रायगड (प्रतिनिधी) स्वराज्यनीतीच्या बंधनात शिवराज्य ब्रिगेड मैदानात .विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या आदर्श घेत समाजाला अभिप्रेत अशी समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी शिवरायांनी स्वराज्य निती अवलंबली .समाजकारण हेच राजकारण हेच शिवसुत्र घेऊन एक नवि व लोकशाही खरे स्वरूप असलेली समाज जागृत व्यवस्था व राज्यव्यवस्था निर्माण करण्याचा संकल्प करून छत्रपतीनचे स्वराज्य हे प्रत्येक व्यक्तीला आपलेसे वाटणारे राज्य होते ते खऱ्या अर्थाने आताच्या स्थितीत कसे सत्यात उतरेल यासाठी प्रयत्नशिल राहणे हा यांचा मानस आहे. त्या साठी जो पण संघर्ष करावा लागेल ह्याच साठी शिवराज्य ब्रिगेड ह्या संघटनेची सुरुवात करून प्रत्येक जिल्हा मध्ये ह्या संघटनेची बांधणी करून घ्यायला सुरुवात केली आहे.मा खासदार .सुधीर सावंत ह्यांनी उद्घाटन केले. महाराष्ट्र,उत्तर मुंबई, प.मुंबई, द.मुंबई,रायगड जिल्हा अशा ठिकाणी बांधणीला सुरुवात झाली आहे.रायगड मधील जिल्हा अध्यक्ष जगदीश घरत यांची निवड होताच .ज्येष्ठ निरूपणकार व ( ब्रँड अर्बेसिटर) स्वच्छता दुत आदरणीय श्री.आप्पा साहेब धर्माधिकारी , व आदरणीय सचिन दादा धर्माधिकारी यांच्या निवास स्थानी जाऊन पुढील वाटचाली साठी आशीर्वाद घेण्यासाठी ही सर्व मंडळी गेली होती. व त्यांनी आशीर्वाद घेतले यात उपस्थित शिवराज्य ब्रिगेड संघटनेचे प्रदेश महासचिव शैलेश चव्हाण ,प्रदेश संघटक संतोष मुळम,रायगड जिल्हा अध्यक्ष जगदीश घरत,संजोग पालकर,निलेश पाटील ,नीरज पाटील आधी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment