Wednesday, January 20, 2021

केरळ राज्या प्रमाणे वीज बिलाचे कारण जाहीर केली

केरळ राज्या प्रमाणे वीज बिलाचे कारण जाहीर केली


 पालघर (प्रतिनिधी)महावितरण ने वीजबिल थकबाकी दारांकडून वीजबिल वसूल करण्यासाठी वीजपुरवठा खंडित करण्याचा जो आदेश काढला आहे त्याचा महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना , पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष प्रकाश लवेकर यांनी निषेध करून आंदोलनाचा इशारा दिला आहे,

करोना काळामध्ये आलेले वाढीव वीजबिल सामान्य ग्राहकांना माफ करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी वेळोवेळी विजमंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली होती त्यांनतर त्यांनी दिवाळी ला तुम्हाला गोड बातमी देतो असे आश्वासन दिले होते परंतू प्रत्यक्षात कडु बातमी दिल्याचा आरोप लवकर यांनी केला  आहे,
आजही केरळमध्ये करोना काळातील ५० टक्के  वीजबिल माफ करण्यात आले आहे,   याप्रमाणे महाराष्ट्रात ही सर्वसामान्य विजग्राहकांचे ऑक्टोबर पर्यंत वीजबिल माफ करावे व उरलेल्या विजबिलावर ज्यांना एकत्र वीजबिल भरणे शक्य नाही त्यांना हप्ते पाडून द्यावेत अशी मागणी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना , पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष प्रकाश लवेकर व कार्यवाह निखिल मेस्त्री यांनी केली आहे,

वीज वितरण व राज्य शासनाने या बाबत धोरण जाहीर करून मागणी मान्य केली  नाहीतर मोठे आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारा संघटने तर्फे दिला आहे,
 या प्रसंगी विजबिलासाठी कोणाची वीज खंडीत करण्यात येत असेल तर त्यांनी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे,

No comments:

Post a Comment