Thursday, July 22, 2021

पालघर मधील सावरे - एंबुर गावातील तीन जण वाहून गेले !

पालघर मधील सावरे - एंबुर गावातील तीन जण वाहून गेले !
 
    
   
पालघर (प्रतिनिधी)- पालघर तालुक्यातील मनोर-दुर्वेस जवळील सावरे - एंबुर गावातील दोन तरुण व एक महिला रस्त्यावरील पुरातून मार्ग काढत पायी घराकडे परतत असताना वाहून जाण्याची घटना घडली. यावेळी या दोन बचावले तर परंतु महिला वाहत जाऊन मरण पावली.
    गेल्या तीन चार दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. यामुळे अनेक रस्ते पाण्याखाली जाऊन नागरी वस्तीमध्येहि पाणी शिरून जनजीवन विस्कळीत झाले.  या अतिवृष्टी पावसामुळे मनोर - दुर्वेस जवळील ऐंबूर येथील वैतरणा नदीला मोठया प्रमाणात पूर आला होता. त्यातच या परिसरातील ओढे-नाले हि तुडुंब भरून वाहत होते. 
     यावेळी सावरे- ऐंबूर (पाटील पाडा) येथील निलेश दुतकर (वय  22), योगेश पाटील (वय 19 ) व दर्शना दुतकर ( वय 50 ) हे रात्री नवच्या सुमारास रस्त्यावरील पुरातून मार्ग काढत आपल्या घराकडे परतत असताना कडव पाड्याजवळ पुराच्या पाण्यात मोठा लाकूड आडवा आल्याने हे तिघेही वाहून गेले. यावेळी सोबत  असलेल्यांनी ग्रामस्थांना माहिती दिली. 
      यामध्ये निलेश दुतकर हा दुरवर वाहत जाऊन पोहून निघाला व योगेश पाटील याला ग्रामस्थांनी  सुखरुप बाहेर काढले. परंतू रात्रीची वेळ व अपुऱ्या व्यवस्था अभावी सदर महिला या पुरामधे बुडून मरण पावली. या बचावलेल्या दोन युवकांची प्रकृती स्थिर असली तरीही त्यांनाही मोठ्या प्रमाणात जखमा व दुखापत झाली आहे. अशी माहिती येथील युवा कार्यकर्ते विश्वास दुतकर व गावातील महिला पोलीस पाटील निलम पाटील यांनी दिली.

No comments:

Post a Comment