Wednesday, September 29, 2021

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*


          पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पहिल्या सोमवारी 1.00 वाजता घेण्यात येतो. माहे ऑक्टोबर महिन्यातील लोकशाही दिन हा दि. 04 ऑक्टोबर, 2021 रोजी दुपारी 1.00 वाजता घेण्यात येणार होता. परंतु मा. न्यायालयीन निर्णयानुसार पालघर जिल्हा परिषदेमधील 15 निवडणुक विभाग व पंचायत समित्यांमधील 14 निर्वाचक गणातील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणूकीचा कार्यक्रम दि.13 सप्टेंबर, 2021 रोजीच्या प्रसिध्दी पत्रकान्वये घोषित केला असून दि. 13 सप्टेंबर, 2021 पासून ते दि. 08 ऑक्टोंबर, 2021 पर्यंत जिल्ह्यात आचार संहिता लागू झाल्याने, जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात येणार नाही.
तसेच पुढील लोकशाही दिन नेहमी प्रमाणे महिन्याच्या पहिल्या सोमवारी घेण्यात येईल. कृपया यांची नोंद घ्यावी. असे निवासी उपजिल्हाधिकारी, पालघर डॉ. किरण महाजन यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
*

Tuesday, September 28, 2021

आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन. अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांनी जपली सामाजिक बाधिलकी!

आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन. अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांनी जपली सामाजिक बाधिलकी! 
कल्याण-दी.२८(किशोर पाटील) 
आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन यांच्या  विद्यमाने  फाउंडेशनचे अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यानी गेल्या अनेक वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपरयात आरोग्य शिबीराचे मोफत आयोजन करुन गरीब गरजु सह सर्व सामान्य लोकांना मदतीचा हात पुढेे  करून  आपन सामाज्याचे काही तरी देने लागतो हा विचार मनी धरून सामाज्या प्रति आपली भावना सामाजिक बाधिलकी च्या रुपाने करत आहेत,सदर शिबिराचे आयोजन आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन.अनंता सुधा भवन. शॉप नंबर 3. न्यू स्टार सिटी हॉस्पिटल खाली. चक्की नाका. कल्याण ( पूर्व ) येथून केले जाते. त्यामुले प्रत्येक शिबिरातून २०/२५ नागरिकांना (रुग्णांना) मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी तेरणा हॉस्पिटल  याठिकाणी  पाठवण्यात येते. आजही झालेल्या शिबिरात २५ रुग्णांना तेरणा हॉस्पिटल नवी मुंबई येथे पाठवण्यात आले. त्यामधे खलील आजारांवर मोफत शस्त्रक्रिया केल्या जातात. 
1) हृदयाची शस्त्रक्रिया.2) अन्ननलिका शस्त्रक्रिया 3) हाडांचे फॅक्चर शस्त्रक्रिया 4) कॅन्सर शस्त्रक्रिया  5) कान.नाक व घसा शस्त्रक्रिया  6) हर्निया  7) स्वशननलिकेच्या संबंधित शस्त्रक्रिया  8) पुरुष ग्रंथी  वाढणे मूत्राशयाच्या मार्ग संकुचित होणे 9) मणक्याची शस्त्रक्रिया  10) यकृत्याचे आजार / शस्त्रक्रिया 11) सांध्याच्या शस्त्रक्रिया  12) अपेन्डिस  13) डोळ्यातील सफेद पडद्याची शस्त्रक्रिया  14) मुतखडा शस्त्रक्रिया  15) जीभेच्या शस्त्रक्रिया  16) किडनीचे आजार  17) गर्भपिशवी दुरुस्ती  18) पित्ताशय किंवा पित्ताशयातील खडे शस्त्रक्रिया यांचा समावेश आहे. या सर्व रुग्णांना घेऊन जाण्यासाठी गाडीची व्यवस्था आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांच्याच कडून मोफत केली जाते.

गुलाब चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अतिमुसळधार पावसाची शक्यता

*गुलाब चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अतिमुसळधार पावसाची शक्यता* 

 
*नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ  यांचे आवाहन*

पालघर (प्रतिनिधी)दि. २८  : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या सुचनेनुसार बंगालच्या समुद्रात वादळ (गुलाब चक्रीवादळ)  निर्माण झाल्याने दिनांक १ ऑक्टोबर २०२१ पर्यत  कोकण किनापट्टीलगतच्या जिल्हयातील समुद्र किनाऱ्यावर अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने  जिल्ह्यातील नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ  यांनी केले आहे.

याकाळात झाडे पडणे, पत्रे उडून जाणे, पाणी साचणे, विजेचे खांब कोसळणे, पुरात वाहून जाणे, विज पडून मृत्यु, जनावरे वीज पडून, पाण्यात बुडन मयत होणे,  अशा घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये. तसेच संबंधित गावातील तलाठी यांना घडलेल्या घटनेचा वृतांत तात्काळ कळविणे, व तालूका नियंत्रण कक्षात फोन करणे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात 8237978873 या क्रमांकावर संपर्क साधण्याच्या सुचना जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ यांनी केल्या.

नवीन महाविद्यालय, अभ्यासक्रम सुरु करण्यासाठीचे वेळापत्रक एक महिना पुढे ढकलण्याचा निर्णय



*नवीन महाविद्यालय, अभ्यासक्रम सुरु करण्यासाठीचे वेळापत्रक एक महिना पुढे ढकलण्याचा निर्णय* 


मुबई(प्रतिनिधी)नवीन महाविद्यालय तसेच अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी निश्चित केलेले वेळापत्रक कोविडमुळे एक महिना पुढे ढकलण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. 
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील कलम 109 मध्ये नवीन महाविद्यालय, परिसंस्था सुरु करणे तसेच नवीन अभ्यासक्रम, विषय, विद्याशाखा, अतिरिक्त तुकड्या किंवा सॅटेलाईट केंद्र सुरु करण्यासाठी परवानगी देण्याची पद्धत निश्चित केली आहे.  कोविडमुळे वर्ष 2021-22 मध्ये विहित वेळेत कार्यवाही होऊ न शकल्याने हे वेळापत्रक एक महिन्याने पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.  या संदर्भात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील कलम 109 मध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढण्यात येईल.
-----०-----

Monday, September 27, 2021

अंबरनाथमध्ये हॉटेल चालकाकडून दुसऱ्यांदा वीजचोरी; गुन्हा दाखल

अंबरनाथमध्ये हॉटेल चालकाकडून दुसऱ्यांदा वीजचोरी; गुन्हा दाखल

कल्याण(प्रतिनिधी): दि. 27 सप्टेंबर 2021

महावितरणच्या पथकाने अंबरनाथ पश्चिमेतील नेताजी मार्केट परिसरातील नवाब हॉटेलमध्ये रिमोटच्या साह्याने सुरु असलेली वीजचोरी उघडकीस आणली आहे. विशेष म्हणजे वीजचोरी प्रकरणी या हॉटेलविरुद्ध 2017 मध्ये कारवाई करून चोरीच्या विजेचे 2 लाख 95 हजार 720 रुपयांचे वीजबिल व 55 हजार रुपयांचा दंड वसूल केला होता. आता नुकत्याच केलेल्या कारवाईत 25 हजार 350 रुपयांची 1202 युनिट वीज चोरून वापरल्या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.  

नवाब हॉटेलचा सध्याचा वीज वापरकर्ता अब्दुल शब्बीर बद्रुद्दीन व हॉटेलचा मालक सलीम शेख अशी याप्रकरणी वीज कायदा-2003 च्या कलम 135 व 138 नुसार गुन्हा दाखल झालेल्या आरोपीची नावे आहेत. हॉटेलच्या मीटरची तपासणी केली असता मीटरला तडा गेल्याचे निदर्शनास आले. संशयित मीटर जप्त करून तपासणी केली असता मीटरमध्ये रिमोट कंट्रोल सर्किट बसवल्याने आढळून आले. आरोपींकडून वीज चोरीसाठी वापरण्यात आलेला रिमोट कंट्रोलही जप्त करण्यात आला आहे. नोव्हेंबर 2017 मध्ये नवाब हॉटेलविरुद्ध वीजचोरीची कारवाई करून त्याच महिन्यात साडेतीन लाख रुपये वसूल करण्यात आले होते. महावितरणकडून ग्राहकांच्या वीज वापरावर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून उपलब्ध माहितीच्या आधारे वीज चोरांवर कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई नियमितपणे सुरू राहणार असून कोणतीही युक्ती वापरून विजेचा अनधिकृत वापर करू नये, असे आवाहन मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी कल्याण परिमंडलातील ग्राहकांना केले आहे. सहायक अभियंता मनीषा मुऱ्हे, प्रकाश हरद, तंत्रज्ञ अजित पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

सफाळे पोलीस ठाणे,जि. प. / पंचायत समिती पोट निवडणुकी साठी सज्ज.

सफाळे पोलीस ठाणे,
जि. प. / पंचायत समिती  पोट निवडणुकी साठी सज्ज. 

  सफाळे ( हिरालाल लोखंडे) पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी पोट निवडणूकीच्या अनुषंगाने सफाळे पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी श्री संदिप कहाळे सहा. पोलिस निरीक्षक यांनी दिनांक २५ सप्टेंबर २०२१ रोजी तांदुळवाडी, लालठाणे, खडकोली आदी भागातील राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, मतदार, सामाज सेवक, यांची संयुक्त रित्या ग्रामपंचायत कार्यालय तांदुळवाडी ता,जि पालघर .येथे पोट निवडणूक संदर्भात मिटींग घेतलेली. 
     सदर मिटींगमध्ये उपस्थित ग्रामस्थ, सर्वपक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी, स्थानिक ग्रामपंचायत मधील पदाधिकारी यांना मार्गदर्शन करताना, सदर निवडणुक दरम्यान " करोना " विषाणूंचा प्रादुर्भाव, संसर्ग, व संक्रमण होणार नाही. या करीता उपाययोजना करून स्वतःची काळजी घेण्यासंदर्भात, मार्गदर्शन व सुचना केल्या. मतदान व मतदाता  या संदर्भातील प्रश्न, अडीअडचणी ऐकून घेऊन, समस्यांचे निराकरण, समाधान करीत. निवडणूक आयोगाने लागू केलेल्या " आचार संहितेचे " पालन करण्यासाठी सर्वाना सुचना देत, निवडणूकीच्या अनुषंगाने मार्गदर्शन करीत, कायदा आणी सुव्यवस्था राखत आगामी निवडणूक शांततेत, निर्भिडपणे पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले. या वेळी  श्री सुजित पाटील - पोलीस पाटील तांदुळवाडी, श्री संदेश पाटील - पोलीस पाटील लालठाणे, श्री शदर सातवी - पोलीस पाटील खडकोली, श्री कैलास शेळके पो, नाईक, श्री राजेंद्र घुगे काॅन्सटेबल सफाळे पोलीस ठाणे आदि उपस्थित होते

दयानंद चोरघे यांच्या आदेशानुसार भिवंडी युवक कांग्रेस च्या वतीने रांजनोली रिलायन्स पेट्रोल पंम्प जवळआंदोलन!

