पालघर (प्रतिनिधी)आज शुक्रवार दिनांक 12 फेब्रुवारी 21रोजी पालघर नगर परिषदेतर्फे माझी वसुंधरा अभियान अंतर्गत हवेच्या गुणवत्ता सुधारणेसाठी सायकल रॅली चे आयोजन केले होते
शंभरपेक्षा जास्त तरुणाने तरुणींनी लहान मुलांनी व नागरिकांनी त्यात उत्स्फूर्तपणे भाग घेतला.
पालघरच्या नगराध्यक्षा डॉक्टर सौ उज्वला केदार काळे यांनी भाग घेणाऱ्या स्पर्धकांन कडून प्रथम वसुंधरेची म्हणजेच पृथ्वीला प्रदूषण विरहित ठेवण्यासाठी शप्पथ म्हणून घेतली. त्यानंतर सायकल रॅली संपूर्ण पालघर शहरात फिरली त्यावेळेस उपनगराध्यक्ष उत्तम घरत आरोग्य सभापती अमोल पाटील भारतीय जनता पार्टीचे गटनेते भावानंद संखे महीला बालकल्याण सभापती सौ राधा पामाळे ,नगरसेवक चंद्रशेखर वडे .
नगरसेवक राजेंद्र पाटील नगरसेविका अनुजा तरे हिंदवी पाटील ,सौ रोहिणी अंबुरे
प्रियांका म्हात्रे ,शिल्पा बाजपेयी नगरसेवक अक्षय संखे ही मंडळी उपस्थित होती .भारत सायकने रॅलीतील सदस्याना टिशर्ट प्रायोजित केली होती .
माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पालघर नगर परिषदेने याआधीही विविध कार्यक्रम आयोजित केले होते उदाहरणार्थ लोकजागृती साठी प्रभात फेरी ,प्लॅस्टिक बंदीसाठी पथनाट्य तसेच प्लास्टिक गोळा करण्यासाठी संकलनकेंद्र ,विद्यार्थ्यांची ऑनलाईन निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या . वृक्ष लागवड कार्यक्रमाचे आयोजन केले .
स्वच्छ व सुंदर पालघर साठी पालघर नगरपरिषद मोठ्या प्रमाणात माझी वसुंधरा अभियान राबवत आहे.
No comments:
Post a Comment