Thursday, May 27, 2021

पानवेलीनाही इतर पिकांप्रमाणे विम्याचे संरक्षण कवच मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार - खासदार राजेंद्र गावित

*पानवेलीनाही इतर पिकांप्रमाणे विम्याचे संरक्षण  कवच मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार - खासदार राजेंद्र गावित*
केळवे (प्रतिनिधी)केळवे 27 मे 2021
 16 ,17 व 18 मे रोजी झालेल्या तौत्के  चक्रीवादळामुळे पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे व मच्छिमारांचे  खूप नुकसान झाले आहे .
समुद्रकिनारी असलेल्या केळवे-माहीम अशा गावांमधील शेतकऱ्यांना( वाडी वाले ) त्याचा फटका बसला आहे, केळवे इथे प्रत्यक्ष भेट देऊन पानवेल( खायचे पान ), केळी, भोपळी मिरची ,आंबे यासारख्या वाड्यांची गावित साहेबांनी पाहणी केली ,तेव्हा केळी आंबे काजू या पिकांप्रमाणे पान वेलीला विम्याचे संरक्षण कवच नाही ,शासनाच्या दुष्काळ संहिता 2015 प्रमाणे हेक्टरी  फक्त 18 हजार रुपये नुकसान भरपाई मिळू शकते. पान वेलीच्या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे ,म्हणून पानवेली ह्या  पिकाला  विमा संरक्षण मिळावे म्हणून मी शासनाकडे प्रयत्न करीन असे खासदार श्री राजेंद्र गावित साहेब तेथील शेतकऱ्यांना म्हणाले.
 पाहणी दौऱ्यात शिवसेना पालघर लोकसभा सहसमन्वयक केदार काळे ,नायब तहसीलदार केशव तरंगे ,तालुका कृषी अधिकारी तरुण वैती  कृषी सहाय्यक दिक्षा संखे, सरपंच सौ भावना किणी , उपसरपंच नितीन राऊत ,मच्छीमार नेते रामकृष्ण तांडेल ,पंचायत समिती सदस्यश्रीमती  भारती सावे, शाखाप्रमुख तुषार पाटील, विभाग प्रमुख उमेश पालेकर, ग्रामपंचायत सदस्य दिनेश तांडेल, ग्रामसेवक मोडवे हे उपस्थित होते प्रमोद चौधरी ,रघुनाथ सावे व इतर शेतकऱ्यांना खासदार श्री राजेंद्र गावित यांनी धीर दिला शासनाकडून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यासाठी मी प्रयत्न करीन असे म्हणाले . शासनाच्या नियमाप्रमाणे जे हेक्‍टरी 18 हजार रुपये आहेत ते वाढवून देण्यासाठीही प्रयत्न करीन.
 माहीम-केळवे भागात 200 एकराच्या आसपास पानवेल ची लागवड होते ही पाने कलकत्ता व इतर भागात जातात पूर्वी ही पाने पाकिस्तान अफगाणिस्तान काश्मीर या भागात जात होती.
 त्याप्रमाणे माहीमची प्रसिद्धी केळी ही दोनशे ते अडीचशे एकरामध्ये लावलेली आहेत त्या केळ्याच्या पिकाचेही नुकसान झालेला आहे ,आंब्याच्या झाडावरून वादळामुळे आंबे जमिनीवर ती पडून पूर्ण आंब्याचं पीक नष्ट झालेला आहे ,संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामे ताबडतोबीने पूर्ण करून अहवाल देण्याच्या सूचना खासदार श्री राजेंद्र गावित साहेब यांनी दिल्या,
 माननीय मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडी सरकार शेतकऱ्यांच्या सोबत आहे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असे खासदार श्री राजेंद्र गावित साहेब म्हणाले.

No comments:

Post a Comment