Monday, December 14, 2020

भाजप चे राज्य उपाध्यक्ष खा. कपिल पाटील यांनी घेतली पत्रकार परिषद पालघर येथे , सोमवार,(रवि राठोड) दि. 14 डिसेंबर 2020, पालघर जिल्हा

भाजप चे राज्य उपाध्यक्ष खा. कपिल पाटील यांनी घेतली पत्रकार परिषद पालघर येथे 
, सोमवार,(रवि राठोड) दि. 14 डिसेंबर 2020, पालघर जिल्हा 
भारतीय जनता पक्षा तर्फे आज पालघर शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद आयोजित केली गेली होती. या वेळी भाजपा चे राज्य उपाध्यक्ष खा.कपिल पाटील यांनी पत्रकारांना संबोधित केले. त्यांनी दिल्लीत चालू असलेल्या शेतकरी आंदोलना विषयी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना, शेतकऱ्यांचे आंदोलन हे एक राजकीय स्टंट असल्याचे सांगितले, त्यांनी या  वेळी उदाहरण देताना सोसिअल मीडिया वर आलेली अचलपूर बाजार समितीची पेरू खरेदीची पावती बाबत सांगितले की महाराष्ट्रातील राज्य मंत्री शेतकरी आंदोलनाला पाठिंबा  देण्यासाठी दिल्लीला गेलेले आहेत, आणि त्यांच्याच मतदार संघातील बाजार समिती शेतकऱ्यांच्या पेरूला एक रुपया किलो अशी किंम्मत देत आहे, त्या साठी केंद्र सरकार ने हा कायदा आणला असून हा कायदा शेतकऱ्यांच्या कसा हिताचा आहे त्या बद्दल त्यांनी कोकणातील आंबे उत्पादक शेतकऱ्याचे उदाहरण दिले, त्यांनी आंदोलक शेतकऱ्यांबद्दल बोलताना झोपलेल्याना जागे करता येते, पण झोपेचे सोंग घेतलेल्याना जागे करता येत नाही असे सांगितले, वाढवणं बद्दल त्यांची भूमिका विचारली असता, त्यांनी पत्रकारांना बोलण्यास नकार दिला, शेतकऱ्यांच्या जमिनी केंद्र सरकार विविध प्रकल्पा साठी घेत आहे, त्यात जो शेतकरी मर्जीने जमीन देईन त्याला २५% बोनस देण्यात येईल आणि मर्जीने नाही दिल्यास २५% तोट्यात जमिनी घेतल्या जातील असे सांगितले, या पत्रकार परिषदेला भाजपचे जिल्हा अध्यक्ष नंदू पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील,माजी आमदार पासकल धनारे,नगरसेवक अरुण माने, भाजप गटनेते भावानंद संखे,नगरसेविका सौ अनिता किणी, सौ लक्ष्मीदेवी हजारी सौ मोना मिश्रा आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment