*जल जिवन मिशन योजना यशस्वी करण्याच्या दृष्टीने गावाचा जल आराखडा तयार करा* –
जि.प. अध्यक्षा भारती कामडी
पालघर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद अध्यक्ष भारती कामडी , खासदार, राजेद्र गावीत, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ उपायुक्त विकास, गिरीश भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या संकूल सभागृह येथे खाते प्रमुख व गटविकास अधिकारी यांच्या आढावा बैठकीत केंद्र पुरस्कृत योजना जलजीवन मिशन अभियानाचा आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पावस्व) तुषार माळी यांनी सादर केला.
ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना सन २०२४ पर्यंत ‘हर घर नल से जल’ या योजनेमधून पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. जल जीवन मिशन अंतर्गत सन २०२० ते २०२४ पर्यंत जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागातील कुटुंबांना नळजोडणीद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यात येणार आहे. या उपक्रमात गाव स्तरावरील पदाधिकारी व ग्रामस्थांरनी सहभागी होऊन गावाचा जल आराखडा तयार करा, असे आवाहन जिल्हां परिषदेच्या अध्यक्षा भारती कामडी यांनी केले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी जलजीवन मिशन अभियानाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी जलजीवन मिशन अभियानाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या योजना या गावातील पाण्याचे स्त्रोत, पाण्याचे नियोजन करीत असताना नैसर्गिक, कृत्रिम पाणीसाठे याबाबतचा जल आराखडा तयार करावा तसेच पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊनच आराखडे तयार करण्यात यावेत अश्या सुचना राज्याला दिल्या आहेत.
या उपक्रमात जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ, सामाजिक संस्था यांनी सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन खासदार राजेंद्र गावित यांनी केले.
जल जीवन मिशनच्या कार्यरत मार्गदर्शन सूचनांनुसार ग्रामीण भागातील सर्व कुटुंबाना सन २०२४ पर्यंत वैयक्तिक नळ जोडणीद्वारे ५५ LPCD प्रमाणे गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करणे हे जल जीवन मिशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे. याप्रमाणे सन २०२४ पर्यंत ग्रामीण भागातील सर्व कुटूंबांना वैयक्तिक नळ जोडणी करण्यात येणार आहे. जिल्हायात ४ लाख १० हजार ७३३ ग्रामीण कुटूंब संख्याळ आहे. चालू वर्षातील १ लाख ५६ नळजोडणीच्याे उद्दिष्टापैंकी ४५ हजार नोंदी जलजीवन मिशनच्या संकेत स्थळावर करण्याण आलेल्या आहेत. तसेच उर्वरीत उदिष्ट पूर्ण करण्या साठी नियोजन करण्यात आलेले आहे. यासाठी जिल्हार परिषदेच्या वतीने उद्दीष्ट्पूर्तीसाठी कालबध्द कार्यक्रम निश्चित केलेला आहे. या कार्यक्रमात केवळ ग्रामीण भागातील कुटूंबांना पाणी उपलब्ध करुन देण्या्पूरता मर्यादित न ठेवता जिल्हयातील अंगणवाडया, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपक्रेंद्र इत्यादी घटकांना पाणी पुरवठा करण्यातचा १०० दिवसाचे विशेष अभियान राबविण्यात सुरू असल्यािचे उपमुख्य् कार्यकारी अधिकारी तुषार माळी यांनी सांगीतले. यावेळी अति.मु.का.अ.चंद्रकांत वाघमारे,प्रकल्प संचालक माणिक दिवे, सर्व खाते प्रमुख व गट विकास अधिकारी उपस्थित होते.
******
No comments:
Post a Comment