होण्याचे महावितरणचे आवाहन

कल्याण परिमंडलातील 15 हजार ग्राहकांना वीजपुरवठा पूर्ववत करण्याची संधी
राष्ट्रीय लोक अदालतीत सहभागी होण्याचे महावितरणचे आवाहन

कल्याण:(प्रतिनिधी) दि. 24 सप्टेंबर 2021


कल्याण परिमंडलातील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या 15 हजार ग्राहकांना त्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करून घेण्याची संधी मिळत आहे. त्यासाठी या ग्राहकांना तालुकास्तरावर शनिवारी (25 सप्टेंबर) आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत सहभागी होऊन महावितरणच्या नियमानुसार मिळणाऱ्या सवलतीचा लाभ घेत थकबाकीची रक्कम भरावी लागणार आहे.

परिमंडलातील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित 15 हजार ग्राहकांना राष्ट्रीय लोक अदालतीत सहभागी होण्याबाबत विधी विभागाकडून नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. काही कारणांनी नोटिसा न मिळालेल्या ग्राहकांनाही अदालतीत सहभागी होता येईल. महावितरणच्या नियमानुसार अदालतीत सहभागी ग्राहकांना सवलत देण्यात येईल. या सवलतीचा लाभ घेऊन थकबाकीची रक्कम भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा तात्काळ पूर्ववत करण्यात येईल. तर ही संधी डावलणाऱ्या संबंधित ग्राहकांवर पुढील कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. कायमस्वरूपी वीज खंडित ग्राहकांनी राष्ट्रीय लोक अदालतीत सहभागी होऊन संधीचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे. 

मुख्य अभियंता धनंजय औंढेकर, अधीक्षक अभियंते, संबंधित अधिकारी, उपविधी अधिकारी दीपक जाधव राष्ट्रीय लोक अदालतीत उपस्थित राहणार आहेत.

सहायक अभियंत्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

सहायक अभियंत्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

कल्याण: (प्रतिनिधी)दि. 24 सप्टेंबर 2021

वीजपुरवठा खंडित का केला याचा जाब विचारत विरार ग्रामीण कक्ष कार्यालयात घुसून शाखा अभियंत्याला मारहाण केल्याची घटना गुरुवारी (23 सप्टेंबर) घडली. यासंदर्भात विरार ग्रामीण पोलीस ठाण्यात एका महिलेसह तिघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिजित साळुंके, पूनम देसाई आणि एक अज्ञात व्यक्ती असे या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. आईचा अंत्यविधी व उत्तरक्रियेच्या रजेनंतर सहायक अभियंता राजकुमार कल्लोळकर गुरुवारी विरार ग्रामीण कक्ष कार्यालयात कर्तव्यावर रुजू झाले होते. दैनंदिन कामकाज सुरू असताना तिन्ही आरोपींची कार्यालयात घुसून वीजपुरवठा का खंडित केला याचा जाब विचारात शिवीगाळ सुरू केली. तर आरोपी अभिजित साळुंके याने कल्लोळकर यांना मारहाण केली. यात कल्लोळकर यांच्या नाकाला व कानाला जखमा झाल्या. कल्लोळकर यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध सरकारी कामात अडथळा (कलम 353), जाणीवपूर्वक दुखापत करणे (कलम 323) संगनमत (कलम 34) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्तव्यावरील वीज कर्मचाऱ्यांना दमदाटी, मारहाण हा गंभीर स्वरूपाचा फौजदारी अपराध असून या गुन्ह्यातील आरोपींना कठोर शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे वीज कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामात अटकाव न करता सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.


समवेत - जखमी सहायक अभियंता राजकुमार कल्लोळकर यांचे छायाचित्र

बालरोगतज्ज्ञ व स्त्रीरोगतज्ज्ञ यांच्या सहाय्याने कुपोषण कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे प्रयत्न



*बालरोगतज्ज्ञ व स्त्रीरोगतज्ज्ञ यांच्या सहाय्याने कुपोषण कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे प्रयत्न*


  पालघर (प्रतिनिधी) जिल्ह्यात धडक मोहीम राबवल्यांतर  कुपोषणा मध्ये काही प्रमाणात  वाढ झाली असून सर्व उपाययोजना करूनही जिल्ह्यातील कुपोषण कमी होत नसून  अनुभवी बालरोगतज्ज्ञ स्त्रीरोगतज्ज्ञ  यांच्या सहकार्याने कुपोषण कमी करण्यासाठी मदत होईल या हेतूने मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयातील व्ही.सी. दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. 
मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी आरोग्य आणि महिला व बालविकास विभागामार्फत आपण कुपोषण कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात परंतु तरीही कुपोषणात घट होत नाही यावर काय करता येईल असे विचारले असता उपस्थित बालरोगत स्त्रीरोगतज्ञ यांनी आपापली मते व्यक्त केली.
 शेवग्याच्या शेंगांचा आहारात भरपूर वापर करावा तसेच पाल्यापासून बनवली जाणारी मोरिंगा पावडर देखील यासाठी उपयुक्त असते असे सुचवले.तर बालकांना व मातांना आपल्या समोर जेवण देऊन आहारात अंडे,केळे, खिचडी यांचा समावेश असावा तर रोज दोन अंडी खाल्यास  १००% कुपोषण दूर होऊ शकते अस सांगितले.
सुके मासे, ऍनिमल प्रोटीन,आयर्न युक्त मीठ, शेंगदाणा तेल, याचाही आहारात समावेश करणे गरजेचे आहे असे सुचवले.
 तर बालकाचे कुपोषण कमी करायचे असेल तर केवळ बालके नाही तर पूर्ण कुटुंबे आणि गाव दत्तक घ्यावे लागेल.आणि आईच्या कुपोषणाकडे लक्ष दिले तर सुदृढ बाळ जन्माला येईल. असे मत ही यावेळी व्यक्त केले.होमिओपॅथी औषधांचाही  प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयोग करता येईल. 
यासोबत च  बालविवाह,बालवयातील गरोदरपण, याबाबत जनजागृती करणे गरजेचे असून ग्रामीण भागातील मुलांसाठी शिक्षण हे अत्यावश्यक आहे. असे अनेक कुपोषणा वर मात करणारे पर्याय यावेळी सुचवण्यात आले.
सर्व उपस्थित बालरोगतज्ज्ञ स्थानिक स्त्रीरोग तज्ञ व अधिकारी यांच्या सहकार्याने  कुपोषण कमी करण्यासाठी  योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी विचार विनिमय करण्यात येईल असे यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (म बा क),अति.जिल्हा शल्य चिकित्सक, इतर अधिकारी व बालरोगतज्ज्ञ स्त्रीरोगतज्ज्ञ उपस्थित होते.

Thursday, September 23, 2021

किशोर पाटील यांचा पत्रकार संघाच्या वतीने सन्मान!

किशोर पाटील यांचा पत्रकार संघाच्या वतीने सन्मान!
भिवंडी दि.२३(सुरजपाल यादव) महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे वकोकण विभागीय सरचिटणीस तथा दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक श्री.किशोर बळीराम पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे भिवंडी शहरातील सदस्य आचार्य श्री. सुरजपाल यादव,श्री.श्रीनिवास सिरिमल्ली,श्री.मेहंदी हसन,श्री.वेंकटेश रापेल्ली,श्री.सी.पी.तिवारी,श्रीमती. परवीन खान यांनी त्यांच्या कार्यालयात जाऊन छोटेखानी प्रमाणात वाढदिवस साजरा करून त्यांचा सन्मान केला.व त्यांच्या बद्दल असलेले प्रेम प्रत्येकाने आपल्या शब्दात व्यक्त केले.त्यानंतर  शाल  व पुष्पगुच्छ देऊन  त्यांचा सन्मान केला.त्यामुळे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांचे संपादक श्री किशोर बळीराम पाटील यांनी आभार मानले. व असेच प्रेम भविष्यातही आपण कायम ठेवावे या सदिच्छा व्यक्त केल्या.

आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन आणि तेरणा रिसर्च सेंटर हॉस्पिटल नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन२१ रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी तेरणा हॉस्पिटल मोफत बसणे पाठविले.

आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन आणि तेरणा रिसर्च सेंटर हॉस्पिटल नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन
२१ रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी तेरणा हॉस्पिटल मोफत बसणे पाठविले.
कल्याण दी.२३(किशोर पाटील)
आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन आणि तेरणा रिसर्च सेंटर हॉस्पिटल नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन.अनंता सुधा भवन. शॉप नंबर 3. न्यू स्टार सिटी हॉस्पिटल खाली. चक्की नाका. कल्याण ( पूर्व )येथे मंगळवार दी.२१/०९/२०२१ रोजी करण्यात आले होते. यामध्ये
1) हृदयाची शस्त्रक्रिया.2) अन्ननलिका शस्त्रक्रिया 3) हाडांचे फॅक्चर शस्त्रक्रिया 4) कॅन्सर शस्त्रक्रिया  5) कान.नाक व घसा शस्त्रक्रिया  6) हर्निया  7) स्वशननलिकेच्या संबंधित शस्त्रक्रिया  8) पुरुष ग्रंथी  वाढणे मूत्राशयाच्या मार्ग संकुचित होणे 9) मणक्याची शस्त्रक्रिया  10) यकृत्याचे आजार / शस्त्रक्रिया 11) सांध्याच्या शस्त्रक्रिया  12) अपेन्डिस  13) डोळ्यातील सफेद पडद्याची शस्त्रक्रिया  14) मुतखडा शस्त्रक्रिया  15) जीभेच्या शस्त्रक्रिया  16) किडनीचे आजार  17) गर्भपिशवी दुरुस्ती  18) पित्ताशय किंवा पित्ताशयातील खडे शस्त्रक्रिया यांचा समावेश असून आज वेगवेगळ्या प्रकरतील एकूण २१ रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी तेरणा हॉस्पिटल मध्ये घेऊन जात असल्याची माहिती डॉ.जितेंद्र पाटील यांनी प्रत्यक्ष दैनिक स्वराज्य तोरण शी बोलताना दिली. तसेच रूग्णांना आपली ओळख 
 पटऊन देण्यासाठी  येताना रेशन कार्ड. ओळखपत्र व  जुने रिपोर्ट सोबत घेऊन येणे असे सांगण्यात आले होते.त्यामुळे सर्व तपासण्या करताना कोणतीही अडचण निर्माण झाली नाही. या शिबिरात एकूण 200 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये शस्त्रक्रियेसाठी 21 रुग्ण आढळले या रुग्णांना तेरणा रिसर्च सेंटर हॉस्पिटल नेरूळ नवी मुंबई या ठिकाणी ऍडमिट करण्यात आले आहे. 
 अशी माहिती श्री जितेंद्र पाटील आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन. अध्यक्ष यांनी प्रत्यक्ष दैनिक स्वराज्य तोरण शी बोलताना दिली.