दयानंद चोरघे यांच्या आदेशानुसार भिवंडी युवक कांग्रेस च्या वतीने रांजनोली रिलायन्स पेट्रोल पंम्प जवळ
आंदोलन! 
भिवंडी - किशोर पाटील
भारतीय किसान संघटनेने पुकारलेल्या भारत बंदच्या आंदोलनास *भिवंडी ग्रामीण काँग्रेस ने जिल्हा अध्यक्ष ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष श्री. दयानंद मोतीराम चोरघे यांच्या आदेशानुसार* भिवंडी येथील रांजनोली रिलायन्स पेट्रोल पंम्प समोर *युवक काँग्रेसचे पदाधिकारी व भिवंडी ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष निलेश भोईर  यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले गेले* यांच्या समवेत प्रमुख उपस्थिती म्हणुन सरचिटणीस ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस पंकज अशोक गायकवाड हे सुद्धा उपस्थित होते. भारतातील शेतकर्यांना न्याय मिळण्यासाठी धरणे आंदोलन केले.तसेच *भिवंडी ग्रामीण मध्ये संयुक्त किसान संघटना यांच्या सर्व पक्षीय आंदोलनाला पाठिंबा सुध्दा दिला.* या आंदोलनामध्ये मुफ्फसिल पटेल, ज्ञानेश्वर(बाला)हुकमाळी, सुधाकर इताडकर, संजय गायकवाड,प्रभाकर शेळके, राजेश जाधव,रोहन जाधव, प्रशांत जाधव,अतिश भोईर,रोशन  थोरात आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

लायन्स क्लब ऑफ ठाणे प्राईड* *यांच्या वतीने किशोर वयीन मुलींसाठी सॅनिटरी पॅड मशीन वितरण समारंभ

*लायन्स क्लब ऑफ ठाणे प्राईड* 
*यांच्या वतीने किशोर वयीन मुलींसाठी सॅनिटरी पॅड मशीन वितरण समारंभ
भिवंडी दी.२७(किशोर पाटील)पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भिवंडी विद्यालयाच्या स्व.सौ.पुष्पलता जाधव सभागृहात *लायन्स क्लब ऑफ ठाणे प्राईड*  यांच्या वतीने किशोर वयीन मुलींसाठी सॅनिटरी पॅड मशीन वितरण समारंभांचे आयोजन करण्यात आले होते.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्था उपाध्यक्षा व विद्यालयाच्या माजी प्राचार्या *श्रीमती अरुणा प्रकाश जाधव मॅडम* उपस्थित होत्या. यावेळी लायन्स क्लब ठाणे प्राईड यांचे वतीने  *प्रेसिडेंट ऑफ लायन्स क्लब ठाणे प्राईड – लायन्स देवरतन डागा व्हाईस प्रेसिडेंट लायन्स क्लब ठाणे प्राईड – लायन्स स्वाती माधुरवार लायन्स क्लब सचिव – लायन्स अविनाश जाधव लायन्स सल्लागार – लायन्स तेजंद्रजी सिंग  डिस्ट्रिक्ट गव्हर्नर - लायन्स लोनकरन टावरी*
*1st व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर –लायन्स मुकेश तनेजा*
*2nd व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर – लायन्स ए.के. शर्मा डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन ( ग्लोबल सर्विस टीम) – लायन्स मनीष लाडगे रिजन को-ऑरडीनेटर* *(रिजन-6 ) -लायन्स सीमा लाडगे*  हे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक *विद्यालयाचे प्राचार्य श्री.जी.ओ. माळी सर* यांनी केले.आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी विद्यालय व संस्था संचालित शाळा व महाविद्यालयातून सुमारे ३० हजार पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यात ५०℅ विद्यार्थ्यांनीची संख्या आहे. *लायन्स क्लब ऑफ ठाणे प्राईड किशोरवयीन मुलींसाठी राबवित असलेला उपक्रम अतिशय स्तुत्य असून* यामुळे आमच्या विद्यालयात वेगवेगळ्या समाज स्तरातून येऊन शिक्षण घेत असलेल्या किशोरवयीन मुलींना या सुविधांचा लाभ होईल.विद्यालयात शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या सोयी सुविधांसाठी मोठया प्रमाणात आर्थिक मदतीचा हात पुढे केल्यामुळे आज भिवंडी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी विद्यालयाची तीन मजली टोलेजंग इमारत उभी असून ४ था मजला बांधण्याचे काम प्रस्तावित आहे.समाजातील आपल्या सारख्या दानशूर संस्थाची आम्हाला याकामी सहकार्याची अपेक्षा असून आपल्या कडून आम्हाला निश्चितच सहकार्य मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करत आपल्या प्रस्ताविकाचा समारोप केला. 
   लायन्स क्लब ऑफ  ठाणे संस्थेच्या आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी संस्था उपाध्यक्षा श्रीमती अरुणा जाधव मॅडम यांचे सोबत संपूर्ण शाळेची पाहणी केली व विद्यालय विद्यार्थ्यांसाठी राबववीत असलेल्या विविध उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले. तसेच लायन्स क्लब ह्या संस्थेच्या वतीने समाजासाठी राबवीत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. 
समारंभ अध्यक्षा *श्रीमती अरुणा जाधव मॅडम* यांनी लायन्स क्लब ऑफ ठाणे प्राईड यांनी विद्यालयातील  किशोर वयीन मुलींसाठी  3 सॅनिटरी पॅड मशीन उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले.यापुढेही संस्थेला मदतीचे सहकार्य करण्याचे आवाहन उपस्थित पदाधिकाऱ्याना केले.
कार्यक्रमाचे *सूत्रसंचालन कासकर मॅडम यांनी केले व उपस्थित पाहुण्यांचे आभार सौ.नीलिमा जाधव मॅडम* यांनी मानले.

