Tuesday, July 20, 2021

ग्रामपंचायतीचे थकीत विजबिले असली तरी वीजपुरवठा खंडित करू नये. केदार काळे -- शिवसेना पालघर लोकसभा सहसमन्वयक

ग्रामपंचायतीचे थकीत विजबिले असली तरी वीजपुरवठा खंडित करू नये. 
केदार काळे --  शिवसेना पालघर लोकसभा सहसमन्वयक 
पालघर ( हिरालाल लोखंडे ) पालघर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीनी महावितरण कंपनीनीचे रोड लाईट बिले न भरल्याने वीजपुरवठा करण्या बद्दल लेखी नोटीस दिलेली आहे .
 किंवा तात्पुरता वीजपुरवठा खंडित केला आहे. या बद्दल श्री केदार काळे यांनी १९ जुलै २०२१ रोजी महावितरण महाराष्ट्रात राज्य विद्युत वितरण मर्यादित पालघर .येथील श्रीमती किरण नागावकर अधीक्षक अभियंता पालघर, श्री प्रताप मचिये कार्यकारी अभियंता पालघर. यांची भेट घेऊन पावसाळ्यात ग्रामपंचायत रोड लाईट व गाव पाणीपुरवठा योजनेचा विज जोडणी खंडित करण्यात येऊ नये अशी मागणी केली आहे लाॅक डाऊन मुळे ग्रामपंचायतींची पाणी पट्टी, घर पट्टी वसुल  होत नाही. ग्रामपंचायतीना अधिक उत्पादनाची साधने नाहीत. १५ व्या वित्त आयोगाचे पैसे थकीत विजबिल भरण्यासाठी मिळाले नाहीत. अश्या अनेक प्रकारच्या अडचणी सरपंच, लोकप्रतिनिधींनी यांनी महावितरणचे अधिकारी यांच्या समोर मांडल्यानंतर, महावितरणचे अधिकारी, यांनी 
 २६ किंवा २७ जुलै २०२१ पर्यंत थकीत बिलाच्या ३० %  टक्के रक्कम भरावी. व उरलेली रक्कम कधी देणार असा पर्याय सुचविला असतांना, ग्रामपंचायत सरपंच यांचे सांगणे आहे. ३० % टक्के रक्कम भरणे शक्य नाही. आमच्या अडचणी समजून घ्या. यावर महावितरणाचे अधिकारी यांचे सांगणे आहे, आपण ( सरपंच ) लवकरात लवकर बिलाची किती रक्कम भरणार, ते कळविणे. आम्ही वरिष्ठ अधिकारी यांच्या कडे आपले प्रपोजल ( म्हणणे ) मांडतो. व  विज जोडणी खंडित न करण्यासाठी , स्थगिती देण्याचा प्रयत्न करतो. तरीही आपण एप्रिल २०२० ते आज पर्यंत ची रोडलाईट बिले, व गाव पाणीपुरवठा योजनेची बिले भरावी. किंवा त्यातील काही रक्कम भरणा करावी, म्हणजे विद्युत पुरवठा खंडित होणार नाही. तसेच एप्रिल २०२० पूर्वीची विजबिले १५ व्या वित्त आयोगाच्या आराखड्यात टाकून मंजूर करून घ्यावी. यावर श्री केदार काळे यांचे सांगणे आहे, करोना प्रार्दुरभाव असल्याने ग्रामसभा घेण्यासाठी अडचणी आहेत. १५ व्या वित्त आयोगाच्या आराखड्यात वीजबिल समाविष्ट करणे शक्य होऊ शकेल ते सांगता येत नाही. महावितरण कंपनी, ग्रामपंचायतीना दरमहा वीजबिले देत नव्हती. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतीची विजबिले थकीत आहे. तरी आपण थकीत वीज बिलावर लावलेले व्याज तरी कमी करण्यात यावे. शासनाने  व महावितरण कंपनीने ग्रामपंचायतीना समजले व परवडेल अशी योजना करावी. 
      या बैठकीला सौ. गीता पाटील सरपंच खारेकुरण, सौ. स्वाती पाटील सरपंच विळंगी, सौ. चेतना वैद्य सरपंच भादवे मधुकर नगर, सौ. नयना किणी सरपंच तिघरे आंबोडे, सौ. वृषाली गावड सरपंच आगरवाडी, सौ. करणा तरे सरपंच एडवण, सौ. श्रध्दा बारी सरपंच दांडा खटाळी, हेमंत पाटील, योगिता किणी, कल्पना पाटील, प्रविण पाटील तसेच अनेक ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच, सदस्य उपस्थित होते.

No comments:

Post a Comment