शिवसेनेला मिळत आहे तरूण तडफदार उमेदवार

शिवसेनेला मिळत आहे तरूण तडफदार उमेदवार 
 पालघर - पालघर जिल्हा परिषद वणई गटातून रोहित गावीत यांना उमेदवारी देण्यात आली, त्या बद्दल त्यांनी मा.श्री उध्दवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, श्री एकनाथजी शिंदे - नगरविकास मंत्री, श्री दादाजी भुसे कृषी मंत्री व पालघर जिल्हा पालकमंत्री, श्री रविंद्र फाटक संपर्क प्रमुख, मा. श्री राजेंद्र गावित खासदार पालघर जिल्हा, पालघर शिवसेना जिल्हा प्रमुख - महिला जिल्हा संघटक - जिल्हा युवा अधिकारी - तालुका प्रमुख - सर्व शाखा प्रमुख आजी माजी पदाधिकारी - शिवसैनिक यांचे ते मनापासून ( मान्यवर यांचे ) आभार / धन्यवाद .
    रोहित गावित हे प्रसिद्धी पासून दुर राहुन सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक कामे करीत आहेत. आजही हिंदूहृदय सम्राट मा. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर मा. आनंद दिघे यांच्या शिकवणी प्रमाणे तळागाळातील जनते पर्यंत जाऊन ८० टक्के समाजकारण करण्यासाठी ते निवडणूक रिंगणात उतरत आहे. 
     सर्वसामान्य जनतेच्या प्राथमिक गरजा, शिक्षण व काळाबरोबर शिक्षणासाठी संगणकीय शिक्षण, आरोग्यासाठी  विविध योजना, औद्योगिक क्षेत्रात  कुशल कौशल्य युक्त रोजगार, शेतीला पुरक व्यवसाय उपलब्ध करणे, शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध करणे, दळणवळणाची साधने उपलब्ध करणे, जि. परिषद मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेचा लाभ सर्व सामान्य नागरिक / शेतकरी यांच्या पर्यंत पोहचविण्यासाठी मी प्रयत्न शिल असेल त्यांचे सांगणे आहे. 
  मा.श्री, राजेंद्र गावित साहेब खासदार पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली मी जनसेवेचे व्रत स्विकारले असून, मी जे बोलतो तेच मी करतो. असे रोहित गावित यांचे सांगणे आहे. ते  जिल्हा परिषद पालघर ( पोट निवडणूक ) वणई ( १८ ) गटाचे उमेदवार असून, त्यांची निशाणी आहे धनुष्यबाण

केळवा ग्रामपंचायत हद्दीतील शितलाई मंदिर परिसरातील सर्व्हे.६० मधील अतिक्रमण केली दूर


केळवा ग्रामपंचायत हद्दीतील शितलाई मंदिर परिसरातील सर्व्हे.६० मधील अतिक्रमण केली दूर
पालघर (प्रतिनिधी) पालघर तालुक्यातील प्रसिद्ध केळवा बीच. सर्व्हे नंबर ६० मधील शीतलाई मंदिरा जवळील अतिक्रमण करून जवळ जवळ  याठिकाणी ३५ वर्षांपासून केलेली अतिक्रमण आज दि.२३/९/२०२१ .रोजी सकाळी दहा वाजे पासून संध्याकाळी ५:३० वाजे पर्यंत  तोडण्यात आली.ग्रामपंचायत तर्फे १९८५, साली १५/१० =१५०/चौरस फूट जागा देण्यात आली होती.ह्यात येथील दुकानदार (हॉटेल) ह्यांनी बरीच अतिक्रमण जागा केली होती.ह्यांना २० ऑग्सट रोजी नोटीस देण्यात आली होती . त्यावेळी पाऊस असल्यामुळे कारवाई करण्यात आली नाही.ती आज कारवाई करण्यात आली ह्यात ७ हॉटेल वर जास्तीचे अतिक्रमण काढण्यात आले.ह्या कारवाई साठी ग्रामपंचायत केळवा सरपंच भावना कीणी ,ग्रामसेवक दिनकर मोढवे,उपसरपंच नितीन राऊत, माजी उपसरपंच व सदस्य तुषार पाटील, व सदस्य,  पंचायत समिती.सदस्य भारती सावे,मंडलाधिकारी राजेश पाटील ,तलाठी अपेक्षा भोगटे तसेच केळवा पोलीस स्टेशनचे API भीमसेन गायकवाड, व PSI हरेश धनगर, तसेच पोलीस स्टाफ ह्यांच्या सह  बंदोबस्त घेऊन.  ग्रामपंचायतनी जे. सी. पी. च्या सहायाने  अतिक्रमण तोडण्यात आले आहे.

Wednesday, September 22, 2021

आर एस पी कमांडर डॉ.मनिलाल शिंपी यांना आदर्श विद्यारत्न पुरस्कार २०२१ प्रदान !

🔴आर एस पी कमांडर डॉ.मनिलाल शिंपी यांना आदर्श विद्यारत्न पुरस्कार २०२१ प्रदान !🔴
       
कल्याण दि.22 (किशोर पाटील.) आदर्श शैक्षणिक समूह,संचालित ,श्री बापुसाहेब डी.डी.विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन नवीन पनवेल नवी मुंबई व तरुण भारत  यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा आदर्श  विद्यारत्न पुरस्कार २०२१ (कर्तुत्वाला कौतुकाची थाप) हा आज बुधवार दी.२२ संप्तेंबर २०२१ रोजी  मा.श्री.डॉ.विष्णु मगरे (कुलगुरू प्रवरा इन्सिस्टुड ऑफ मेडिकल  सायन्स अभिमत विद्यापीठ लोणी अहमदनगर) व मा.श्री.विजय भाऊ चौधरी (भाजपा जिल्हाध्यक्ष नंदुरबार) यांच्या शुभहस्ते व महाराष्ट्र राज्य आर एस पी अधिकारी युनिट चे पितामह महासमादेशक अरविंद देशमुख या मान्यवरांच्या उपस्थितीत वर्चुअल पद्धतीने गौरवण्यात आला. यावेळीआर.एस.पी.कमांडर.श्री.डॉ.मनिलाल रतिलाल  शिंपी यांना मानपत्र प्रदान करण्यात आले.त्यामुळे डॉ.मनिलाल रतीलाल शिंपी यांना त्यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय केलेल्या कार्याबद्दल हा पुरस्कार दिला गेला असे म्हणायला वावगे ठरू नये.म्हणून त्यांचे दैनिक स्वराज्य तोरण परिवाराकडून मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा...सदरचा संपूर्ण कार्यक्रम  व पुरस्कार वितरण सोहळा ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.धनराजजी विसपुते (चेअरमन),श्री.महेंद्रजी विसपुते(अध्यक्ष)सौ.संगिता विसपुते(संचालिका)डॉ.सीमा कांबळे
प्राचार्या, 
श्री. बापूसाहेब डी.डी. विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन नवीन पनवेल यांनी विशेष मेहनत घेतली.

अनोळखी मयत इसम तपास कामी.

अनोळखी मयत इसम तपास कामी. 

सफाळे प्रतिनिधी -  दिनांक १० सप्टेंबर २०२१ रोजी कोरे पोस्ट एडवण गावाच्या समुद्र किनारी एक अनोळखी मयत पुरूष जातीचे प्रेत आढळून आले आहे. त्याचे वर्णन खालीलप्रमाणे. 
   वय अंदाजे ३० ते ४० वर्ष, अंगात निळ्या रंगाचा फुल बाह्यांचा शर्ट, काळ्या रंगाची फुल पॅन्ट, प्रेत पुर्णपणे कुजलेल्या अवस्थेत मिळुन आले असून दोन्ही हात - पाय माश्यांनी खाल्लेले आहे. सदर इसमाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असावा. केळवा सागरी पोलीस ठाणे ता,जि पालघर येथे अकस्मात मृत्यू रजि. नंबर ०७ / २०२१ सी. आर. पी. सी. १७४ प्रमाणे नोंद करण्यात आली असून, सदर इसमा बद्दल कोणासही, काही माहिती असल्यास किंवा मिळाल्यानंतर केळवा सागरी पोलीस ठाणे मोबाईल नंबर ८६६९६०४४३९ किंवा ८६६९६०४४३८ यावर संपर्क करावा. 
   पुढील तपास पालघर वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्या अधिपत्या खाली व प्रभारी अधिकारी  केळवा सागरी पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार पुढील तपास करीत आहे.

दिवा आणि ठाणे दरम्यान ५व्या आणि ६व्या लाइनच्या संदर्भात रविवार दि. २६.९.२०२१ रोजी कळवा आणि मुंब्रा दरम्यान विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक

*दिवा आणि ठाणे दरम्यान ५व्या आणि ६व्या लाइनच्या संदर्भात  रविवार दि. २६.९.२०२१ रोजी कळवा आणि मुंब्रा दरम्यान विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक*

ठाणे-दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गासाठी अप धीम्या मार्गाच्या स्लीविंगच्या संदर्भात मध्य रेल्वे रविवार दि. २६.९.२०२१ रोजी सकाळी ८.०० ते संध्याकाळी ६.०० (१० तास) दरम्यान कळवा -मुंब्रा अप धीम्या मार्गादरम्यान विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक परिचालीत करणार आहे.  यामुळे ट्रेन चालण्याचा प्रकार खालीलप्रमाणे असेल:  

कल्याण येथून सकाळी ७.२७ ते संध्याकाळी ५.४० पर्यंत  सुटणा-या अप मार्गावरील धीमी/अर्धजलद उपनगरीय  सेवा दिवा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळविली जाईल, पुढे मुलुंड येथे पुन्हा धीम्या मार्गावर वळवली जाईल आणि वेळापत्रकापेक्षा १० मिनिटे उशीराने त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचेल.  

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ८.०० ते सायंकाळी ५.०० दरम्यान सुटणा-या आणि सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आगमन होणा-या सर्व उपनगरीय सेवा गंतव्यस्थानी वेळापत्रकापेक्षा १० मिनिटे उशिराने पोहोचतील.  

ब्लॉक सुरू होण्यापूर्वी दिवा येथून कळवा आणि मुंब्रा स्थानकांसाठी  शेवटची उपनगरीय सेवा सकाळी ७.३८ वा. असेल. 
ब्लॉकनंतर दिवा येथून कळवा आणि मुंब्रा स्थानकांसाठी पहिली उपनगरीय सेवा सायंकाळी ६.०२ वा. असेल.   

या ब्लॉकमुळे, काही उपनगरीय सेवा रद्द केल्या जातील परंतु प्रवाशांच्या हितासाठी विशेष सेवा चालवल्या जातील.  ब्लॉक प्रभावित क्षेत्रात प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना बसची व्यवस्था करण्याचे सूचित केले आहे.  

या इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड ब्लॉकमुळे प्रवाशांना होणा-या गैरसोयीसाठी  रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.
 --- --- 
दिनांक: २२ सप्टेंबर २०२१ 
प्रप क्रमांक 2021/09/46 
सदर प्रसिद्धी पत्रक जनसंपर्क विभाग, मध्य रेल्वे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून जारी करण्यात आले आहे.

Tuesday, September 21, 2021

तरूण पञकारांचे मार्गदर्शक किशोरजी बळीराम पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

तरूण पञकारांचे मार्गदर्शक 
किशोरजी बळीराम  पाटील साहेब
वाडा : सत्यवान तरे 

महाराष्ट्र राज्यातून एकमेव आगरी समाजातील एका नामांकित दैनिकाचे संपादक म्हणून असलेले आदरणीय व्यक्तिमत्व मा.श्री.किशोर बळीराम पाटील  यांचा 52 वा वाढदिवस 22सप्टेंबर 2021या दिवशी  काही कारणास्तव साजरा केला नाही. तरी देखील ठाणे जिल्ह्यातूनच  नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भ्रमणध्वनी,वॉट्स अप ,फेसबुक, सोशल मिडिया च्या माध्यमातून तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोकण विभाग ,समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्य, मराठी पत्रकार संघ कोकण,यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. दैनिक स्वराज्य तोरण या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी आगरी समाजाबरोबर तळागाळातील लोकांच्या समस्या सोडविण्याचे काम  केले आहे.त्यांची जिद्द आणि  चिकाटीने ते त्यांनी आज दैनिक स्वराज्य तोरण या वृत्तपञाचे नावलौकिक मिळविले आहे.
त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दलच्या कामगिरीवर  बोलायचे झाले तर शब्द अपुरे पडतील असे अफाट कार्य त्यांनी केले आहे.(आगरीसमाजाचे भुषण म्हणून त्यांचे नाव महाराष्ट्रात घेतले जाते. तरूणांना आणि नव्या पञकारांना त्यांच्या आपल्या वृत्तपञात लिहीण्यासाठी त्यांनी संधी दिली .आणि भरपूर नवे पञकार घडविले आहेत. 
राजकीय घडामोडी व सामाजिक क्षेञात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे त्यांना विवीध क्षेत्रात त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेतली व त्यांनी महाराष्ट्रातील पहिला आगरी संपादक म्हणून महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानात राज्यस्तरीय समिती सदस्य म्हणून नियुक्ती झाली.पहिला आगरी संपादक जलयुक्त शिवार या पत्रकार पुरस्कार कमिटीवर नियुक्ती व आगरी गौरव पुरस्कार(2010.काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे)श्रमजीवी संघटनेचा पत्रकार गौरव पुरस्कार (2011)वसंत म्हात्रे सामाजिक संस्था गुंदवली गौरव पुरस्कार(2013)आगरी महोत्सव आगरी गौरव पुरस्कार(2014)श्री संत काशिनाथ बाबा प्रतिष्ठान भिवंडी गौरव पुरस्कार(2014)अखिल भारतीय आगरी साहित्य विकास मंडळ आगरी पत्रकार भुषण पुरस्कार(2015)तगायत फाऊंडेशन बौध्द धर्म परिषद ठाणे धम्म पुरस्कार ठाणे (2015)तसेच शुभ सामाजिक संस्था गौरव पुरस्कार(2016)धर्मराज फाऊंडेशन आगरी कोळी महोत्सव गौरव पुरस्कार(2017)आगरी शिक्षण संस्था नवीन पनवेल पत्रकार गौरव  पुरस्कार(2017) तसेच त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.त्यांना नुकताच महात्मा गांधी ग्लोबल पिस फाऊंडेशन भारत यांच्या वतीने भारत सेवा रत्न गोल्ड मेडल पुरस्कार 2021 ने आर.एस.पी.कमांडर डॉ. मनीलाल शिंपी यांनी एका कार्यक्रमात सन्मानित केले. तसेच  2009 ते 2021 सालाबादप्रमाणे  नियमित  त्यांनी 13 वर्धापनदिन साजरे केले आहेत तसेच ११ व्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकार व ट्रॉफिक पोलीस यांना हेल्मेट रेनकोट देण्यात आले तसेच  शालेय विध्यार्थी यांना टी शर्ट पेन वह्या व आरोग्य शिबीर व  विवीध  शासकीय समित्यांवर त्यांची  नेमणूक झाली आहे. व या कामी त्यांना त्यांच्या परिवाराची मोठी साथ मिळते. ह,भ,प,श्री,बळीराम दादाजी पाटील(वडील)ह,भ,प.सौ,पार्वतीबाई बळीराम पाटील (आई) मोठे बंधू,श्री,अनंत पाटील,स्व. अशोक पाटील,पत्नी सौ,संगिता किशोर पाटील,(शाखाधिकारी सह्याद्री पतसंस्था शिवाजी नगर शाखा)मुलगा,कु,यतिष किशोर पाटील (स्वाफ्टवेअर इंजिनिअर)सद्या डीलाईट कंपनी पवई मुंबई येथे सर्व्हिस करत आहे. व,मुलगी कु,नेहा ही बीकॉम झाली असून सद्या ती सी,ए, ची आर्टिकल शिप करीत आहे असा परिवार आहे. दैनिक स्वराज्य तोरण हे 21 ऑगस्ट 2008 रोजी सुरू केले आणि त्यांच्या वयाची ५२ वी साजरी असली तरी काही कारणास्तव साजरी करण्यात येणार नाही.अशा मोठया व्यक्तीमत्व असलेल्या किशोरजी बळीराम पाटील साहेबांनी स्वराज्य तोरणच्या वृत्तपत्राच्या 12 वर्धापन दिन मोठया उस्तवात साजरे केले आहेत. कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव आजार असल्यामुळे  12 वा 13 वा वर्धापन दिन साजरा करता आला नाही  मात्र या दोन वर्षाच्या काळात त्यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी स्विकारत  प्रदेश अध्यक्ष श्री.वसंत मुंढे,प्रदेश संघटक श्री.संजय भोकरे,प्रदेश सरचिटणीस श्री. ह.भ.प.श्री.विश्वासराव आरोटे,कोकण विभाग अध्यक्ष श्री.नितीन शिंदे यांच्या मार्गदर्शनखाली पत्रकारांसाठी आर्थिक मदती पासून ते रेशन कीड साहित्य वर्षभर पुरेल अशा प्रकारे मदतीचा हात पुढे केला हे वाख्याण्या जोगे आहे.व त्यांचा वाढदिवस  देखील मोठे बंधु कोरोनाच्या आजाराने निधन पावल्याने करण्यात येणार नाही.त्यामुळे वॉट्स अप च्या माध्यमातुन किशोरजी पाटील   साहेबांना दिग्गज वार्ताहर परिवार तर्फे वाढदिवसाच्या माझ्या कडून व माझ्या परिवाराकडून मनःपूर्वक खूप साऱ्या  शुभेच्छा. ...


