*महाराष्ट्र सरकारशी आधीच चर्चा झालेली असताना ऐनवेळी रेल्वेकडून नकारघंटा कशासाठी*
पालघर (रवि राठोड)२० ऑक्टोबर:
पश्चिम रेल्वेची उपनगरी लोकल सेवा , मध्य रेल्वे हरबर व उपनगरी रेल्वेचे रुट ह्या भागातील महिलांना नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून लोकल प्रवास करण्यास महाराष्ट्र सरकारने परवानगी दिली असताना रेल्वेकडून मात्र आता वेळकाढूपणा केला जात आहे. राज्य सरकार, व रेल्वे अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय आधीच झाला होता, असे असताना स्वतःच्या अधिकारात निर्णय घेता येत असतानाही जाणिवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे. १७ तारखेपासून हा प्रवास महिलांना करता येणार होता व त्याच दिवसापासून नवरात्र सुरू होणार हे माहित असताना रेल्वेबोर्डाची परवानगी आधीच का घेतली नाही? याचे उत्तर रेल्वे आधीकाऱ्यानी यांनी महिलांना दिले पाहिजे अशी मागणी शिवसेना पालघर सहसम न्वयक केदार काळे ह्यानी मेल द्वारा व पत्राद्वारे रेल्वे मंत्री व पश्चिम रेल्वे जनरल मॅनेजर ह्यांच्या कडे केली आहे . केली आहे.
महिलांच्या लोकल प्रवासासंदर्भात आधीच बैठक घेऊन त्यावर सविस्तर चर्चा होऊन वेळही निश्चित करण्यात आली होती. राज्य सरकारने रेल्वेला महिलांना प्रवासाची मुभा द्या असे कळवले. पण आता रेल्वे विभाग हा रेल्वे बोर्डाची परवानगी लागेल अशी कारणे देऊन वेळकाढूपणा का करत आहे. चर्चा झाल्याप्रमाणे रेल्वे बोर्डाची परवानगी का घेतली गेली नाही. तसेच हा निर्णय आधीच घेतला गेला असल्याने रेल्वेचे सीटीपीएम स्वतःच्या अधिकारात हा निर्णय घेऊ शकतात.
रेल्वेमंत्री हे मुंबईचे आहेत, त्यांनाही मुंबईतील लोकल प्रश्नासंदर्भात लक्ष द्यावे अशी विनंती केदार काळे ह्यानी आपल्या पत्रात केली आहे .
No comments:
Post a Comment