Monday, August 23, 2021

श्रमजीवीचा संघटनेचा तहसीलदार कार्यालयावर आक्रोश मोर्चा ; महिलांसह शेकडो नागरिक सहभागी

श्रमजीवीचा संघटनेचा तहसीलदार कार्यालयावर आक्रोश मोर्चा ; महिलांसह शेकडो नागरिक सहभागी

भिवंडी (किशोर पाटील)– श्रमजीवी संघटनेच्यावतीने आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज दुपारी भिवंडी तहसीलदार कार्यालयावर आक्रोश मोर्च्याचे आयोजन करण्यात आले.यावेळी संघटनेच्या माध्यमातून तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. पोलिसांकडुन वाहतूकीचे नियोजन न झाल्याने भिवंडी ठाणे महामार्गावर  वाहतूक कोंडी झाली होती.
भिवंडी शहरातील  एस.टी.स्टँड येथून सुरू श्रमजीवी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष दत्तात्रय कोलेकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या मोर्चात हिरामण गुळवी, सागर देसक,मोतीराम नामखुडा, महेंद्र निरगुडा ,आशा भोईर यांसह शेकडोच्या संख्येने स्त्री पुरुष सहभागी झाले होते . आदिवासी बांधव ढोर नाय माणूस हाय माणूस हाय, जमीन आमच्या हक्काची नाय कुणाच्या बापाची अशा गगनभेदी घोषणांनी श्रमजीवी कार्यकर्त्यांनी परिसर दुमदुमून टाकला होता.आदिम व आदिवासी व इतरांना घरकुलांचा लाभ मिळावा ,आदिवासींच्या घराखालील जागा त्यांच्या नावे करावी , रोजगार हमी कायद्या प्रमाणे मागेल त्याला काम मिळावे ,आदिवासी युवकां साठी कौशल्य प्रशिक्षण आयोजित करून त्यांना कौशल्यावर आधारीत रोजगार द्यावा ,आदिम कातकरी समाजाला तात्काळ शिधावाटप पत्रिका द्याव्यात ,शिधावाटप धारकांना पुरेसे धान्य उपलब्ध करून द्यावी ,गावठाण विस्तार करावा,प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेशा वैद्यकीय सुविधा व कर्मचारी उपलब्ध करून घ्याव्यात अशा विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार अधिक पाटील यांना देण्यात आले. या मोर्चा मुळे शहरातील कल्याण नाका ते वंजारपट्टी नाका दरम्यान मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...