प्रभाकर बाविस्कर यांनी मरणोत्तर नेत्रदान करून समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला... समाजातील सच्चा समाजसेवक हरपला - मणिलाल शिंपी

प्रभाकर बाविस्कर यांनी मरणोत्तर नेत्रदान करून समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला...
 समाजातील सच्चा समाजसेवक हरपला - मणिलाल शिंपी 
कल्याण दी.२१(किशोर पाटील)कल्याण ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे सचिव प्रभाकर बाविस्कर यांचे हृदय विकाराच्या झटक्याने  नुकताच निधन झाले. प्रभाकर बाविस्कर सर हे नंदुरबार जिल्हा शहादा तालुक्यातील येथील अतिशय गरीब शिंपी कुटुंबातील प्रभावी व्यक्ती महत्व होते.ते नंदुरबार सोडून ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यात राहतात, त्यांनी  मुंबईसारख्या नगरीत येऊन सेंटर रेल्वे ज्युनिअर कॉलेज येथे प्राध्यापकाची नोकरी मिळवली व नोकरी करूनही समाजासाठी आपण काहीतरी केले पाहिजे अशी मी तळमळ त्यांची समाजाच्या विकासासाठी आणि गरजू गरीब लोकांसाठी काहीतरी मदत उपलब्ध करून द्यावी प्रबोधन करावे यासाठी ते तत्पर असत. निवृत्तीनंतरच्या काळातही त्यांनी विठ्ठलवाडी कल्याण उल्हासनगर परिसरातील ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवून समाजामध्ये लौकिक मिळवला होता. कोरोणा सारख्या महामारीतही त्यांनी अनेक गरजू लोकांना रेशन पुरवणे अन्न पुरवणे आणि लसीकरण केंद्रातही ते प्रशासनाला मदतीसाठी स्वयंसेवकांचे काम करीत होते. असे हे माननीय बाविस्कर सर आज अचानक पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने आपल्यातून निघून त्यांनी आपल्या मृत्युपत्रात नोंद केले प्रमाणे मरणोत्तर नेत्रदान करण्याची संकल्पना त्यांच्या पत्नी वर्षा बाविस्कर,मुलगा हार्दिक प्रभाकर बाविस्कर, यांनी त्वरित मातोश्री गोमती बेन रतन सी भाई छे सहियारा आय केअर बँक (आय केअर असोसिएशन ऑफ इंडिया) च्या मेडिकल डायरेक्टर डॉ. जतीन असहर यांच्याशी संपर्क साधून , काउंसलर आणि ॲडव्हायझर वैभवी मॅडम यांच्या सहकार्याने नेत्रदान करून घेतले. व एक मोठा आदर्श समाजासमोर ठेवला.निशिगंधा गणेश जाधव,गणेश रामदास जाधव, सौ.मंजुषा हार्दिक बाविस्कर,नातवंडे , युगंधरा,ओमकार, हर्ष,पारस, असा परिवार आहे.त्यांचा जाण्याने समाजामध्ये आणि संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.यावेळी आर एस पी अधिकारी युनिट कमांडर मणिलाल शिंपी त्यांनी शोक संदेश देताना सांगितले की सन्माननीय  बाविस्कर सर हे नात्याने मामा होते. आज मी समाजसेवा करत आहे ते त्यांच्या सेवेची प्रेरणा आहे. सदैव माझ्या पाठीशी राहून ते मला समाजसेवेचे बाळकडू देत होते परंतु आता ते आम्हाला सोडून गेले आणि आम्ही पोरके झालो असे वाटत आहे. परमेश्वर त्यांच्या मृतात्म्यास शांती देवो ही प्रार्थना या शब्दात श्रद्धांजली अर्पण केली.

राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त वाडा तालुक्यामध्ये जंतनाशक मोहिम संपन्न .

राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त वाडा तालुक्यामध्ये जंतनाशक मोहिम संपन्न .
सफाळे (प्रतिनिधी)
 आज राष्ट्रीय जंतनाशक दिन असल्याने वाडा तालुक्यातील उपकेंद्र वाडा नंबर एक अंतर्गत अंगणवाडी केंद्र मध्ये एक ते दोन वर्ष ,दोन ते तीन वर्षे, तीन ते सहा वर्ष ,सहा ते १९ वर्षे वयोगटातील लहान मुलांना जंतनाशक गोळ्या प्रत्यक्ष खाऊ घालण्यात आलेल्या  आहेत 
 एकूण आठ अंगणवाडी मध्ये हा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे .
 पेटरांजणी  ,ऐनशेत , ऐनशेत रोड मीनाताई ठाकरे नगर, सिद्धेश्वरी रोड, संजय गांधी नगर ,गणेश मैदान ,राजीव गांधी नगर या आठ अंगणवाड्यांमध्ये हा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे  याप्रसंगी वाडा तालुका प्राथमिक आरोग्य केंद्र परळी अंतर्गत  एस. डी. पाटील तसेच आर. जी गायकवाड हे कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

आगरी समाज व इतर समाज्याच्या आशीर्वादाने मराठी बिग बॉस सीजन - 3 मध्ये लोकप्रिय सुप्रसिद्ध गायक संतोष चौधरी उर्फ दादूसची धमाल.....!

आगरी समाज व इतर समाज्याच्या आशीर्वादाने मराठी बिग बॉस सीजन - 3 मध्ये लोकप्रिय सुप्रसिद्ध गायक संतोष चौधरी उर्फ दादूसची धमाल.....!

भिवंडी दी.२१(किशोर पाटील ) महाराष्ट्रातील मराठी सिनेमाचे सुप्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक,अभिनेते , महेश मांजरेकर यांचे दर्जेदार , सुत्रसंचालन लाभलेला आणि अत्यंत लोकप्रिय असलेल्या, चोखंदळ रसिक प्रेक्षकांच्या आवडीचा , मनोरंजक कार्यक्रम रविवार दिनांक १९ सप्टेंबर २०२१ पासुन सुरु झाला आहे. कलर्स मराठीवर बिग बॉस सीजन 3 ची दमदार सुरवात झालेल्या तसेच मनोरंजन विश्वात सर्वाधिक टिआरपी खेचणारा कार्यक्रम म्हणून मराठी बिग बॉस ओळखला जातो." बिग बॉस च्या
चावडीवर या " अशा धमाकेदार शिर्षक गीताने कार्यक्रमाची सुरुवात होणाऱ्या मराठी बिग बॉसच्या या घरात जाण्याचं अनेक लेखक , दिग्दर्शक, कलाकार , गायक , संगीतकार अशा अनेक दिग्गजांचं स्वप्न असतं. यंदाच्या सीजन 3 मध्ये बिग बॉसच्या घरात असेच लोकप्रिय कलावंत दिसणार आहेत.संगीत क्षेत्रातील मराठी आणि आगरी-कोळ्यांचा व इतर समाज्याचा  बप्पी लहरी म्हणून ओळखला जाणारा महाराष्ट्रातील लाडका लोकप्रिय गायक संगीताचा शानदार आवाज श्री.संतोष चौधरी उर्फ दादूस प्रेक्षकांना मराठी बिग बॉसच्या घरात पहायला मिळणार आहे. तसेच भिवंडीतील कामतघर येथील दादूस म्हणजे संतोष चौधरी यांची बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाली आहे.सुप्रसिद्ध गायक संगीतकार दादूस यांना लहानपणा पासूनच संगीताची गाण्याची आवड, दादूसच्या बाबांना देवींच्या गाण्याची आवड होती. देवीच्या जागरणातून ते गाणी सादर करत. त्याला आगरी भाषेत बायाची गाणी म्हणतात.आगरी संस्कृती, संगीताचा वारसा गायक दादूस यांना बाबांकडूनच लाभला आहे. तसेच “आई तुझा लालुल्या” या लोकप्रिय गाण्याने दादूस यांना खरी ओळख मिळाली आहे. लहानपणी दोन्ही पायांमध्ये अपंगत्व होतं मात्र आईने दादूस यांची सेवा केली आणि दादूसला दोन्ही पायांवर उभं केलं आहे. अशी एक अविस्मरणीय आठवण दादूस यांनी मराठी बिग बाँस मध्ये सांगितली.तसेच बायांची गाणी, धौलगीते, कोळीगीते आदी लोकसंगीताचा बादशाह म्हणून गायक दादूस यांची एक स्वतंत्र ओळख आहे. त्याचप्रमाणे दादूस यांचा पेहराव, डोळ्यावर काळा गॉगल, गळ्यात जाड्या सोन्याच्या चैन, पाचही बोटात अंगठ्या हा सुप्रसिद्ध संगीतकार बप्पी लहरी यांच्यासारखा सेम टू सेम असल्याने मराठी व आगरी-कोळ्यांचा बप्पी लहरी म्हणूनच दादूस यांना ओळखलं जात आहे. हिंदी चित्रपट क्षेत्रातील सुप्रसिद्ध संगीतकार बप्पी लहरी उर्फ बप्पीदा हे गायक दादूस यांचे संगीतातील मोठे आदर्श आहेत.बप्पी लहरी यांच्या सुपर डुपर हिट, लोकप्रिय गाण्यांचे दादूस जबरदस्त चाहते आहेत. मराठी बिग बॉस या लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून दादूस निश्चितच प्रेक्षकांची मने जिंकतील व आगरी समाजाचे एकमेव गायक म्हणून त्यांनी कलर्स मराठी बिग बॉस सीजन 3 वर आपले नाव कोरले असे म्हणायला वावगे ठरू नये.त्यामुळे त्यांना त्यांचे संगीत क्षेत्रातील गुरुवर्य ,दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोकण विभागीय सरचिटणीस श्री. किशोर बळीराम पाटील यांनी पुढील वाटचालीसाठी त्यांच्याशी प्रत्यक्ष भ्रमणध्वनीवरून बोलताना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

