स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व स्वयंसेवी संस्थांनी अर्ज करावे
पालघर (प्रतिनिधी)दि. 21 :- महाराष्ट्र शासनाने संकटग्रस्त पिडित महिलांना आधार देण्यासाठी व त्यांच्या पुर्नवसनासाठी केंद्र पुरस्कृत स्वाधारगृह योजना राज्यात कार्यान्वित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने महिला व बाल विकास क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्व स्वयंसेवी संस्थांना कळविण्यात येते की, स्वाधार योजना राबवू इच्छिणाऱ्या व राबवित असलेल्या सर्व संस्थांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह आपले प्रस्ताव संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचेकडे सादर करावे.
स्वाधार योजनेकरीता अटी व शर्ती :
1. संस्था संस्था नोंदणी अधिनियम 1860 अंतर्गत नोंदणीकृत असावी.
2. संस्थेस महिला व बाल विकास क्षेत्रातील किमान 5 वर्ष कामाचा अनुभव असावा.
3. संस्थेची आर्थिक परिस्थिती चांगली असावी.
4. संस्थेच्या नावे किमान 15 लक्ष इतकी रक्कम बँकेत मुदत ठेव म्हणुन असणे आवश्यक आहे.
5. योजना राबविण्याकरीता इच्छुक संस्था त्याच जिल्हयातील असावी.
6. संस्था निती आयोगाच्या पोर्टलवर नोंदणीकृत असावी निती आयोगाच्या दर्पण पोर्टलवर नोंदणी नसल्यास संस्थेचे अर्ज ग्राहय धरण्यात येणार नाहीत.
7. संस्थेकडे योजनेच्या निकषानुसार कर्मचारी वर्ग असावा.
8. योजना राबविण्याचे निकष दिनांक 23.3.2018 मधील शासन निर्णयानुसार असावेत.
9. प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वाधारगृहाची क्षमता 30 लाभार्थ्यांकरीता राहील परंतु मोठया शहरामध्ये ती 50 किंवा 100 पर्यंत वाढविता येईल. याबाबतचा अंतिम निर्णय राज्य शासनाचा राहील.
10. स्वाधार योजनेच्या प्रस्तावासोबत द्यावयाच्या कागदपत्रांसाठी (प्रपत्र अ) आपल्या जिल्ह्यातील जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयास संपर्क साधुन कागदपत्रांसाठीची प्रपत्र अ ची यादी प्राप्त करुन घ्यावी व परिपुर्ण प्रस्ताव सात दिवसांच्या आत जिल्हा कार्यालयास सादर करावा.
***********
No comments:
Post a Comment