वृत्तपत्र वाटप करणार्‍या युवकाची गगन भरारी!प्रा.डॉ.नरेश बोडखे यांची कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया आर्थिक विभागाच्या संचालकपदी निवड

वृत्तपत्र वाटप करणार्‍या युवकाची गगन भरारी!
प्रा.डॉ.नरेश बोडखे यांची कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया आर्थिक विभागाच्या संचालकपदी निवड
अकोले :-किशोर पाटील
महाविद्यालयीन जिवनात घरोघरी वृत्तपत्र वाटप करणारा मुलगा अपारक जिद्द आणि शिक्षणाच्या बळावर थेट केंद्र सरकारच्या कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाच्या आर्थिक विभाग संचालक पदावर पोहचतो, हे स्वप्न कि एखाद्या चित्रपटाची कहानी वाटत असली तरी ही वस्तुस्थिती असून मातृतीर्थ सिंदखेड राजा तालुक्यातील कुंबेफळ (बीबी) येथील रहिवासी असलेले प्रा. नरेश बोडखे यांनी ही किमया साकारली आहे.
पुण्यातील गोखले इन्स्टिट्युट मधील सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना त्यांची निवड झाली.
कुंबेफळ (बिबी) या गावापासून डॉ. नरेश बोडखे यांचा प्रवास सुरू झाला. आई - वडील शेतकरी, पावसावर आधारीत बेभरवशाची शेती असल्याने घरची परिस्थिती बेताची त्यामुळे प्रगतीसाठी शिक्षण हेच एकमेव साधन ही बाब त्यांनी हेरली. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बिबी येथील वसंतराव नाईक विद्यालयात झाले. त्यानंतर घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने शिक्षण अर्ध्यावर थांबू नये म्हणून महाविद्यालयीन जीवनात हॉटेल मध्ये काम करून आणि घरोघरी वृत्तपत्र वितरणाचे काम करुन डॉ. नरेश बोडखे यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. इंग्रजी साहित्यात जालन्यातील बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयात त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले आणि पदवीमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
पदवीनंतर पुणे विद्यापिठातून अर्थशास्त्र विषयात इंग्रजी माध्यमातून पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर पहिल्याच प्रयत्नात ते सेट-नेट  उत्तीर्ण झाले आणि वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी मुंबई मधील चेतना महाविद्यायात अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले. त्यानंतर त्यांची भारतातील अर्थशास्त्राचे पाहिले व नामांकित विद्यापीठ असलेल्या पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट मध्ये प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. येथे नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी जालना जिल्ह्याचे 20 वर्षांसाठीचे व्हिजन डॉक्युमेंट बनवले. केळकर समितीमध्ये आणि पंधराव्या वित्त आयोगामध्ये देखील त्यांनी उल्लेखनीय काम केले. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्प निर्मिती मध्येही त्यांनी काही काळ सहभाग नोंदवला आहे. इथेच त्यांनी पीएचडी पूर्ण केली. याबरोबरच अनेक प्रकल्पांवर संशोधन करतानाच विद्यार्थी घडविण्याचं बहुमुल्य कार्य देखील सुरू ठेवले. दरम्यान त्यांची आता केंद्र सरकारच्या कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाच्या अर्थशास्त्र विभागाच्या संचालकपदी निवड झाली आहे.
त्यामुळे मातृतीर्थ सिंदखेड राजाचे सुपुत्र आता देश पातळीवर काम करणार आहे. हॉटेलमध्ये काम करणारा, घरोघरी वृत्तपत्र वाटणारा मुलगा एवढ्या उच्च पातळीवर केवळ जिद्द आणि शिक्षणामुळेच पोहचू शकतो त्यामुळे ग्रामीण युवकांची शिक्षणाची कास धरावी, असे आवाहन ते नेहमी करतात आणि त्यासाठी युवकांना नेहमी प्रोत्साहीत देखील करत राहतात, त्यांच्या या नियुक्तीने मातृतीर्थ तालुक्याची मान उंचावली आहे........

कृषी कायद्या विरोधात शेतक-यांच्या भारत बंदलाठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्षदयानंद चोरघे यांचा जाहीर पाठिंबा!

कृषी कायद्या विरोधात शेतक-यांच्या भारत बंदला
ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष
दयानंद चोरघे यांचा जाहीर पाठिंबा! 
शाहपुर दि,२७(किशोर पाटील) सोमवार दि‌नांक २७ सप्टेंबर २०२१ रोजी केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्या विरोधात शेतक-यांच्या भारत बंद ला पाठिंबा देत ठाणे ग्रामीण काँग्रेस जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने जिल्हाभर आंदोलन केले.हे कायदे शेतकरी हिताचे नसून मूठभर धन दांडगे,उद्योगपती यांच्या फायद्याचे असुन यातून शेतकरी व ग्राहक दोघांचेही नुकसानच होणार आहे.त्यामुळे या कायद्या विरोधात शेतक-यांमध्ये तीव्र आक्रोश निर्माण झाले आहेत.शेतक-यांनी उभारलेल्या या आंदोलनाला काँग्रेसने जाहीर पाठिंबा देत ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे  शहापुर येथे आंदोलनात सहभागी होऊन केंद्र सरकारच्या कृषी कायद्याचा विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी निषेध व्यक्त केला.यावेळी राष्ट्रवादी आमदार दौलत दरोडा,शहापुर काँग्रेस तालुका अध्यक्ष महेश धानके,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष नंदकुमार मोगरे, बहुजन विकास आघाडी योगेश हजारे तसेच प्रहार संघटना व सर्व पक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Saturday, September 25, 2021

इंटरनॅशनल आयडॉल अॅवॉर्ड २०२१.

इंटरनॅशनल आयडॉल अॅवॉर्ड २०२१.