Monday, September 20, 2021

वाडा तालुक्यात कायदेविषयक शिबिराचे आयोजन

*वाडा तालुक्यात कायदेविषयक शिबिराचे आयोजन*

(वाडा प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुबंई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे यांच्या निर्देशांनुसार भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त ग्रामीण भागामध्ये कायदेविषयक जनजागृती होण्याकरिता ग्रुप ग्रामपंचायत सरस ओहळ विल्कोस शीळ व प्राथमिक शाळा गोऱ्हे येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले व सर्व सामान्य नागरिकांना कायदेविषयक तरतुदीची माहिती होण्यासाठी व शासनाच्या विविध योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी विधी सेवा प्राधिकरण काम करत असते या कामाचा भाग म्हणून लोकांमध्ये कायदेविषयक जनजागृती होण्याकरिता ग्रामीण भागात कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात प्रामुख्याने जेष्ठ विधिज्ञ् श्री सी पी पाटील यांनी जेष्ठ नागरिक कायदा विधिज्ञ् श्री दिलीप पष्टे यांनी कुळ कायदा श्री धनंजय पष्टे व विधिज्ञ् श्री खिलारे यांनी जामीन तरतुदी व न्यायालीन बंदीचे अधीकार अशा विषयावर मार्गदर्शन केले तसेच श्री एम डी सैदाणे तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर वाडा यांनी मोफत कायदेविषयक साहाय्य व विधिसेवा प्राधिकरणाची भूमिका या विषयी मार्गदर्शन करून दाखलपूर्व व प्रलंबित प्रकरणे मध्यस्थी व लोक अदालत या वैक्लिपक वाद निवारण माध्यमामार्फत मिटवण्या बाबत ग्रामस्थांना आवाहन केले सदर कार्यक्रमाच्या वेळी वाडा तालुका वकील संघांचे विधिज्ञ् श्री सचिन पाटील श्री रणधीर खिलारे श्री अविनाश साळवे व सुधीर पाटील वाडा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री दिलीप पवार व स्टाफ ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामसेवक श्री डी आर जोशी वरिष्ठ लिपिक तालुका विधी सेवा समिती वाडा श्री पुणेकर कनिष्ठ लिपिक श्री केवारी शिपाई इत्यादी हजर होते

मुंबई विद्यापीठ विभागीय कार्यालय येथे गेल्या 20 दिवसापासून सुरू असलेल्या कोरोनालसीकरण मोहीमेला मोठा प्रतिसाद!

मुंबई विद्यापीठ विभागीय कार्यालय येथे गेल्या 20 दिवसापासून सुरू असलेल्या कोरोना
लसीकरण मोहीमेला मोठा प्रतिसाद!
 कल्याण दी.२०(किशोर पाटील)


आर एस पी अधिकारी युनिट कल्याण डोंबिवली यांच्या नेतृत्वाखाली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अंतर्गत समाज सेवक सुनील जी वायले नगरसेविका सौ.शालिनी सुनिल वायले आणि शिक्षक सेना यांच्या सहकार्याने मुंबई विद्यापीठ विभागीय कार्यालय येथे गेल्या 20 दिवसापासून कोविड(कोरोना ) लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले असून नागरिकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे दररोज 2000 नागरिकांना लस देण्यात येत आहे. सदर मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व टीम वर्क मोठे काम करीत आहे.अत्यंत शिस्तीत कोणत्याही प्रकारची कायदा व सुव्यवस्था न बिघडवता , आर एस पी अधिकारी  कल्याण-डोंबिवली युनिट यांच्यामार्फत ज्येष्ठ नागरिक अपंग यांना विशेष मदत उपलब्ध करून सेवा देत आहेत. आर एस पी युनिटच्या सामाजिक बांधीलके मुळे कल्याण-डोंबिवली परिसरात अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे.

Sunday, September 19, 2021

अमेठी ( उत्तर प्रदेश ) येथे झालेल्या २३ वर्षा आतील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्रातील कुस्तीगिरांनी २ सुवर्ण पदक , २ रोप्य पदक व ५ कास्य पदक पटकावून महाराष्ट्राचे वर्चस्व कायम ठेवले

अमेठी ( उत्तर प्रदेश ) येथे झालेल्या २३ वर्षा आतील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्रातील कुस्तीगिरांनी  २ सुवर्ण पदक , २ रोप्य पदक व ५ कास्य पदक पटकावून महाराष्ट्राचे वर्चस्व कायम ठेवले
 ... 
अमेठी - किशोर पाटील
नुकताच पारपडलेल्या पुरुष फ्री-स्टाईल कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या पै. सुरज कोकाटे (   ६१किलो  ) वजनी गटात  जुनियर वर्ल्ड रोप्य-पदक विजेता पै. रविंदर ( सेना दल ) याला ९- ८ अशा गुणफरकाने  हरवून   चित्तथराक कुस्ती लढून सुवर्ण पदक पटकावले . तसेच पुण्याचा पै. आदर्श गुंड याने राजस्थान , चंदीगड च्या पैलवानांना हरवून रोप्य पदक पटकावले . 
दिनांक १७ ते १९ दरम्यान पारपडलेल्या स्पर्धेचे विविध गटातील  पदक विजेते खालील प्रमाणे :- 
फ्री- स्टाईल :- ५७ किलो - सुवर्ण पदक 
 पै. सौरव इगवे  ( सोलापूर ) आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे , प्रशिक्षक :-  अर्जुनवीर पै. काका पवार 
फ्री- स्टाईल :- ६१किलो - सुवर्ण पदक 
 पै. सुरज  कोकाटे  ( पुणे ) आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे , प्रशिक्षक :-  अर्जुनवीर पै. काका पवार 
फ्री- स्टाईल :- ६५ किलो - रोप्य पदक 
 पै. सौरभ पाटील  ( कोल्हापूर ) वीर हनुमान तालीम ,राशिवडे ता.  राधानगरी , प्रशिक्षक :-  पै. सागर चौघुले 
फ्री- स्टाईल :- ७९ किलो - कास्य पदक  
 पै. समीर शेख  ( सोलापूर ) हनुमान आखाडा पुणे , प्रशिक्षक :- गणेश दांगट 
फ्री- स्टाईल :- १२५ किलो - कास्य पदक  
 पै. आदर्श गुंड  ( पुणे ) जोग व्यायाम शाळा , देवाची आळंदी पुणे प्रशिक्षक :- आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच प्रा . दिनेश गुंड 
ग्रीको - रोमन :- ७७ किलो -  कास्य पदक  
पै. गोकुळ यादव  ( मुंबई ) जोगेश्वरी कुस्ती आखाडा 
महिला :- ५३ किलो कास्य पदक 
स्वाती शिंदे  ( कोल्हापूर ) सदाशिव राव मंडलिक कुस्ती केंद्र , मुरगूड ता. कागल , कोल्हापूर प्रशिक्षक :-  पै. दादासो लवटे 
महिला :- ५९ किलो रोप्य  पदक 
भाग्यश्री फंड  ( अ . नगर  ) इंटरनॅशनल कुस्ती संकुल श्रीगोंदा ,  प्रशिक्षक :-  पै. किरण मोरे
महिला :- ६२ किलो कास्य पदक 
सोनाली मंडलिक ( अ . नगर  )  ( अ . नगर  ) इंटरनॅशनल कुस्ती संकुल श्रीगोंदा ,  प्रशिक्षक :-  पै. किरण मोरे 
पै. सौरभ व पै. सुरज कोकाटे यांची सायबेरिया येथे होणाऱ्या जागतिक अंडर २३ वयोगटातील स्पर्धेसाठी थेट निवड झाली आहे . 
सदर स्पर्धेस पंच :- आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच प्रा. दिनेश गुंड ( पुणे ) व  आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच श्री नवनाथ ढमाळ ( सातारा ) व प्रशिक्षक :- श्री संदीप पठारे ( पुणे ) अनिता गव्हाणे ( बारामती ) श्री संभाजी निकाळजे ( अ . नगर )  यांनी मोलाचे सहकार्य केले . 
वरील सर्व पदक विजेते खेळाडू व त्यांचे प्रशिक्षक, पालक मंडळींचे  महाराष्ट्र  राज्य कुस्तीगीर परिषदे तर्फे व दैनिक स्वराज्य तोरण परिवाराकडून हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.

Saturday, September 18, 2021

पत्रकार संघाचे उपक्रम दिशादर्शक.. डॉ.पै.तानाजी जाधवअहमदनगर

पत्रकार संघाचे उपक्रम दिशादर्शक.. डॉ.पै.तानाजी जाधव
अहमदनगर 
 भिवंडी (किशोर पाटील)
 : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे उपक्रम हे दिशादर्शक आणि सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तिं पत्रकारांच्या न्यायासाठी ठामपणे उभे राहणे दिशादर्शक आहे असे प्रतिपादन टायगर ग्रुपचे अध्यक्ष  पै.डाॅ.तानाजी भाऊ जाधव यांनी केले. तर १८ वर्ष गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा हा उपक्रम दरवर्षी राबविणे हे कौतुकास्पद आहे असे मत आमदार डॉ किरण लहामटे यांनी व्यक्त केले.
           विरगाव ता अकोले येथे आनंदगड शिक्षण संकुलात आयोजित महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इयत्ता दहावी व बारावी च्या गुणवंत विद्यार्थी व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, पोलीस पाटील कोव्हिडं योध्दा पुरस्कार सोहळा कार्यक्रमात पै. जाधव अध्यक्षपदावरून बोलत होते. यावेळी अकोले विधानसभा सदस्य आमदार डॉ किरण लहामटे, डि.एम उद्योग समुहाचे सागर दोलतोडे, उद्योजक बंडु भागवत, पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे, आनंदगड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, भाजपचे जेष्ठ नेते शिवाजीराजे धुमाळ, अकोले ता.एज्युकेशन चे अध्यक्ष जे.डी.आंबरे, पत्रकार संघाचे राज्य प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव, अगस्ती चे संचालक सुनील दातीर, अकोले एज्युकेशन संस्थेचे खजिनदार एस पी देशमुख, प स सदस्य अरुण शेळके आदी उपस्थित होते.
       लोकप्रिय  आमदार किरण लहामटे म्हणाले की, राजकारण चांगले माणस आले तरच समाजाचा विकास होईल, तालुक्यातील उच्च शिक्षित सरपंच झालेमुळे कोव्हिडं ची साथ आटोक्यात राहिली.कोव्हिडं काळात सरपंच, पोलीस पाटील यांचे योगदान आहे त्यांचा सन्मान करणे उचित आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून दरवर्षी गुणवंत विद्यार्थी व समाजात उत्कृष्ट सामाजिक काम करणार्या व्यक्तिंना सन्मानित करण्यात येते. हे काम विश्वास आरोटे नियमित करतात.
    पत्रकार संघाचे हनुमान बनुन सर्व पत्रकारांना मायेचा आधार पत्रकार संघाचे सरचिटणीस विश्वासराव आरोटे देत आहे. लहान आणि मोठा असा भेद या पत्रकार संघात नाही बत्तीस हजार पत्रकारांचे संघटन जपनारा आणि सामाजिक बांधिलकी ठेवणारा एकमेव पत्रकार संघ हा मराठी पत्रकार संघ आहे असे प्रतिपादन डि एम उद्योग समुहाचे अध्यक्ष सागरभैय्या दोलतोडे यांनी केले
          राज्य सरचिटणीस विश्वासराव    आरोटे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ  संजयजी भोकरे व प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या सहकार्याने सर्वांना सोबत घेऊन चालणारा पत्रकार संघ आहे. कोविड काळात मयत पत्रकारांच्या कुटुंबाला धनादेश देत मदतीचा हात संघाने दिला आहे. पत्रकारांचे विमा व संरक्षण यासाठी राज्या पासुन ते केंद्रापर्यत आपली बाजु मांडीत पत्रकार संघ खंबीर उभा राहत आहे.तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत चे कोविड च्या काळातील काम उल्लेखनीय आहे त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत चा सन्मान झाला पाहिजे त्यास सर्वांनी एकमत करूण पुरस्कार प्रदान केले. संपुर्ण तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीस कोविड योध्दा पुरस्कार देऊन सन्मानित करणारा पत्रकार संघ हा तालुक्यातील प्रथमच आहे याचा आनंद आहे.
       यावेळी धुमाळवाडी चे सरपंच रविंद्र गोर्डे, डोंगरगाव चे सरपंच बाबासाहेब उगले, यांनी मनोगत व्यक्त केले. अभियंता दिनाचे औचित्य साधून इंजिनियर सुनील दातीर व अनिल राहणे सर यांचे चिरंजीव यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
         कार्यक्रम यशस्वीते साठी जिल्हाप्रसिध्दी प्रमुख भाऊसाहेब वाकचौरे जिल्हाउपाध्यक्ष विद्याचंद्र सातपुते, तालुकाध्यक्ष अशोक उगले, सचिव अनिल नाईकवाडी, उपाध्यक्ष ललित मुतडक, हरिभाऊ फापाळे, भागवत खोल्लम, जगन्नाथ आहेर, सुरेश देशमुख, सुनील शेणकर, सचिन लगड,संजय टिकेकर,सुनील आरोटे, ओम अस्वले, शंकर संगारे, निखिल भांगरे .प्रविण धुमाळ.राजु जाधव सर्व तालुका कार्यकारिणी तसेच सर्व ग्रामपंचायत चे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक विद्यार्थी उपस्थित होते. तसेच टायगर ग्रुपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन कार्याध्यक्ष दत्ता जाधव यांनी तर  आभार सोशल मिडीया प्रमुख गणेश रेवगडे यांनी मांडले.. पत्रकार संघाच्या कार्यक्रमातून समाजामध्ये एकतेचा संदेश पत्रकार हा समाजाचा उल्लेखनीय कार्याची दखल घेतो

कोकण प्रादेशिक विभागात लघुदाब ग्राहकांकडे 3562 कोटी थकीतथकबाकी भरून सहकार्य करण्याचे सहव्यवस्थापकीय संचालक (प्र) श्री. प्रसाद रेशमे यांचे आवाहन

कोकण प्रादेशिक विभागात लघुदाब ग्राहकांकडे 3562 कोटी थकीत

थकबाकी भरून सहकार्य करण्याचे सहव्यवस्थापकीय संचालक (प्र) श्री. प्रसाद रेशमे यांचे आवाहन


कल्याण: (प्रतिनिधी)दि. 17 सप्टेंबर 2021

महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागात सर्व वर्गवारीतील (कृषिपंप ग्राहक वगळून) 50 लाख 19 हजार लघुदाब ग्राहकांकडील वीजबिलाची थकबाकी 3 हजार 562 कोटी रुपयांवर पोहचली आहे. महावितरणची सध्याची कठीण आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन ग्राहकांनी चालू वीज बिलासह थकबाकीचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक (प्र) श्री. प्रसाद रेशमे यांनी केले आहे. तर वीजबिल वसुलीसाठी वीज पुरवठा खंडित करण्याची मोहिम तीव्र करण्याचे निर्देश देतानाच या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरूद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

कोकण प्रादेशिक विभागात कल्याण, भांडुप, रत्नागिरी, नाशिक आणि जळगाव परिमंडलांचा समावेश होतो. महावितरणच्या दरमहाच्या एकूण महसुलात जवळपास ४० टक्क्यांपेक्षा अधिक योगदान देणारा हा विभाग असून या विभागातील थकबाकीचा वाढता डोंगर महावितरणच्या आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम करणारा ठरत आहे. परिणामी दैनंदिन खर्चासह, कर्मचाऱ्यांचे पगार, वीज खरेदीसारख्या अत्यावश्यक बाबींसाठी कर्ज काढण्याची वेळ महावितरणवर आली आहे. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळाचा कार्यक्षम वापर करून थकबाकी वसुलीच्या कामाला गती देत निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सहव्यवस्थापकीय संचालक सातत्याने मुख्य अभियंते, अधीक्षक अभियंते ते थेट कार्यकारी अभियंत्यांपर्यंत संवाद साधत वसुलीचा आढावा घेऊन आवश्यक निर्देश देत आहेत. 500 रुपयांपेक्षा अधिकची थकबाकी असणाऱ्या 20 लाख 71 हजार घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांकडून (2 हजार 909 कोटी रुपये थकबाकी) वसुली करावी अथवा त्यांचा वीजपुरवठा तातडीने खंडित करण्याचे आदेश सहव्यवस्थापकीय संचालकांनी दिले असून यात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा निश्चित असल्याचे सुतोवाच त्यांनी केले आहे. तर विनंती व पाठपुरावा करून पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांचे चालू वीजबिल वसूल करावेत. याशिवाय चालू वीजबिलाचा भरणा करणाऱ्या कृषीपंप ग्राहकांना थकबाकीत 66 टक्क्यांपर्यंत सवलत देणाऱ्या कृषिपंप धोरण 2020 योजनेचा लाभ देऊन थकबाकी वसुलीला चालना देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

कोकण प्रादेशिक विभागात लघुदाब वर्गवारीतील 43 लाख 24 हजार घरगुती ग्राहकांकडे 739 कोटी, 5 लाख 23 हजार व्यावसायिक ग्राहकांकडे 306 कोटी, 1 लाख 4 हजार औद्योगिक ग्राहकांकडे 372 कोटी, 23 हजार 649 पाणीपुरवठा योजनांकडे 498 कोटी तर 44 हजार 754 पथदिवे जोडण्यांचे 1 हजार 646 कोटी रुपयांचे वीजबिल थकीत आहे. भांडूप परिमंडलात 10 लाख 32 हजार 612 ग्राहकांकडे 537 कोटी, कल्याण परिमंडलात 13 लाख 3 हजार 718 ग्राहकांकडे 553 कोटी, कोकण (रत्नागिरी) परिमंडलात 4 लाख 62 हजार 695 ग्राहकांकडे 136 कोटी, नाशिक परिमंडलात 12 लाख 24 हजार 319 ग्राहकांकडे 995 कोटी आणि जळगाव परिमंडलात 9 लाख 96 हजार 172 ग्राहकांकडे 1 हजार 341 कोटी रुपयांची वीजबिल थकबाकी आहे.

----------------

Friday, September 17, 2021

वाढदिवस साजरा करायचा असेल तर कसा करावा हे उत्तम उदाहरण

वाढदिवस साजरा करायचा असेल तर कसा करावा हे उत्तम उदाहरण 

भिवंडी (प्रतिनिधी)वाढदिवस साजरा करायचा असेल तर कसा करावा हे उत्तम उदाहरण 
अनेक जण वाढदिवसाच्या दिवशी पार्टी करतात , फिरायला जातात , भरमसाठ खर्च करतात पण एक आदर्श राहील सर्वांसमोर असा
आज दिनांक 17- 09 - 2021 रोजी 
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे भिवंडी ग्रामीण विभाग अध्यक्ष श्री गिरीश महेश देव यांनी आपल्या भिवंडी मधील मैत्रीकुल अनाथ आश्रमात स्वतः जाऊन त्यांना लागणाऱ्या उपयोगी वस्तू दिल्या ( 50 किलो कांदे , 50 किलो बटाटे 25 किलो लसूण , चटई , चादर , प्रोजेक्टर व स्ट्रीट लाईट ) ह्या वस्तू त्यांना अत्यंत गरजेच्या होत्या 
त्या अनाथ आश्रमात अनेक  विद्यार्थी शिकून चांगल्या क्षेत्रात करिअर करत आहेत त्यांना कोणाचाही आधार नाही जे कोणी जस देईल त्यात ते समाधानाने वापर करून जगतात त्यांच्या सोबत एक आनंदाचा क्षण साजरा केला 

त्या आश्रमाचे जगताप सर सर्व मुलांची देखभाल आणि आश्रम चालवतात बापगाव येथे मैत्री कुल चे एक सुंदर घर तयार झाले आहे  

तरी ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी जशी जमेल तशी मदत करावी ही विनंती श्री गिरीश महेश देव यांनी केली आहे

Thursday, September 16, 2021

राष्ट्रवादीच्या महिला तोंड लाल करून मुका मार पण देतात.... स्वाती कांबळे.... राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भिवंडी शहर जिल्हा तर्फे प्रविण दरेकरचा जाहिर निषेध करण्यात आला

* राष्ट्रवादीच्या महिला तोंड लाल करून मुका मार पण देतात.... स्वाती कांबळे.... राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भिवंडी शहर जिल्हा तर्फे प्रविण दरेकरचा जाहिर निषेध करण्यात आला 
भिवंडी दि.१६(किशोर पाटील)
 प्रदेश अध्यक्षा आदरणीय रूपालीताई चाकणकर यांच्या आदेशाने भाजपा चे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेता प्रवीण दरेकर यांचा जाहिर निषेध आज गुरुवार दि. १६/९/२०२१ रोजी भिवंडी शहर राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने करण्यात आला. *प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी  काॅंग्रेस पक्ष हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष आहे. अशी  अतिशय खालच्या दर्जाची टीका केलीली आहे प्रवीण दरेकरांच्या बेताल वक्तव्याचा निषेध करण्यात आला. जुना जकात नाका आनंद दिघे चौक येथे प्रवीण दरेकराच्या फोटोला लाली लिपस्टिक लावून चप्पल ने गाल लाल करून त्यांचा फोटो जाळण्यात आला तसेच प्रविणा मावशी ही उपाधी देऊन तसा बॅनर देखील बनविण्यात आला. प्रवीण दरेकर मुर्दाबाद, माफी मांगो अशी नारे बाजी करण्यात आली हा फक्त राष्ट‘वादी काॅंग्रेस पक्षातील पुरूष, पदाधिकारी कार्यकर्ते यांचाच अपमान नसून संपूर्ण महिलांचा सुद्धा अपमान आहे. स्त्री मातेसमान संस्कृती असण्या-या महाराष्ट्रामध्ये महिलांना मान/सन्मान* *सषक्तीकरणाचे धडे देणारा एकमेव राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष आहे प्रवीण दरेकर यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा जाहिर निषेध करण्यासाठी महिला शहर अध्यक्ष स्वाती कांबळे, अलका गायकवाड, सुलभा जाधव, शमीम अन्सारी अफसाना खान, कांता जाधव, सुनीता राऊत, शबाना अन्सारी, सीतारून, अल्ताफ रंगरेज, सरवर अन्सारी मोठया संख्येने महिला कार्यकर्त्यां उपस्थित होत्या*

भिवंडी महापालिकेला लाजवेल असा काल्हेर ग्रामपंचायतीचा थाट... गणेश विसर्जन घाटावरील सोयी सुविधा मध्ये जिल्हाभर नाव लौकीक.

भिवंडी महापालिकेला लाजवेल असा काल्हेर ग्रामपंचायतीचा थाट...
 गणेश विसर्जन घाटावरील सोयी सुविधा मध्ये जिल्हाभर नाव लौकीक...
भिवंडी दि.१६(किशोर पाटील) भिवंडी तालुक्यातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून नाव लौकीक असलेल्या काल्हेर ग्रामपंचायतीने राज्य सरकारच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून सरपंच सौ.योगिता अनिल म्हात्रे,उप सरपंच श्री. भरत जयवंत पाटील,ग्रामविकास अधिकारी श्री.रमेश राठोड,व सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य यांनी गणेश विसर्जन घाटावरील केलेली पूर्व तयारी पाहता भिवंडी महानगपालिका असो वा इतर जिल्ह्यातील पालिका प्रशासन असो  या सर्वांना प्रेरणादायी व लाजवेल असे काम त्यांनी केले आहे.
यासाठी त्यांना नारपोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.मालोजी शिंदे व त्यांचे सर्व सहकारी यांनी मोलाची साथ दिली आहे.त्यामुळे दीड दिवसांच्या गणपती पासून ते आज पर्यंत गणेश घाटावरील सोयी सुविधा मध्ये वाढ होताना दिसत आहे.त्यांनी सजवलेलं व डेकोरेट केलेलं समुद्र किनाऱ्या पासून ते ४० ते ५० फूट अंतरावर गणेश मूर्ती चालत घेऊन जाऊन तेथे कोणत्याही प्रकारची गर्दी न करता अगदी सहज प्रवेश केला जातो. व राज्य शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे हा उद्देश समोर ठेऊन गणेश मूर्ती विसर्जित केल्या जातात.विशेष म्हणजे 
वार्ड क्रं.१ ते वार्ड क्रं.६  मध्ये वेगवेगळे टेबल माडण्यात आले आहेत.व प्रत्येक वार्ड साठी दोन निरीक्षक नेमले आहेत जेणे करुन प्रत्येक वार्ड मधील गणेश मूर्ती ही नेमणूक केलेल्या निरीक्षकाच्या  ताब्यात दिली जाते.जेणे करून गर्दी होत नाही.नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे.अशा घटनेमुळे 
काल्हेर ग्रामपंचायतीचे नाव संपूर्ण ठाणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पोहचले आहे असे म्हणायला वावगे ठरू नये.त्यामुळे  ठाणे जिल्ह्यातील महानगर पालिका प्रशासनाने काल्हेर ग्रामपंचायतीचा आदर्श घ्यावा व येणाऱ्या काळात सुधारणा कराव्यात......याच सदिच्छा....

माटलवाडी युवा प्रतिष्ठाण तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप ..माटलवाडी युवा प्रतिष्ठाण कडून दरवर्षीप्रमाणे शैक्षणिक साहित्य वाटप..

माटलवाडी युवा प्रतिष्ठाण तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप ..

माटलवाडी युवा प्रतिष्ठाण कडून दरवर्षीप्रमाणे शैक्षणिक साहित्य वाटप..


मुंबई : किशोर पाटील

माटलवाडी युवा प्रतिष्ठाण च्या वतीने दरवर्षीप्रमाणे गुहागर तालुक्यातील जि.प.आदर्श शाळा कुंडली नंबर ३ माटलवाडी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.आपल्या गावातील ग्रामीण भागातील शालेची शैक्षणिक गुणवत्ता वाढवावी व आपल्या शालेतील विद्यार्थ्यांना भविष्यात येणाऱ्या शैक्षणिक समस्यांना सामोरे जाण्यासाठी शैक्षणिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी आपण आपल्या गावातील शाळांपासून सुरूवात करायला हवी यासाठी माटलवाडी युवा प्रतिष्ठाण गेल्या सात वर्षापासून गणेशोत्सव दरम्यान आपल्या गावी शैक्षणिक साहित्य वाटप करत आहोत असे माटलवाडी युवा प्रतिष्ठाण यांच्याकडून सांगण्यात आले.यावेळी शिवराम थोरसे, गंगाराम माटल, यशवंत बोरसे, नारायण माटल,यशवंत थोरसे, नितीन माटल यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक सुहास गायकवाड, प्रमोधनी गायकवाड आणि माटलवाडी युवा प्रतिष्ठाण चे पदाधिकारी कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.    
        विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रतिवर्षी हातभार लावण्यासाठी हे प्रतिष्ठान घेत असलेले कष्ट पाहून समाधान वाटले. सर्व पदाधिकारी यांचे शाळेतील शिक्षक व विद्यार्थी तसेच शाळा व्यवस्थापन समिती तर्फे मनःपूर्वक आभार शाळेचे मुख्याध्यापक सुहास गायकवाड यांनी व्यक्त केले.

Wednesday, September 15, 2021

उल्हासनगरच्या तीन जीन्स कारखान्यांकडून साडेसात लाखांची वीजचोरीमीटरमध्ये फेरफार; गुन्हे दाखल

उल्हासनगरच्या तीन जीन्स कारखान्यांकडून साडेसात लाखांची वीजचोरी

मीटरमध्ये फेरफार; गुन्हे दाखल


कल्याण(प्रतिनिधी): 15 सप्टेंबर 2021

उल्हासनगर उपविभाग पाच अंतर्गत तीन जीन्स कारखान्यांची लबाडी महावितरणच्या कारवाईत उघडकीस आली आहे. वीज मीटरमध्ये फेरफार करून या कारखान्यांनी साडेसात लाख रुपयांची वीजचोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. महावितरणने दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित जागा मालक व विजेचा चोरटा वापर करणाऱ्यांविरूद्ध अंबरनाथ पोलिस ठाण्यात वीजचोरीचे तीन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. वीज चोरीसाठी मीटरच्या मागच्या बाजूस छिद्र करून वीज मापनाची वायर तोडण्याची सहज लक्षात न येणारी युक्ती या चोरटयांनी वापरली होती. परंतु संबंधित कारखान्यांच्या वीज वापर माहितीच्या विश्लेषणातून (डाटा अनालिसिस) ही चोरी उघडकीस आली.  

जागा मालक अर्जुन रामपाल चौरसिया आणि वीज वापरकर्ता लवकुशकुमार धर्मराज कुशवाह (57/1, ‘शॉप 4 वराक 1968, उल्हासनगर, 05) यांच्या कारखान्यात मीटरशी छेडछाड करून वीज चोरी सुरू असल्याचे आढळले. मीटरची गती 31.56 टक्के कमी करून या कारखान्याने एक लाख 34 हजार 280 रुपयांची 9 हजार 601 युनिट वीज चोरून वापरल्याचे आढळून आले. दुसरे ग्राहक रमेश मोतीराम लालवाणी व त्यांचे प्रतिनिधी हरेश शबल्दास कृष्णानी तसेच वीज वापरकर्ते विजय भिक्कुवाढेल यानी ओटी सेक्शन येथील त्यांच्या कारखान्याच्या मीटरमध्ये फेरफार करून 5 लाख 83 हजार 320 रुपयांची 43 हजार 721 युनिट वीज चोरुन वापरल्याचे निष्पन्न झाले. तर तिसऱ्या प्रकरणात अयुब नवाब खान याने त्याच्या गायकवाड पाडा येथील कारखान्याच्या मीटरशी छेडछाड करून 2 हजार 228 युनिट (31 हजार 350 रुपये) विजेची चोरी केल्याचे आढळून आले. तिन्ही कारखान्यात मीटरच्या संच मांडणीत फेरफार करून विजेच्या वापराची नोंद कमी करून महावितरणचे नुकसान करण्यात आले. सहायक अभियंता रोहिदास बरंडवाल यांच्या फिर्यादीनुसार सर्व संबंधितांवर वीज कायदा- 2003 च्या कलम 135 नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

मुख्य अभियंता श्री. धनंजय औंढेकर, अधीक्षक अभियंता दिलीप भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त कार्यकारी अभियंता विजय यादव, सहायक अभियंता बरंडवाल, कनिष्ठ अभियंता योगेश आटे, प्रधान तंत्रज्ञ निलकंठ राईचुरकर, जनमित्र प्रवीण आघळते, सुरेश गायकवाड, सहायक लेखापाल नीता ईसी, वरिष्ठ लिपिक सचिन माळी यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

थकबाकी, वीजखरेदी खर्च आणि वीजहानी कमी करणे हीच त्रिसुत्री- श्री. विजय सिंघल

थकबाकी, वीजखरेदी खर्च आणि वीजहानी कमी करणे हीच त्रिसुत्री

- श्री. विजय सिंघल 

मुंबई, (प्रतिनिधी)दि. 15 सप्टेंबर 2021:-

 ग्राहकांकडे वीज बिलांपोटी असलेली थकबाकी, वीजखरेदी खर्च आणि वीजहानी याचे प्रमाण कमी करणे हीच आपली त्रिसुत्री आहे, यासाठी आपण सर्वांनी काम करायचे असून आपले सहकार्य अपेक्षित असल्याचे प्रतिपादन महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी आज व्यक्त केले.

 महावितरणच्या प्रकाशगड येथील मुख्यालयात भारतरत्न मोक्षगुंडम विश्वैश्वरैया यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभियंता दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी महावितरणचे संचालक (संचालन) श्री. संजय ताकसांडे, संचालक (प्रकल्प) श्री. भालचंद्र खंडाईत, संचालक (वित्त) श्री. रवींद्र सावंत आणि संचालक (वाणिज्य) श्री. सतिश चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते.

 श्री.विजय सिंघल पुढे म्हणाले की, भारतरत्न मोक्षगुंडम विश्वैश्वरैया यांचे विचार परिघापलीकडील होते, अभियंता देश घडवित असतो, राष्ट्रनिर्मिती करतो. त्याचे विचार इतरांपेक्षा वेगळे असतात, त्यांच्यात वेगळी क्षमता असते. जगात जे कुणी करु शकत नाही, ते अभियंता करु शकतो. अभियंता म्हणून आपल्यात असलेल्या पूर्ण क्षमतेने आपण काम करायला हवे, केवळ दैनंदिन काम नव्हेतर त्याचसोबत काही वेगळे काम करणे म्हणजे अभियंता होय. याशिवाय आपल्याला कामाचे समाधान मिळविता येणार नाही. महावितरण ही माझी स्वत:ची कंपनी आहे, म्हणून सतत कार्यरत रहाण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

 आज महावितरणपुढे अनेक समस्या आहेत. मात्र अजुनही वेळ गेलेली नाही. आपली परिस्थिती सुधारण्यासाठी आपल्याला वेगळ्या पद्धतीने काम करावे लागणार आहे. मागिल वर्षीच्या तुलनेत यावर्षी वसुलीमध्ये चांगली कामगिरी झाली आहे. यात अनेक अडचणी आल्यात आणि काम करणा-या माणसाला अडचणी येणारच हा विचार करुन आपले नेहमीचे कार्य करत रहा. आपल्या सेवांचा दर्जा वाढवायला हवा, ग्राहक राजा आहे, असे समजून स्वत:साठी व कंपनीसाठी आपल्याला काम करायचे आहे, असे आवाहन श्री. विजय सिंघल यांनी केले.या कार्यक्रमाला महावितरणचे सर्व वरिष्ठ अधिकारी व अभियंते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

 


कोंकण विभागाचे सेवानिवृत्त महसूल आयुक्त श्री. शिवाजी दौंड यांचे दु:खद निधन

*कोंकण  विभागाचे सेवानिवृत्त महसूल आयुक्त* 
*श्री. शिवाजी दौंड यांचे दु:खद निधन*
 
नवी मुंबई दि.15 :- कोंकण  विभागाचे सेवानिवृत्त महसूल आयुक्त श्री. शिवाजी दौंड यांचे आज वंजारवाडी ता. तासगाव, जि.सांगली  या त्यांच्या राहत्या घरी हृदय विकाराने  दु:खद निधन झाले.  
श्री.दौंड यांनी सामान्य प्रशासन विभागाचे सचिव आणि विशेष चौकशी अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जालना, सचिव राज्य माहिती आयोग, मत्स्योद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, लघूउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, खादी ग्रामोद्योगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अशा विविध पदावर काम केले होते.  
या शिवाय कोरोना काळात त्यांनी कोकण विभागासाठी विशेष कार्य केले आहे.  मराठा आरक्षणाच्या प्रश्नी शासनाच्या वतीने अहवाल तयार करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.  प्रशासकीय कामात त्यांची चांगली पकड होती.  लोकसंग्रहही अधिक होता. 
          त्यांच्या दु:खद निधनाबद्दल कोंकण भवन येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

ओबीसींचे आरक्षण लागू होत नाही तो पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका - ओबीसी नेते हरिश्चंद्र भोईर

ओबीसींचे आरक्षण लागू होत नाही तो पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका - ओबीसी नेते हरिश्चंद्र भोईर 

भिवंडी दि.१५ ( किशोर पाटील )
ओबीसी राजकीय मुद्दा प्रलंबित असतांना सहा जिल्ह्यात होणा-या निवडणुका पुढे घेण्यासंदर्भात तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.धुळे,नंदुरबार,अकोला,वाशिम, पालघर व नागपूर येथील निवडणूका शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे जाहीर झालेल्या आहेत. जर या आघाडी सरकारने वेळीच इंम्पेरिकल डाटा कोर्टाला दिला असता तर आज ओबीसी बांधवांना निवडणुकीतून हद्दपार व्हायची वेळ आली नसती पण   आघाडी सरकारला ओबीसींचे आरक्षण जाणून बुजून काढून घ्यायचे होते म्हणून त्यांनी कोर्टाला इंम्पेरिकल डाटा दिला नाही त्यामुळे ओबीसींचे आरक्षण संपुष्टात आले म्हणजे या सरकारने मागासवर्गीय आयोग नेमून सुद्धा कुठलीही कारवाई केलेली नाही फक्त आणि फक्त ओबीसी समाजाला आशेवर ठेवून पद्धतशीरपणे निवडणुकीतून बाजूला केले त्यामुळे जो पर्यंत राज्यात ओबीसी आरक्षण लागू होत नाही तो पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेऊ नये अशी मागणी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष हरिश्चंद्र भोईर यांनी तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे.यावेळी भाजपा ठाणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष जितेंद्र डाकी,ओबीसीचे पदाधिकारी बाळाराम कराळे,उपसभापती गजानन आसवारे,पं.स.गटनेते भानुदास पाटील,विष्णु भोईर इतर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

राज ठाकरे यांचा 21 ते 23 सप्टेंबर रोजी नाशिक दौरा तयारीसाठी राजगडावर बैठक

राज ठाकरे यांचा 21 ते 23 सप्टेंबर रोजी नाशिक दौरा तयारीसाठी राजगडावर बैठक
नाशिक प्रतिनिधी / तुषार बऱ्हे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय राज ठाकरे यांच्या आगामी नाशिक दौऱ्याच्या नियोजना करीता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय राजगड येथे संपन्न झाली२१ ते २३ सप्टेंबर दरम्यान राज ठाकरे, युवानेते अमित ठाकरे यांच्यासह मनसेचे सर्व प्रमुख नेते यांचा नियोजित नाशिक दौरा, नूतन शाखा अध्यक्षांच्या नेमणुका, महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांची तयारी आदि विषयांवर या बैठकीत अत्यंत सकारात्मक व खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली. या वेळी बैठकीत शहर अध्यक्ष अंकुश पवार यांन राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्याचे स्वरूप या विषयावर मार्गदर्शन केले. तर जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर यांनी शाखा अध्यक्षांचा नियोजित मेळावा, संपूर्ण शहर भगवामय करण्याचा निर्धार व्यक्त करीत मनपाच्या परवानगीने विविध ठिकाणी फलक लावण्याबाबत सांगितले, प्रदेश उपाध्यक्ष अॅड. रतनकुमार इचम यांनी विभाग अध्यक्षांच्या माध्यमातून दौऱ्याचे नियोजन करण्याच्या सूचना केल्या. प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक यांनी नाशिक महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीस पूर्ण ताकदीने व एकजुटीने लढवण्यासाठी मार्गदर्शन केले.
या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष अॅड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी व दिलीप दातीर, शहराध्यक्ष अंकुश पवार, ज्येष्ठ नगरसेवक सलिम (मामा) शेख, नगरसेवक योगेश शेवरे, विभाग अध्यक्ष नितीन साळवे, सत्यम खंडाळे, विक्रम कदम, भाऊसाहेब निमसे, रामदास दातीर, योगेश लभडे, यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व सर्व अंगीकृत संघटनाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीचे सूत्र संचालन विक्रम कदम यांनी केले. तर आभार प्रदर्शन भाऊसाहेब निमसे यांनी केले.