Tuesday, December 22, 2020

कृषी रेल्वेतून वाहतुकीसाठी द्राक्ष, ॲपल बोर यांना सबसिडी द्यावी : खासदार हेमंत गोडसे यांचे कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांना निवेदन. नाशिक प्रतिनिधी / तुषार बऱ्हे.

कृषी रेल्वेतून वाहतुकीसाठी द्राक्ष, ॲपल बोर यांना सबसिडी द्यावी : खासदार हेमंत गोडसे यांचे कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांना निवेदन.
 नाशिक प्रतिनिधी / तुषार बऱ्हे.

        नाशिक : कृषि उत्पादनात देशात नाशिक अग्रेसर असून येथील शेतमालाला देशभरातील बाजारपेठत सहज पोहचविता यावे यासाठी केंद्र शासनाच्यावतीने ७ ऑगस्ट रोजी देवळाली रेल्वे स्थानकातून देवळाली ते दानापूर हि विशेष कृषि रेल्वे सुरु करण्यात आली आहे. या रेल्वेगाडीमुळे नाशिकसह परिसरातील कृषि उत्पादनांना अवघ्या काही तासात कुठल्याही बाजारपेठेत पोहचविणे सहज शक्य झाले आहे. द्राक्ष उत्पादनात नाशिक देशभरात प्रसिद्ध आहे. मात्र कृषी रेल्वेतून वाहतुकीसाठी द्राक्ष, ॲपलबोर तसेच काही भाजीपाल्याला पन्नास टक्के सबसिडीतून वगळण्यात आलेले असून या पिकांचा रेल्वे वाहतुकीच्या पन्नास टक्के सबसिडीमध्ये तातडीने समावेश करावा, अशी आग्रही मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्रीय कृषी तथा अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्याकडे केली आहे.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...