पालघर शहरातील सर्व रस्ते लवकर दुरुस्त करावे ह्यासाठी रिपाई (आ) तर्फे PWD अभियंता ह्यांना दिले निवेदन.
पालघर (प्रतिनिधी) मुसळधार पाउसमुळे पालघर शहरातील सर्व रस्ते खराब झाले आहेत.त्यामुळे दररोज खड्यामुळे अपघात होत असतात.ही बाब लक्षात घेऊन .पालघर शहरातील सर्व रस्ते लवकरात लवकर बनून देण्यात यावे या साठी आज दिनांक ०६/०९/२०२१ रोजी मा.कनिष्ठ अभियंता PWD पालघर यांना वरील निवेदन देऊन पालघरला जोडणाऱ्या सर्व मुख्य रस्त्यांची डागडुजी किवा रस्ते नवीन बनविण्याचे निवेदन देण्यात आले त्या समयी रिपाई (आ) चे जिल्हाध्यक्ष आयु.सुरेश जाधव , उपाध्यक्ष कुंदन मोरे , पालघर शहर उपाध्यक्ष राम ठाकूर , सूरज भोईर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment