Monday, December 21, 2020

उज्वला योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व स्वयंसेवी संस्थांनी अर्ज करावे

उज्वला योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व स्वयंसेवी संस्थांनी अर्ज करावे
पालघर(प्रतिनिधी) दि. 21 :- महाराष्ट्र शासनाने अनैतिक व्यापारास प्रतिबंध करण्यासाठी केंद्र पुरस्कृत उज्वला योजना राज्यात कार्यान्वित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने महिला व बाल विकास क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्व स्वयंसेवी संस्थांना कळविण्यात येते की, उज्वला योजना राबवू इच्छिणाऱ्या व राबवित असलेल्या सर्व संस्थांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह आपले प्रस्ताव संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचेकडे सादर करावे.
उज्वला योजनेकरीता अटी व शर्ती :
1. संस्था नोंदणी अधिनियम 1860 अंतर्गत नोंदणीकृत असावी.
2. संस्थेमध्ये किमान 50 महिलांकरीता सुविधा उपलब्ध असावी.
3. संस्थेस अनैतिक व्यापारास प्रतिबंध करणे या विषयातील किमान 5 वर्ष कामाचा अनुभव असावा.
4. संस्थेची आर्थिक परिस्थिती चांगली असावी. संस्थेचा वार्षिक ताळेबंद किमान 20 लाख रूपये असावा.
5. संस्थेच्या नावे किमान 15 लक्ष इतकी रक्कम बँकेत मुदत ठेव म्हणुन असणे आवश्यक आहे.
6. योजना राबविण्याकरीता इच्छुक संस्था त्याच जिल्ह्यातील असावी. सदर संस्थेचे कायमस्वरूपी मुख्यालय किंवा शाखा कार्यालय त्याच जिल्ह्यात असणे आवश्यक आहे.
7. संस्था निती आयोगाच्या पोर्टलवर नोंदणीकृत असावी. निती आयोगाच्या दर्पण पोर्टलवर नोंदणी नसल्यास संस्थेचे अर्ज ग्राहय धरण्यात येणार नाहीत.
8. संस्थेकडे योजनेच्या निकषानुसार कर्मचारी वर्ग असावा. तसेच योजना राबविण्याचे निकष दिनांक 27/03/2018 मधील शासननिर्णयानुसार असावेत.
9. फक्त प्रतिबंध किंवा सुटका हे घटक राबविणाऱ्या संस्थांना योजने अंतर्गत मान्यता देण्यात येणार नाही.
10. उज्वला योजनेच्या प्रस्तावासोबत द्यावयाच्या कागदपत्रांसाठी (प्रपत्र ब) आपल्या जिल्ह्यातील जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयास संपर्क साधुन कागदपत्रांसाठीची प्रपत्र ब ची यादी प्राप्त करुन घ्यावी व परिपुर्ण प्रस्ताव सात दिवसांच्या आत जिल्हा कार्यालयास सादर करावा.
***********

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...