      पालघर (प्रतिनिधी)    पालघर जिल्ह्यातील डाॅ. स्मिता सुधिर माळवदे यांना समाजसेविका म्हणून सन्मानित करण्यात आले.
            सामाजिक क्षेत्रात एका वेगळ्या उंचीवर काम करत असताना आपल्या आजूबाजूला उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरविण्याचे कार्य निर्वाण फाऊंडेशन आयोजित नाशिक येथे " इंटरनॅशनल आयडॉल अॅवॉर्ड २०२१" च्या पहिल्या सीजनचा दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
               या कार्यक्रमात आपल्या पालघर जिल्ह्यातील सेवा आश्रम विद्यालय बोईसर येथील शिक्षिका डॉ. स्मिता सुधिर माळवदे यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना समाजसेविका म्हणून सन्मानित करण्यात आले.
             या पुरस्कार वितरण सोहळ्याचे अध्यक्षस्थानी निर्वाण फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. निलेश आंबेडकर हे होते. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मिसेस इंडिया इंटरनॅशनल शिल्पा अवस्थी, आफ्रिकन स्काॅलर मा. संनासी बायडोन, नाशिक जिल्हा क्षयरोग तज्ञ डॉ. देशमुख, सामाजिक कार्यकर्त्या आरती हिरे, संस्थेच्या ट्रस्टी विमलताई बोढारे यांचे हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
               या कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना " इंटरनॅशनल आयडॉल अॅवॉर्ड २०२१" या पुरस्काराने गौरविण्यात आले. ब्लॅक लेडी ट्राॅफी, सन्मानपत्र, गोल्डन मेडल असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
              कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निर्वाण फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

वाशी, नवी मुंबई येथील ‘मान्यवर’ शो रुम बाहेर हिंदुत्वनिष्ठ संघटनांची निदर्शने !

दिनांक : 25.09.2021

 _*वाशी, नवी मुंबई येथील ‘मान्यवर’ शो रुम बाहेर हिंदुत्वनिष्ठ संघटनांची निदर्शने !*_ 
नवी मुंबई- किशोर पाटिल
 *‘मान्यवर’ ब्रँडने हिंदूंची क्षमा मागून ‘कन्यादाना’ विषयी आक्षेपार्ह जाहिरात मागे घ्या -* हिंदुत्वनिष्ठ संघटनांची चेतावनी

   ‘वेदांत फॅशन्स लिमिटेड’ या कंपनीच्या ‘मान्यवर’ या कपड्यांच्या ब्रँडने हिंदूंच्या विवाह संस्कारातील ‘कन्यादान’ नको, तर ‘कन्यामान’ म्हणा’, असा धार्मिक कृतींविषयी अपप्रचार करणारी जाहिरात अत्यंत आक्षेपार्ह आणि हिंदूंच्या धार्मिक   या जाहिरातीमुळे व्यापक आणि उच्च मूल्य जोपासणार्‍या धार्मिक विधीविषयी लोकांमध्ये जाणीवपूर्वक गैरसमज पसरवण्यात आला आहे. हिंदुत्ववादी संघटना या जाहिरातीचा निषेध करण्यासाठी आम्ही निदर्शने केली आहेत. वेदांत फॅशन्स लि. कंपनीने हिंदूंची बिनशर्त क्षमा मागून ‘मान्यवर’ ब्रँडची ही जाहिरात त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते डॉ. उदय धुरी यांनी या वेळी केली. विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आज वाशी, नवी मुंबई येथील ‘मान्यवर’ शो रूम समोर निदर्शने केली, त्या वेळी ते बोलत होते.

  या वेळी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींसह हिंदू धर्मप्रेमींंनी हातात निषेध फलक धरून लोकांमध्ये जागृती केली. ही जाहिरात मागे घेऊन जोपर्यंत क्षमा मागत नाही, तोपर्यंत हिंंदु समाजाने ‘मान्यवर’ ब्रँडवर बहिष्कार घालावा, असे आवाहनही या वेळी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केले.
 
  ‘मान्यवर’ने प्रसारीत केलेल्या जाहिरातीतून हिंदूंना जाणीवपूर्वक लक्ष्य केले असून ‘कन्यादान’ कसे चुकीचे आहे, प्रतिगामी आहे, तसेच ‘दान करायला कन्या वस्तू आहे का ?’, असे संभ्रम निर्माण करणारे प्रश्‍न उपस्थित करण्यात आले आहेत. ‘कन्यादान’ नको, तर कन्यामान’, असा थेट परंपरा बदलण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुळात अन्य कोणत्याही धर्मात स्त्रियांना सन्मान दिला जात नाही, याउलट आदिशक्ती म्हणून स्त्रीची पूजा केली जाते.   फॅशन्स लि. कंपनीनेे अन्य धर्मातील महिलांविषयी चुकीच्या प्रथा-परंपरांविषयी प्रबोधन करणारी जाहिरात काढण्याची हिंमत करून दाखवावी. ‘मान्यवर’ ब्रँडची जाहिरात मागे न घेतल्यास यापुढे आंदोलन तीव्र करण्यात येईल, असेही डॉ. धुरी यावेळी म्हणाले,

भिवंडी ग्रामीणमध्ये काँग्रेसची बूथ बांधणी अभियानाला उत्साही प्रतिसाद

भिवंडी ग्रामीणमध्ये काँग्रेसची बूथ बांधणी अभियानाला उत्साही प्रतिसाद
भिवंडी दि.२५ (कशोर पाटिल)
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर प्रदेश स्तरावरून सक्षम बुथ बांधणीच्या सूचना देऊन आल्याने काँग्रेसचे मतदार संपर्क अंतर्गत बुथ बांधणी अभियान सुरू केले असून भिवंडी तालुका ग्रामीण काँग्रेस कमिटीने बुथ बांधणी अभियान सुरू केले असून मुंबई-नाशिक महामार्गावरील काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या कार्यालयात नुकतीच बुथ बांधणी अभियानाला जोरदार प्रतिसाद मिळत आहे.ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभरात विविध तालुक्यात बुथ बांधणी अभियान सुरू आहे त्या माध्यमातून आगामी येणाऱ्या निवडणुका या संदर्भात देखील चर्चासत्र सुरू आहेत.भिवंडी ग्रामीण बुथ बांधणी अभियाना दरम्यान काँग्रेस ठाणे ग्रामीण उपाध्यक्ष शरद ठाकरे,ठाणे जिल्हा ग्रामीण सरचिटणीस पंकज गायकवाड,भिवंडी तालुका युवक अध्यक्ष निलेश भोईर, ठाणे ग्रामीण सचिव सुधाकर ईताडकर, ज्येष्ठ नेते बि.डी पाटील, ज्येष्ठ नेते प्रभाकर शेळके,सोशल मिडीया अध्यक्ष ज्ञानेश्वर हुकमाळी, अनुसूचित जाती काँग्रेस अध्यक्ष संजय गायकवाड,ठाणे जिल्हा ग्रामीण मूबीसर पटेल,अध्यक्ष ओबीसी विभाग भिवंडी संतोष ठाकरे,ज्येष्ठ नेते नरेश माळी,ज्येष्ठ नेते शोराब गुजर,अध्यक्ष ओबीसी अशोक पालकर, अशोक मुरूडकर मायनॉरिटी तालुका अध्यक्ष इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

स्व.अंजली दिलीप सूर्यवंशी फाउंडेशन तर्फे महिला आरोग्य शिबीर

*स्व.अंजली दिलीप सूर्यवंशी फाउंडेशन तर्फे महिला आरोग्य शिबीर*
ग्रामीण प्रतिनिधी..

दुसखेडा येथे स्व.अंजली दिलीप सूर्यवंशी फाउंडेशन संचलित गीतांजली आरोग्यम हॉस्पिटल येथे महिला आरोग्य शिबीर घेण्यात आले.डॉ.विक्रांत सोनार (एम.बी.एस. एम.डी )स्त्री रोग तज्ञ आणि वाकचौरे वन  नरसिंग चे विद्यार्थी यांच्या सहकार्याने तापी परिसरातील 90 महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली त्यात मुख्य:त महिलांच्या पाळी संदर्भात समस्या, पांढरे पाणी जाणे,पोटात दुखणे, कमी रक्तस्राव जास्त रक्तस्त्राव किंवा वारंवार रक्तस्त्राव, पाळीच्या सर्व समस्या, अंडाशयाच्या किंवा गर्भाशयाच्या गाठी वर औषध उपचार, वारंवार गर्भपात होणाऱ्या जोडप्यांचे समुपदेशन व औषधोपचार, वंधत्व निवारण व कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया, प्रसुतीपूर्व व पश्चात औषधोपचार, अति जोखमीचे डिलेवरी व सिझेरियन ऑपरेशन, वयात होणाऱ्या मुलींच्या समस्या / समुपदेशन व औषध उपचार व समुपदेशन तपासणी करून  मार्गदर्शन केले. त्या वेळेस सेवानिवृत्त पोलीस अधिकारी  *दिलीपजी सूर्यवंशी साहेब* यांनी मोलाचे मार्गदर्शन केले त्यांनी संस्थेचे कार्य बद्दल माहिती दिली. सूर्यकांत सूर्यवंशी, संदीप कोळी, अरुण सूर्यवंशी, पिंटू राजपूत उपस्थित होते.शिबीर यशस्वी होण्यासाठी *विशाल दांडगे महाराष्ट्र प्रदेश सचिव ग्राहक संरक्षण फाउंडेशन* यांनी मोलाचे सहकार्य केले.

Friday, September 24, 2021

कल्याण परिमंडलातील 15 हजार ग्राहकांना वीजपुरवठा पूर्ववत करण्याची संधीराष्ट्रीय लोक अदालतीत सहभागी होण्याचे महावितरणचे आवाहन

कल्याण परिमंडलातील 15 हजार ग्राहकांना वीजपुरवठा पूर्ववत करण्याची संधी
राष्ट्रीय लोक अदालतीत सहभागी होण्याचे महावितरणचे आवाहन

कल्याण:(प्रतिनिधी) दि. 24 सप्टेंबर 2021


कल्याण परिमंडलातील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या 15 हजार ग्राहकांना त्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करून घेण्याची संधी मिळत आहे. त्यासाठी या ग्राहकांना तालुकास्तरावर शनिवारी (25 सप्टेंबर) आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत सहभागी होऊन महावितरणच्या नियमानुसार मिळणाऱ्या सवलतीचा लाभ घेत थकबाकीची रक्कम भरावी लागणार आहे.

परिमंडलातील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित 15 हजार ग्राहकांना राष्ट्रीय लोक अदालतीत सहभागी होण्याबाबत विधी विभागाकडून नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. काही कारणांनी नोटिसा न मिळालेल्या ग्राहकांनाही अदालतीत सहभागी होता येईल. महावितरणच्या नियमानुसार अदालतीत सहभागी ग्राहकांना सवलत देण्यात येईल. या सवलतीचा लाभ घेऊन थकबाकीची रक्कम भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा तात्काळ पूर्ववत करण्यात येईल. तर ही संधी डावलणाऱ्या संबंधित ग्राहकांवर पुढील कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. कायमस्वरूपी वीज खंडित ग्राहकांनी राष्ट्रीय लोक अदालतीत सहभागी होऊन संधीचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे. 

मुख्य अभियंता धनंजय औंढेकर, अधीक्षक अभियंते, संबंधित अधिकारी, उपविधी अधिकारी दीपक जाधव राष्ट्रीय लोक अदालतीत उपस्थित राहणार आहेत.

सहायक अभियंत्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

सहायक अभियंत्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

कल्याण: (प्रतिनिधी)दि. 24 सप्टेंबर 2021

वीजपुरवठा खंडित का केला याचा जाब विचारत विरार ग्रामीण कक्ष कार्यालयात घुसून शाखा अभियंत्याला मारहाण केल्याची घटना गुरुवारी (23 सप्टेंबर) घडली. यासंदर्भात विरार ग्रामीण पोलीस ठाण्यात एका महिलेसह तिघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिजित साळुंके, पूनम देसाई आणि एक अज्ञात व्यक्ती असे या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. आईचा अंत्यविधी व उत्तरक्रियेच्या रजेनंतर सहायक अभियंता राजकुमार कल्लोळकर गुरुवारी विरार ग्रामीण कक्ष कार्यालयात कर्तव्यावर रुजू झाले होते. दैनंदिन कामकाज सुरू असताना तिन्ही आरोपींची कार्यालयात घुसून वीजपुरवठा का खंडित केला याचा जाब विचारात शिवीगाळ सुरू केली. तर आरोपी अभिजित साळुंके याने कल्लोळकर यांना मारहाण केली. यात कल्लोळकर यांच्या नाकाला व कानाला जखमा झाल्या. कल्लोळकर यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध सरकारी कामात अडथळा (कलम 353), जाणीवपूर्वक दुखापत करणे (कलम 323) संगनमत (कलम 34) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्तव्यावरील वीज कर्मचाऱ्यांना दमदाटी, मारहाण हा गंभीर स्वरूपाचा फौजदारी अपराध असून या गुन्ह्यातील आरोपींना कठोर शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे वीज कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामात अटकाव न करता सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.


समवेत - जखमी सहायक अभियंता राजकुमार कल्लोळकर यांचे छायाचित्र

बालरोगतज्ज्ञ व स्त्रीरोगतज्ज्ञ यांच्या सहाय्याने कुपोषण कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे प्रयत्न



*बालरोगतज्ज्ञ व स्त्रीरोगतज्ज्ञ यांच्या सहाय्याने कुपोषण कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे प्रयत्न*


  पालघर (प्रतिनिधी) जिल्ह्यात धडक मोहीम राबवल्यांतर  कुपोषणा मध्ये काही प्रमाणात  वाढ झाली असून सर्व उपाययोजना करूनही जिल्ह्यातील कुपोषण कमी होत नसून  अनुभवी बालरोगतज्ज्ञ स्त्रीरोगतज्ज्ञ  यांच्या सहकार्याने कुपोषण कमी करण्यासाठी मदत होईल या हेतूने मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयातील व्ही.सी. दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. 
मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी आरोग्य आणि महिला व बालविकास विभागामार्फत आपण कुपोषण कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात परंतु तरीही कुपोषणात घट होत नाही यावर काय करता येईल असे विचारले असता उपस्थित बालरोगत स्त्रीरोगतज्ञ यांनी आपापली मते व्यक्त केली.
 शेवग्याच्या शेंगांचा आहारात भरपूर वापर करावा तसेच पाल्यापासून बनवली जाणारी मोरिंगा पावडर देखील यासाठी उपयुक्त असते असे सुचवले.तर बालकांना व मातांना आपल्या समोर जेवण देऊन आहारात अंडे,केळे, खिचडी यांचा समावेश असावा तर रोज दोन अंडी खाल्यास  १००% कुपोषण दूर होऊ शकते अस सांगितले.
सुके मासे, ऍनिमल प्रोटीन,आयर्न युक्त मीठ, शेंगदाणा तेल, याचाही आहारात समावेश करणे गरजेचे आहे असे सुचवले.
 तर बालकाचे कुपोषण कमी करायचे असेल तर केवळ बालके नाही तर पूर्ण कुटुंबे आणि गाव दत्तक घ्यावे लागेल.आणि आईच्या कुपोषणाकडे लक्ष दिले तर सुदृढ बाळ जन्माला येईल. असे मत ही यावेळी व्यक्त केले.होमिओपॅथी औषधांचाही  प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयोग करता येईल. 
यासोबत च  बालविवाह,बालवयातील गरोदरपण, याबाबत जनजागृती करणे गरजेचे असून ग्रामीण भागातील मुलांसाठी शिक्षण हे अत्यावश्यक आहे. असे अनेक कुपोषणा वर मात करणारे पर्याय यावेळी सुचवण्यात आले.
सर्व उपस्थित बालरोगतज्ज्ञ स्थानिक स्त्रीरोग तज्ञ व अधिकारी यांच्या सहकार्याने  कुपोषण कमी करण्यासाठी  योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी विचार विनिमय करण्यात येईल असे यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (म बा क),अति.जिल्हा शल्य चिकित्सक, इतर अधिकारी व बालरोगतज्ज्ञ स्त्रीरोगतज्ज्ञ उपस्थित होते.

Thursday, September 23, 2021

किशोर पाटील यांचा पत्रकार संघाच्या वतीने सन्मान!

किशोर पाटील यांचा पत्रकार संघाच्या वतीने सन्मान!
भिवंडी दि.२३(सुरजपाल यादव) महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे वकोकण विभागीय सरचिटणीस तथा दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक श्री.किशोर बळीराम पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे भिवंडी शहरातील सदस्य आचार्य श्री. सुरजपाल यादव,श्री.श्रीनिवास सिरिमल्ली,श्री.मेहंदी हसन,श्री.वेंकटेश रापेल्ली,श्री.सी.पी.तिवारी,श्रीमती. परवीन खान यांनी त्यांच्या कार्यालयात जाऊन छोटेखानी प्रमाणात वाढदिवस साजरा करून त्यांचा सन्मान केला.व त्यांच्या बद्दल असलेले प्रेम प्रत्येकाने आपल्या शब्दात व्यक्त केले.त्यानंतर  शाल  व पुष्पगुच्छ देऊन  त्यांचा सन्मान केला.त्यामुळे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांचे संपादक श्री किशोर बळीराम पाटील यांनी आभार मानले. व असेच प्रेम भविष्यातही आपण कायम ठेवावे या सदिच्छा व्यक्त केल्या.

आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन आणि तेरणा रिसर्च सेंटर हॉस्पिटल नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन२१ रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी तेरणा हॉस्पिटल मोफत बसणे पाठविले.

आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन आणि तेरणा रिसर्च सेंटर हॉस्पिटल नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन
२१ रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी तेरणा हॉस्पिटल मोफत बसणे पाठविले.
कल्याण दी.२३(किशोर पाटील)
आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन आणि तेरणा रिसर्च सेंटर हॉस्पिटल नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन.अनंता सुधा भवन. शॉप नंबर 3. न्यू स्टार सिटी हॉस्पिटल खाली. चक्की नाका. कल्याण ( पूर्व )येथे मंगळवार दी.२१/०९/२०२१ रोजी करण्यात आले होते. यामध्ये
1) हृदयाची शस्त्रक्रिया.2) अन्ननलिका शस्त्रक्रिया 3) हाडांचे फॅक्चर शस्त्रक्रिया 4) कॅन्सर शस्त्रक्रिया  5) कान.नाक व घसा शस्त्रक्रिया  6) हर्निया  7) स्वशननलिकेच्या संबंधित शस्त्रक्रिया  8) पुरुष ग्रंथी  वाढणे मूत्राशयाच्या मार्ग संकुचित होणे 9) मणक्याची शस्त्रक्रिया  10) यकृत्याचे आजार / शस्त्रक्रिया 11) सांध्याच्या शस्त्रक्रिया  12) अपेन्डिस  13) डोळ्यातील सफेद पडद्याची शस्त्रक्रिया  14) मुतखडा शस्त्रक्रिया  15) जीभेच्या शस्त्रक्रिया  16) किडनीचे आजार  17) गर्भपिशवी दुरुस्ती  18) पित्ताशय किंवा पित्ताशयातील खडे शस्त्रक्रिया यांचा समावेश असून आज वेगवेगळ्या प्रकरतील एकूण २१ रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी तेरणा हॉस्पिटल मध्ये घेऊन जात असल्याची माहिती डॉ.जितेंद्र पाटील यांनी प्रत्यक्ष दैनिक स्वराज्य तोरण शी बोलताना दिली. तसेच रूग्णांना आपली ओळख 
 पटऊन देण्यासाठी  येताना रेशन कार्ड. ओळखपत्र व  जुने रिपोर्ट सोबत घेऊन येणे असे सांगण्यात आले होते.त्यामुळे सर्व तपासण्या करताना कोणतीही अडचण निर्माण झाली नाही. या शिबिरात एकूण 200 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये शस्त्रक्रियेसाठी 21 रुग्ण आढळले या रुग्णांना तेरणा रिसर्च सेंटर हॉस्पिटल नेरूळ नवी मुंबई या ठिकाणी ऍडमिट करण्यात आले आहे. 
 अशी माहिती श्री जितेंद्र पाटील आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन. अध्यक्ष यांनी प्रत्यक्ष दैनिक स्वराज्य तोरण शी बोलताना दिली.

शिवसेनेला मिळत आहे तरूण तडफदार उमेदवार

शिवसेनेला मिळत आहे तरूण तडफदार उमेदवार 
 पालघर - पालघर जिल्हा परिषद वणई गटातून रोहित गावीत यांना उमेदवारी देण्यात आली, त्या बद्दल त्यांनी मा.श्री उध्दवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, श्री एकनाथजी शिंदे - नगरविकास मंत्री, श्री दादाजी भुसे कृषी मंत्री व पालघर जिल्हा पालकमंत्री, श्री रविंद्र फाटक संपर्क प्रमुख, मा. श्री राजेंद्र गावित खासदार पालघर जिल्हा, पालघर शिवसेना जिल्हा प्रमुख - महिला जिल्हा संघटक - जिल्हा युवा अधिकारी - तालुका प्रमुख - सर्व शाखा प्रमुख आजी माजी पदाधिकारी - शिवसैनिक यांचे ते मनापासून ( मान्यवर यांचे ) आभार / धन्यवाद .
    रोहित गावित हे प्रसिद्धी पासून दुर राहुन सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक कामे करीत आहेत. आजही हिंदूहृदय सम्राट मा. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर मा. आनंद दिघे यांच्या शिकवणी प्रमाणे तळागाळातील जनते पर्यंत जाऊन ८० टक्के समाजकारण करण्यासाठी ते निवडणूक रिंगणात उतरत आहे. 
     सर्वसामान्य जनतेच्या प्राथमिक गरजा, शिक्षण व काळाबरोबर शिक्षणासाठी संगणकीय शिक्षण, आरोग्यासाठी  विविध योजना, औद्योगिक क्षेत्रात  कुशल कौशल्य युक्त रोजगार, शेतीला पुरक व्यवसाय उपलब्ध करणे, शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध करणे, दळणवळणाची साधने उपलब्ध करणे, जि. परिषद मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेचा लाभ सर्व सामान्य नागरिक / शेतकरी यांच्या पर्यंत पोहचविण्यासाठी मी प्रयत्न शिल असेल त्यांचे सांगणे आहे. 
  मा.श्री, राजेंद्र गावित साहेब खासदार पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली मी जनसेवेचे व्रत स्विकारले असून, मी जे बोलतो तेच मी करतो. असे रोहित गावित यांचे सांगणे आहे. ते  जिल्हा परिषद पालघर ( पोट निवडणूक ) वणई ( १८ ) गटाचे उमेदवार असून, त्यांची निशाणी आहे धनुष्यबाण

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...