Sunday, February 14, 2021

गरिबांसाठी रेल्वे सुरू करा ग्राहक संरक्षण फाऊंडेशन भुसावळ यांची मागणी.

गरिबांसाठी रेल्वे सुरू करा ग्राहक संरक्षण फाऊंडेशन भुसावळ यांची मागणी.

प्रतिनिधी / तुषार बऱ्हे.

भुसावळ जिल्हा जळगांव,प्रा, श्री विनोद जी गायकवाड,, दिनांक १५/०२/२०२१ रेल्वे विभागाने श्रीमंतांना खुश करण्यासाठी रेल्वे गाडी चालू केली मात्र गरिबांसाठी गरीब लोकांची गाडी म्हणजे रेल्वे पॅसेंजर अद्याप चालूच केली नाही, गोर गरीब आणि गरजू लोकांना दिलासा देण्यासाठी रेल्वे विभागाने गरिबांचा गरीब रथ अर्थात रेल्वे पॅसेंजर त्वरित चालू करावी,, अशी मागणी ग्राहक संरक्षण फाऊंडेशन चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री विनोद जी गायकवाड सर यांनी केली,, याबाबत अधिक माहिती देताना गायकवाड सर म्हणाले की केंद्र सरकारने रेल्वेची सुविधा कोरोना महामारीच्या काळात रेल्वेने सर्वच गाड्या बंद केल्या होत्या, आणि आता काही दिवसापूर्वी रेल्वे ने श्रीमंतांच्या रेल्वे गाड्या सुरू केल्या मात्र गरिबांसाठी पॅसेंजर गाडी अद्यापही चालू केलेली नाहीच,त्या मुळे भुसावळ हे रेल्वेचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या भुसावळ विभागातून संपूर्ण भारवर्षात गोर गरीबां साठी पॅसेंजर गाड्या धावत असतात, भुसावळ विभागात भरपूर मोठ्या संख्येने मजूर वर्ग वास्तव्यास आहे, मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग इतर भागातून शिक्षणा साठी ये जा करत असतो, श्रीमंत तर आरक्षणावर पैसा खर्च करून प्रवास करू शकतो परंतु गरीब प्रवाशांचे काय, असा प्रश्न ग्राहक संरक्षण चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रा, श्री विनोद गायकवाड यांनी उपस्थित केला, त्यामुळे रेल्वे विभागातील वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देऊनज्या प्रमाणे श्रीमंतांसाठी रेल्वे गाडी चालू केली आहे तशीच गोरगरीब, मजूर,विद्यार्थी, आणि गर्जुंसाठी गरिबांचा रथ म्हणून ओळखली जाणारी पॅसेंजर गाडी लवकरच आपल्या भुसावळ विभागातून चालू करावी, आणि गोर गरिबांचे आशिर्वाद घ्यावे, अशी मागणी ग्राहक संरक्षण मार्फत करतांना प्रा, श्री विनोद गायकवाड बोलत होते, याबाबत लवकरच आमचे एक शिष्ट मंडळ रेल्वे विभागा ला भेटणार आहे असे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...