Tuesday, July 20, 2021

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप रब्बी हंगाम सन 2021 साठी दिनांक 23 जुलै 2021, पर्यंत मुदतवाढ

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम सन 2021 साठी 
दिनांक 23 जुलै 2021, पर्यंत मुदतवाढ

पालघर (प्रतिनिधी)दि. 20 :- शासनाने प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप 2021 व रब्बी हंगाम 2020-21 पासून तीन वर्षासाठी जिल्हयात राबविण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. त्याअंतर्गत जिल्हयातील भात, नागली व उडीद या पिकांचा समावेश आहे. खरीप हंगामासाठी विमा संरक्षित रक्कम भातासाठी हेक्टरी रक्कम रुपये 45,500/-, नाचणीसाठी हेक्टरी रक्कम रुपये 20,000/- आणि उडदासाठी हेक्टरी रक्कम रुपये 20,000/- इतकी आहे असून-शेतकऱ्यांनी 2 टक्के विमा हप्ता म्हणजेच भातासाठी 910/- रुपये प्रति हेक्टर, नाचणीसाठी 2 टक्के 400/-रुपये प्रति हेक्टर व उडीद करीता 400/- रक्कम प्रति हेक्टर आहे. सदर योजना कर्जदार व बिगरकर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक असून खरीप 2021 मध्ये योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 15 जूलै 2021 होती. तथापि केंद्र शासनाचे दिनांक 15 जूलै 2021 च्या पत्रान्वये योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी होण्याची मुदत वाढवून ती दि. 23 जुलै 2021 अशी केली आहे. मागील वर्षी प्रधानमंत्री पिक विमा योजनमध्ये पालघर जिल्हयातील एकूण 18835 कर्जदार व 16054 बिगरकर्जदार असे एकूण 34889 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. चालू वर्षी आतापर्यंत जिल्हयातील एकूण 14001 कर्जदार व 6168 बिगरकर्जदार असे एकूण 20169 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे.
• खरीप हंगामातील जोखीमीच्या बाबी –
1. हवामान घटकांच्या प्रतिकुल परिस्थीतीमुळे पिकांची पेरणी हिंवा लावणी झाल्यामुळे  होणारे नुकसान
2. पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकुल परिस्थीतीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी झाल्यामुळे होणारे नुकसान
3. पिक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, किड व रोग इ. बाबीमुळे उत्पन्नात होणारी घट.
       तरी शेतकऱ्यांनी पीक विमा मिळणेस्तव प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे. त्याकरीता तात्काळ नजीकच्या तालुका कृषि अधिकारी, कार्यालयाशी तसेच बँक व आपले सरकार केंद्र (CSC) संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर श्री. काशिनाथ तरकसे यांनी केले आहे. 
  चालू वर्षी पालघर जिल्हयासाठी एचडीएफसी कंपनीची निवड करण्यात आली आहे. कंपनीमार्फत तालुका स्तरावर प्रतिनिधींची नेमणूक करण्यात आली आहे. त्याची बसण्याची व्यवस्था तालुका कृषि अधिकारी कार्यालयात केली आहे. त्यांचे नाव व संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत.
1) पालघर जिल्हा कार्यालय, श्री. भारत जोगी, 7875219444
2) पालघर, श्री. स्वप्नील सुतार, 8767388475
3) वसई, श्री. संदीप धंहाडा, 9011879023
4) डहाणू, श्री. जयेश धापसी, 9764940628
5) तलासरी, श्रीम. पुजा धामोडा, 8080473853
6) वाडा, श्री. महेश धापसी, 7066093579
7) विक्रमगड, श्री. विशाल गिंभल, 9370971339
8) जव्हार, श्री. सचिन तुंगार, 9561743370
9) मोखाडा, श्री. उल्हास पाटेकर, 9273706707  
तरी शेतकऱ्यांना या योजनेबाबत काही अडचण आल्यास वरील प्रतिनिधींशी संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment