Tuesday, November 10, 2020

अतिवृष्टी व पूरामूळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत वाटप

*अतिवृष्टी व पूरामूळे  बाधित झालेल्या  शेतकऱ्यांना तातडीने मदत वाटप*
       पालघर (प्रतिनिधी)जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ                                     पालघर दि.10:-माहे  जून ते ऑक्टोंबर  2020 या कालावधीत  अतिवृष्टी व पुरामूळे  पालघर जिल्हयातील बाधित झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत वाटप करणार असल्याचे.   जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ      यांनी सांगितले.                                         जिल्ह्यातील  62798 शेतकऱ्यांचे  25580.66 हेक्टर  क्षेत्राच्या  शेतीपिकांच्या  नुकसान झाले आहे. आपद्ग्रस्तांना शेतपीकांसाठी (जिरायत व आश्वासित सिंचनाखालील पिके) यापुवीच्या शासन  निर्णयानुसार  रु 6800/- प्रति  हेक्टरी  इतकी  तरतूद होती. त्यामध्ये  रु 3200/- प्रति हेक्टरी  वाढ  करुन  एकूण रु 10000/-प्रति हेक्टरी  दि. 9/11/2020  रेजीच्या  शासन निर्णयान्वये  मदत जाहिर केली आहे.
तसेच बहूवार्षिक  पिकांसाठी  यापुर्वीच्या  शासन निर्णयानुसार  रु 18000/- प्रति हेक्टरी  इतकी तरतूद  होती. त्यामघ्ये  रु 7000/- प्रति हेक्टरी  वाढ करुन एकूण  रु 25000/-प्रति हेक्टरी  दि 9 /11/2020 रोजीच्या  शासन निर्णयान्वये मदत जाहिर केली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ       यांनी सांगितले.                             
           निधी नुसार   रक्कम  रुपये 7,54,43000, (अक्षरी   सात कोटी चौपन्न लाख  त्रेचाळीस हजार )   रुपये  मात्र इतके  अनुदान शासन  महसूल  व  वनविभाग ( मदत व पुनवर्सन आ व्य.. प्रभाग)यांचेकडून प्राप्त. झाले आहे. सदरच्या  अतिवृष्टी व पूरामूळे  बाधित झालेल्या  शेतकऱ्यांना तातडीने मदत वाटप  करणे बाबत  जिल्हयातील  सर्व तहसिलदार यांना  आदेश   देण्यात आले आहे  असल्याचे जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसाळ यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...