Friday, April 16, 2021

जिल्ह्यात खत व बियाणे पुरवठ्याचे जिल्हास्तरीय गुण नियंत्रण कक्ष १५ मे पासून सुरू

जिल्ह्यात खत व बियाणे पुरवठ्याचे जिल्हास्तरीय गुण नियंत्रण कक्ष १५ मे पासून सुरू

 पालघर (प्रतिनिधी)दि.१६ : पालघर जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र 469699 हे. असून लागवडीयोग्य 147425 हे. आहे. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान 2537.20 मिमी. आहे. जिल्ह्यामध्ये भात व नागली हे प्रमुख पिक आहे. भात या पिकाखालील 79856 हे. क्षेत्र असून उत्पादकता 1864 कि./हे. आहे. नागली या पिकाखालील 11328 है. क्षेत्र असून उत्पादकता 841 कि./हे. आहे.

शेतकरी शेती उत्पादन वाढविण्यासाठी रासायनिक खतांचा वापर करतो. मातीचे विश्लेषण करून पिकास आवश्यक असलेले खताचे व्यवस्थापन केल्यास उत्पादकतेमध्ये वाढ होते. बऱ्याच वेळा आवश्यकतेपेक्षा जास्त रासायनिक खताच्या वापरामुळे जमिनीचे आरोग्य बिघडते. आपल्या गावातील कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क करून किंवा गावाच्या ग्राम पंचायतमध्ये गावाचा सुपीकता निर्देशांक लावला आहे जाणून घ्यावा त्यानुसार संतुलित खताचा वापर करावा. शेतकऱ्यांना पुरेश्या आणि योग्य दरात खते उपलब्ध व्हावित यासाठी कृषी विभागामार्फत मागणीनुसार खत विक्री करण्यासाठी परवाने दिली जातात. या खत विक्री केंद्रावरून POS मशीनद्वारे खताची विक्री करण्यात येते. खत विक्री केंद्रबार जाताना शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक सोबत ठेवावे व आपले आधारावरच खत खरेदी करावे असे आव्हान करणेत येत आहे. पालघर जिल्ह्यासाठी खरीप हंगाम 2021-22 मध्ये बताची 18221 मे.टन मागणी असून बाजारात मुबलक प्रमाणात खताची उपलब्धता करण्यात येईल. शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीनुसार आवश्यक खत विकत घ्यावे, अनावश्यक खत खरेदी करू नये असे आव्हान करणेत येत आहे. जिल्ह्यामध्ये भात बियाणे बाबतीत 20928 क्विंटल चे नियोजन केले असून महाबीज यांच्याकडे 3300 क्विंटल, उर्वरि 17628 क्विंटल हे खाजगी बियाणे कंपनीकडून पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. शेतकल्यांनी पावती घेऊनच बियाणे खरेदी करावे. तसेच बॅगवरील सील आणि टॅग लेबलची खात्री करावी. बियाणे, खताच्या दर्जा विषयी, उगवणी विषयी कोणत्याही तक्रारी असल्यास तालुकास्तरीय तसेच जिल्हास्तरीय गुणनियंत्रण कक्षास संपर्क साधावा. सदरचा कक्ष सकाळी 10.00 ते रात्री 7.00 वाजेपर्यंत खुला राहील. शेतकऱ्यांनी कृषी विभागातील गुणनियंत्रण निरीक्षक तथा कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. तरी अडी अडचणी असल्यास शेतकल्यांनी गुणनियंत्रण अधिकान्यांच्या संपर्कात राहावे असे आवाहन करण्यात येत आहे. सदरचा कक्ष 15 मे 2021 ते 15 जुलै 2021 पर्यंत कार्यरत राहील.

कृषी निविष्ठाविषयी असलेल्या अडचणी/तक्रारी सोडविण्यासाठी/मार्गदर्शनासाठी कृषी विभागाच्या तोल फ्री क्रमांक 18002334000 वर संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment