Wednesday, October 14, 2020

दि. 14 ऑक्टोबर 2020 मच्छिमारांनी समुद्रांत जावू नये, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

दि. 14 ऑक्टोबर 2020 मच्छिमारांनी समुद्रांत जावू नये, नागरिकांना सतर्कतेचा इशारा पालघर(प्रतिनिधी) दि. 14 :- दिनांक 14/10/2020 रोजी भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार पालघर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविलेली आहे. तसेच समुद्र मोठ्या प्रमाणात खवळलेला असेल त्यामुळे दिनांक 16/10/2020 पासून पुढील 3 दिवस मच्छिमारांनी समुद्रांत जावू नये असा इशारा दिला आहे. त्याचबरोबर जे मच्छिमार समुद्रामध्ये आहेत त्यांनी दिनांक 15/10/2020 पर्यंत बंदरामध्ये सुरक्षित ठिकाणी यावे असा इशारा दिलेला आहे. तरी, पालघर जिल्ह्यातील मच्छिमार बांधवांनी या कालावधीत समुद्रात जावू नये असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, पालघर यांनी केले आहे. **********

No comments:

Post a Comment