Monday, November 30, 2020

सामाजिक संस्था व शासनाच्या समन्वयाने प्रश्न सोडवू-मु.का.अ.सिद्धाराम सालीमठ*

*सामाजिक संस्था व शासनाच्या समन्वयाने प्रश्न सोडवू-मु.का.अ.सिद्धाराम सालीमठ*
पालघर(प्रतिनिधी) पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात विशेषतः जव्हार, मोखाडा, विक्रमगड तलासरी डहाणू या तालुक्यांमधे अनेक सामाजिक संस्था जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या महिला बाल विकास विभाग ,आरोग्य ,पाणी पुरवठा, मनरेगा, पाणी स्वच्छता, शिक्षण, व इतर   विभागांमध्ये आपापल्या परीने आपापल्या क्षेत्रात काम करीत आहेत. कुपोषण, पाणीटंचाई, आरोग्य, शिक्षण इत्यादी विषयांमध्ये या सामाजिक संस्था जिल्ह्यात महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. या सोबत च जिल्हा परिषद व सामाजिक संस्थांच्या  समनव्याने विकासाला आणखी चालना मिळावी या उद्देशाने  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम  सालीमठ यांनी या संस्थांचा आढावा घेतला.

 यावेळी  जिल्ह्यात सुरू असलेल्या सामाजिक कामांबाबत विविध सामाजिक संस्था व  सामाजिक दायित्व विभागाचे
अधिकारी यांनी २८ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या 
अधिकारी यांच्यासमोर आपल्या कार्यासंदर्मात माहितीचे
सादरीकरण केले. 

ज्या संस्था जिल्ह्यातील महत्वाच्या  प्रश्नांवर काम करतात अशा संस्थांकडून त्यांच्या कार्याचा अहवाल मागविण्यात आला होता
या मध्ये ऍक्शन अगेंस्ट हंगर, आदिवासी युवा सेवा संघ, ASK फौंडेशन, टाटा मोटर सीएसआर ठाणे , आरोहन, दीपक फौंडेशन, दिगंत स्वराज फौंडेशन, रोटरी क्लब ऑफ पालघर,  प्रसाद चिकित्सा, अगा खान एजन्सी फॉर हॅबिटट इंडिया, आयुष वारली पेंटिंग क्लस्टर डेव्हलपमेंट, जेएम फायनान्शियल फौंडेशन, ग्राममंगल, इंटरनॅशनल असोसिएट ऑफ लायन्स क्लब, केशव सृष्टी, गिरी वनवासी एज्युकेशनल ट्रस्ट, पार्टनर्स फॉर  अर्बन नॉलेज ॲक्शन अँड रीसर्च, क्वालिटी एज्युकेशन, सपोर्ट ट्रस्ट  सर नेस वाडिया फौंडेशन, गॅब्रिएल प्रोजेक्ट चारीटेबल ट्रस्ट,  मेकिंग अ डिफरन्स फौंडेशन, युवा मित्र आरोग्य मित्र, टाटा मोटर्स  फाउंडेशन या संस्था सहभागी झाल्या होत्या.

 सदर संस्थांनी यावेळी आपण जिल्ह्यात करत असलेली आपापल्या क्षेत्रातील करत असलेले उपक्रम, यशस्वी उपक्रम, प्रलंबित कामे,  शासनाचा सहभाग,  अपेक्षित सहकार्य , कामे करताना येणाऱ्या अडचणी  व इतर  अनेक बाबी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समोर सादर केल्या. यात प्रामुख्याने कुपोषण, शिक्षण,आरोग्य, महिला सक्षमीकरण, पाणी टंचाई,   मनरेगा, शेतकऱ्याचे प्रश्न, शाश्वत उपजीविका, शेतीला पूरक व्यवसाय, स्वच्छता, स्थलांतर, व जिल्ह्यातील  इतर अनेक विषयांवर करत असलेले उपक्रमांबद्दल माहिती दिली.
 यावेळी मु.का.अ. सिद्धाराम सलिमठ  यांनी  सदर संस्थांच्या कामाचे कौतुक करून त्यांना आवश्यक त्या या मार्गदर्शक सुचना दिल्या कामकाजाची व्याप्ती वाढवण्यासाठी
जिल्ह्यातील प्रश्नांचा प्राधान्यक्रम ठरवून त्यानुसार सामाजिक संस्थांनी कामे करावीत असे यावेळी मुका यांनी सुचित केले यामध्ये संस्थांना जेथे गरज असेल तेथे शासकीय यंत्रणेचे सर्वतोपरी सहकार्य लाभेल, तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागातील समस्या मार्गी लावायच्या असतील , विकासकामे करावयाची असतील  तर शासन व  सामाजिक संस्थांनी एकमेकांसोबत समनव्य साधून कार्य केले पाहिजे असे मत व्यक्त केले. यावेळी अति.मु.का.अ चंद्रकांत वाघमारे, प्रकल्प संचालक माणिक दिवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा) तुषार माळी,  महिला व बाल विकास विभागाचे प्रमुख प्रवीण भावसार,पाणी पुरवठा, शिक्षण विभाग प्राथमिक माध्यमिक आरोग्य इतर  विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

No comments:

Post a Comment