तोक्ते चक्रीवादळ नुकसानीची माहिती
पालघर (प्रतिनिधी)दि. २९: दिनांक १६ व १७ मे २०२१ रोजी "toपालघर दि. २९: दिनांक १६ व १७ मे २०२१ रोजी " तोक्ते " चक्रीवादळामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे पालघर जिल्ह्यात खालीप्रमाणे नमुद केल्यानुसार नुकसान झालेले आहे.
१. मयत व्यक्ती: ३ जखमी व्यक्ती ४. २. शेतीपिके १४३४८ शेतकऱ्यांचे ६०५७.३० हे. आर. क्षेत्र.
३. मयत जनावरे ८.
४. पुर्णत: नष्ट/अंशत: पडझड झालेली कच्ची/ पक्की घरे १४४०७ ५. अंशतः बाधित बोटी-२८, पूर्णतः बाधित बोटी २५, पुर्णतः नष्ट झालेले जाळे २६६.
६. दुकानदार/टपरीधारक ४. ७. कुक्कुटपालन शेड १९
सदर नुकसानीसाठी महसूल व वनविभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील दि.०३.०६.२०२१ व २३.०६.२०२१ रोजीच्या शासन निर्णयानुसार विशेष दराने मदत जाहिर केलेली असून शासनाकडून रक्कम रुपये ५१३७८५०००/- (अक्षरी एक्कावन्न कोटी सदोतीस लाख पंच्याऐंशी हजार रुपये मात्र) इतके अनुदान जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झालेले आहे. पालघर जिल्ह्यातील संबंधित तहसिलदार/ सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय विभाग / जिल्हा पुरवठा अधिकारी यांना सदरचे अनुदान उपलब्ध करुन दिलेले असून ते बाधितांना तात्काळ वाटप करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पालघर यांनी सर्व संबंधितांना दिलेले आहेत. असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पालघर डॉ किरण महाजन यांनी कळविले आहे." चक्रीवादळामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे पालघर जिल्ह्यात खालीप्रमाणे नमुद केल्यानुसार नुकसान झालेले आहे.
१. मयत व्यक्ती: ३ जखमी व्यक्ती ४. २. शेतीपिके १४३४८ शेतकऱ्यांचे ६०५७.३० हे. आर. क्षेत्र.
३. मयत जनावरे ८.
४. पुर्णत: नष्ट/अंशत: पडझड झालेली कच्ची/ पक्की घरे १४४०७ ५. अंशतः बाधित बोटी-२८, पूर्णतः बाधित बोटी २५, पुर्णतः नष्ट झालेले जाळे २६६.
६. दुकानदार/टपरीधारक ४. ७. कुक्कुटपालन शेड १९
सदर नुकसानीसाठी महसूल व वनविभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील दि.०३.०६.२०२१ व २३.०६.२०२१ रोजीच्या शासन निर्णयानुसार विशेष दराने मदत जाहिर केलेली असून शासनाकडून रक्कम रुपये ५१३७८५०००/- (अक्षरी एक्कावन्न कोटी सदोतीस लाख पंच्याऐंशी हजार रुपये मात्र) इतके अनुदान जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झालेले आहे. पालघर जिल्ह्यातील संबंधित तहसिलदार/ सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय विभाग / जिल्हा पुरवठा अधिकारी यांना सदरचे अनुदान उपलब्ध करुन दिलेले असून ते बाधितांना तात्काळ वाटप करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पालघर यांनी सर्व संबंधितांना दिलेले आहेत. असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पालघर डॉ किरण महाजन यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment