Wednesday, April 14, 2021

तांदुळवाडी येथील शेतकर्‍यांच्या शेतीत अचानक लागली आग!शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळणार काय?

तांदुळवाडी येथील शेतकर्‍यांच्या शेतीत अचानक लागली आग!

शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळणार काय? 

सफाळे ( हिरालाल लोखंडे ) वातावरणातील हवामानात अचानक पणे होत असलेल्या  बदला मुळे काही ठिकाणी गरमा गरम उष्णतेच्या लाटा तर काही ठिकाणी वादळी वा-यासह पाऊस या मुळे शेतकरी आर्थिक दृष्टीने हतबल झालेला आहे. दिनांक १३ मार्च २०२१ रोजी दुपारी सुमारे दोन वाजता तांदुळवाडी ग्रामपंचायत ता,जि पालघर. हद्दीतील शेतकर्‍यांच्या शेतीत अचानक पणे आगीने उग्रस्वरूप धारण करून, येथील अंदाजे १० ते १५ एकर भागातील शेतकर्‍यांच्या शेतीतील लागवड केलेल्या नारळ, आंबा, पेरू, काजु, जांभूळ, फणस, तसेच शेतीत लागवड केलेली कडधान्य पिके - शेतात लागवड केल्यानंतर  पिकासाठी पाण्याच्या पुरवठा करणार्‍या पाईप लाइन, लाकूडफाटा आदि लागलेल्या अग्नीने आपले लक्ष करून शेतकर्‍यांना रस्त्यावर आणले आहे. 
  दिनांक १३ मार्च गुढीपाडवा, १४ मार्च आंबेडकर जयंतीनिमित्त निमित्ताने सरकारी अधिकारी - कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली नाही त्यामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज होत नाही. नुकसान ग्रस्त शेतकर्‍यांनी घटनेची माहिती श्री रमेश चावरे सरपंच ग्रामपंचायत तांदुळवाडी यांना सांगताच सरपंच यांनी घटना स्थळी जाऊन पाहणी केली  व तलाठी सजा तांदुळवाडी यांना घडलेल्या प्रकाराची कल्पना दिली  आहे. शेतीच्या झालेल्या नुकसानीची श्री तलाठी साहेब पाहणी करून पंचनामा करणार आहेत असे सरपंच साहेब यांचे सांगणे आहे 
   सदर आगीत खालील शेतकरी १) आत्माराम पद्माकर पाटील, २) परशुराम विष्णू पालवा, ३) श्रीमती लक्ष्मीबाई आत्माराम पाळवा, ४) परशुराम दत्तात्रेय सोगले, ५) अंकुश केशव मोहनकर, ६) गंगाराम जान्या मोहनकर, ७) येश्या जान्या मोहनकर, ८) दत्तू धुरक्या पागी, ९) रणजीत गजानन कोरे, १०) सुभाष नारायण कोरे, ११) श्रीमती लक्ष्मीबाई लक्ष्मण चौधरी. या वरील सर्व शेतकर्‍यांनी आपापल्या शेतात लागवड केलेली फळझाडे, कडधान्ये आदीचे मोठ्याप्रमाणात नुकसानीची माहिती देत आहे. या बद्दल सफाळे पोलीस ठाणे यांनाही सरपंच साहेब यांनी माहिती दिली आहे

No comments:

Post a Comment